शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

राजकारणात विकासावरील चिंतनाचा अभाव

By admin | Updated: September 14, 2015 03:25 IST

राजकारणात विकासावरील चिंतनाचा अभाव आहे. यामुळे पत्रकारांनी केवळ नेत्यांच्या उणिवा न दाखवता समस्यांवर उपायही सुचविले पाहिजे.

नितीन गडकरी : अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदाननागपूर : राजकारणात विकासावरील चिंतनाचा अभाव आहे. यामुळे पत्रकारांनी केवळ नेत्यांच्या उणिवा न दाखवता समस्यांवर उपायही सुचविले पाहिजे. राजकारणाला दिशा देण्याचे कार्य पत्रकार करू शकतात, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.‘लोकमत’चे नवी दिल्ली येथील प्रतिनिधी रघुनाथ पांडे व पत्रकार अविनाश दुधे यांना रविवारी पंचशील चौकातील श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात गडकरी यांच्या हस्ते २०१४ चा अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विदर्भ गौरव प्रतिष्ठान व श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. २१ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. माजी खासदार दत्ता मेघे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर माजी खासदार बनवारीलाल पुरोहित प्रमुख अतिथी होते.गडकरी पुढे म्हणाले, आपण समस्यांची चर्चा करतो, पण उपायांवर कोणीच बोलत नाही. शेतकरी आत्महत्या हा विदर्भाला भेडसावत असलेला गंभीर प्रश्न आहे. विदर्भातील नेत्यांसाठी ही लज्जास्पद बाब आहे. यावर उपाय शोधण्यासाठी लवकरच तज्ज्ञांची बैठक घेणार आहे. परंतु कापूस, गहू व धान लावल्यामुळे समस्या सुटणार नाही. बाजारपेठ मागणी व पुरवठ्यावर चालते, हे लक्षात घेतले पाहिजे. देशात विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता जास्त आहे. महाराष्ट्रात विचारभिन्नतेचे नेतेही मिळून राहतात. हा मराठी माणसाचा चांगला गुण आहे. मेघे यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा प्रभाव वाढला असला तरी वर्तमानपत्रे कधीच बंद होणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला तर पुरोहित यांनी पत्रकारांनी नैतिकतेची लक्ष्मणरेषा कधीही ओलांडू नये, असे आवाहन केले. कार्यक्रमाला नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रम्हाशंकर त्रिपाठी, सचिव शिरीष बोरकर उपस्थित होते. प्रतिष्ठानचे सचिव गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक तर ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांनी संचालन केले तर नागपूर श्रमिक पत्रकार ट्रस्टचे विश्वस्त प्रदीप मैत्र यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)