शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

नागरिकांमध्ये इंटरनेट सुरक्षेविषयी गंभीरतेचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 10:55 AM

Nagpur News अलीकडच्या काळात ऑनलाइन गुन्हे वाढले आहेत. नागरिकांमध्ये इंटरनेट सुरक्षेविषयी गंभीरतेचा अभाव असण्याचे हे लक्षण आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे वाढले

अंकिता देशकर

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे नागरिकांचा ऑनलाइन व्यवहार करण्याकडे कल वाढला आहे. सायबर गुन्हेगार त्याचा फायदा घेऊन असुरक्षित ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांना लुबाडत आहेत. अलीकडच्या काळात ऑनलाइन गुन्हे वाढले आहेत. नागरिकांमध्ये इंटरनेट सुरक्षेविषयी गंभीरतेचा अभाव असण्याचे हे लक्षण आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सुरक्षित इंटरनेट दिवसानिमित्त ‘लोकमत’ने काही तज्ज्ञांशी चर्चा केली असता यासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण बाबी पुढे आल्या. सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल माने यांच्यानुसार, नागरिकांना ऑनलाइन फसवणूक होते हे माहिती असतानाही ते गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. तंत्रज्ञानासोबत गुन्हे करण्याच्या पद्धतीमध्येही बदल होत आहे. लॉकडाऊन काळात नागरिकांना ऑनलाइन दारू विक्रीचे प्रलोभन दाखवण्यात आले होते. नागरिकांना फसवण्यासाठी गुन्हेगार अशा विविध क्लुप्त्या वापरत असतात. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ऑनलाइन फसवणुकीपासून स्वत:चे संरक्षण करणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. त्यांनी इंटरनेटवर कुणालाही गोपनीय माहिती देऊ नये. सोशल मीडियावरून एकमेकांना छायाचित्रे पाठवणेही धोकादायक आहे. हॅकर्स ही छायाचित्रे विविध वेबसाइटवर वापरून नागरिकांना ब्लॅकमेल करू शकतात.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी विभागात सायबर लॉ विषय शिकवणाऱ्या प्रा. श्रुती वाघेला यांनी सध्याच्या परिस्थितीत इंटरनेट सुरक्षित नसल्याचे मत व्यक्त केले. इंटरनेट सुरक्षेविषयी नागरिक जास्त जागृत नाहीत. बाजारात स्मार्टफोन स्वस्त किमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्गातील नागरिक स्मार्टफोन खरेदी करू शकतात. परंतु, ऑनलाइन व्यवहारासाठी लागणारी माहिती त्यांच्याकडे नसते. त्यामुळे इंटरनेट सुरक्षेसंदर्भात व्यापकस्तरावर जनजागृती मोहीम राबवणे आवश्यक आहे. याशिवाय नागरिकांनी जुने फोन खरेदी करणे व विकणे टाळले पाहिजे. बरेचदा जुन्या फोनमधील सर्वच माहिती रद्द होत नाही. त्याचा दुरूपयोग केला जाऊ शकतो. तसेच सायबर गुन्हे थांबविण्यासाठी कडक कायदा लागू झाला पाहिजे, असे वाघेला यांनी सांगितले.

सायबर तज्ज्ञ महेश रखेजा यांच्यानुसार सायबर गुन्हे थांबविण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. नागरिकांना स्ट्राँग पासवर्ड ठेवण्याची सूचना केली जाते. असे असताना अकाउण्ट हॅक केले जाते. नवीन तांत्रिक बाबींची वेळोवेळी माहिती करून घेणे हा यावर एकमेव उपाय आहे. हल्लीचे चोरटे डिजिटल झाले आहेत. त्यामुळे अधिक सावध राहणे गरजेचे आहे, असे रखेजा यांनी सांगितले.

काय आहे सुरक्षित इंटरनेट दिवस

दरवर्षी फेब्रुवारीमध्ये द्वितीय आठवड्यातील दुसऱ्या दिवशी सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा केला जातो. ही परंपरा २००४ पासून सुरू आहे. नागरिकांमध्ये इंटरनेट सुरक्षेविषयी जागृती व संवाद घडवून आणणे हा या दिवसाचा उद्देश आहे.

सुरक्षित इंटरनेटसाठी टिप्स

१ - दुसऱ्याला ओटीपी सांगू नये.

२ - सोशल मीडियावर छायाचित्रे पाठवणे टाळावे.

३ - ऑफर्स व प्रमोशनच्या लिंक उघडू नये.

४ - अज्ञात स्त्रोताकडून येणारी छायाचित्रे व व्हिडिओवर क्लिक करू नये.

५ - संशयास्पद क्रमांकाचे कॉल उचलू नये.

६ - पासवर्ड कुणालाही सांगू नये.

७ - वाचल्याशिवाय अटी व शर्ती मान्य करू नये.

८ - इंटरनेट वापरत असताना जीपीएस बंद ठेवावे.

टॅग्स :Internetइंटरनेट