शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

औषधांच्या तुटवड्यामुळे एड्सग्रस्त रुग्णांचे आयुष्य धोक्यात

By admin | Updated: May 14, 2016 03:08 IST

एआरटी (अ‍ॅन्टी रेट्रोव्हायरल थेरपी) औषध नि:शुल्क मिळत नसल्यामुळे एचआयव्ही व एड्सग्रस्त रुग्णांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे,

जनहित याचिका दाखल : हायकोर्टाची प्रतिवादींना नोटीसनागपूर : एआरटी (अ‍ॅन्टी रेट्रोव्हायरल थेरपी) औषध नि:शुल्क मिळत नसल्यामुळे एचआयव्ही व एड्सग्रस्त रुग्णांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, अशा दाव्यासह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. अवकाशकालीन न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी शुक्रवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर प्रतिवादींना नोटीस बजावून १७ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.प्रतिवादींमध्ये केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना, राज्य शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मेडिकल व मेयोचे अधिष्ठाता, उपजिल्हा रुग्णालय कामठीचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे. एड्सग्रस्त रुग्णांना सहकार्य करणाऱ्या संजीवन बहुउद्देशीय समाजसेवा संस्थेने ही जनहित याचिका दाखल केली आहे. एचआयव्ही व एड्सग्रस्त रुग्णांना एआरटी औषध नि:शुल्क उपलब्ध करून देण्यासाठी मेडिकल, मेयो व कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात एआरटी केंद्र कार्यरत आहे. सध्या या तिन्ही केंद्रांतून रुग्णांना नि:शुल्क एआरटी औषध मिळत नाही. या औषधाचा तुटवडा असल्याचे कारण प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. हे औषध एकदा सुरू केल्यानंतर त्यात खंड पडू नये. खंड पडल्यानंतर शरीरातील विषाणू या औषधाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करतात. यामुळे खंड पडल्यानंतर औषध घेतल्यास विषाणूंवर काहीच परिणाम होत नाही. रुग्णांना हे औषध नियमित घेणे आवश्यक आहे. एआरटी केंद्रातून औषध मिळाले नाही तर, रुग्णांना बाहेरून औषध खरेदी करावे लागते. पहिल्या टप्प्यातील औषधाचा १८००, दुसऱ्या टप्प्यातील औषधाचा २८०० तर, तिसऱ्या टप्प्यातील औषधाचा २५०० ते ५००० रुपये मासिक खर्च आहे. गरीब रुग्णांना एवढा खर्च करणे शक्य होत नाही. समाजात एचआयव्ही व एड्सग्रस्त रुग्णांकडे चांगल्या नजरेने पाहिले जात नाही. ओळख पुढे येऊ नये म्हणून हे रुग्ण औषधाच्या तुटवड्याची जाहीर तक्रार करीत नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. विवेक अवचट यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)