शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

मजूर निघून गेले, उद्योग क्षेत्र पंगू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:32 IST

कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन लागल्याने सर्वच उद्योग ठप्प पडले आहेत. आजाराची भीती आणि काम नसल्याने परराज्यातील जवळपास ९० टक्के स्थलांतरित मजुरांनी गावाकडे पलायन केले आहे. मजुरांच्या पलायनाने बांधकामसह उद्योग क्षेत्राचीही चिंता वाढविली आहे. शासनाच्या निर्देशानुसार काम सुरू केले तरी मजूर नसल्याने सर्वच क्षेत्र पंगू होण्याची भीती असून कामाचा वेग मंदावणे आणि महागाई वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देबांधकाम, उद्योग, फर्निचर, कृषी क्षेत्राची वाढली चिंता : वेग मंदावणे व महागाईची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन लागल्याने सर्वच उद्योग ठप्प पडले आहेत. आजाराची भीती आणि काम नसल्याने परराज्यातील जवळपास ९० टक्के स्थलांतरित मजुरांनी गावाकडे पलायन केले आहे. मजुरांच्या पलायनाने बांधकामसह उद्योग क्षेत्राचीही चिंता वाढविली आहे. शासनाच्या निर्देशानुसार काम सुरू केले तरी मजूर नसल्याने सर्वच क्षेत्र पंगू होण्याची भीती असून कामाचा वेग मंदावणे आणि महागाई वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही परराज्यातील मजूर मोठ्या प्रमाणात आहेत. केवळ नागपूर शहराचा विचार केल्यास परराज्याचे एक लाखाच्या वर मजूर आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आदी राज्यातून हे मजूर रोजगाराच्या शोधात येतात. कामाचे कौशल्य आणि काम करण्याची क्षमता अधिक असल्याने या मजुरांना उद्योग क्षेत्रात प्राधान्य दिले जाते. केवळ बांधकाम क्षेत्राचा विचार केल्यास २५ हजाराच्यावर मजूर परराज्यातील आहेत. जेसीबी मशीन, काँक्रट मशीन ऑपरेटर, लोहा बांधणारे, सेंटरिंग करणारे हे मजूर असतात. शिवाय कामाची क्षमता अधिक असूनही ते कमी पैशात उपलब्ध होत असल्याने कंत्राटदार मोठ्या संख्येने परराज्यातील मजूर कामासाठी आणत असतात. लॉकडाऊनमुळे यातले जवळपास सर्व मजूर त्यांच्या गावाकडे गेले आहेत. त्यामुळे कामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता या क्षेत्रातील उद्योजकांनी व्यक्त केली.क्रेडाईचे अध्यक्ष महेश साधवानी यांच्यानुसार शासनाने उद्योग व बांधकामासाठी परवानगी दिली तरी मोठ्या प्रमाणात मजुरांचा तुटवडा भासणार आहे. क्रेडाईचे जवळपास २५० सदस्य आहेत व त्यांच्याकडे १०००० च्यावर मजूर होते. आम्ही त्यांना पूर्ण सुविधा पुरवून थांबविण्याचे प्रयत्न केले. मात्र भीती आणि अनिश्चिततेमुळे बरेच मजूर गावाकडे गेले. आता स्थिती सुधारेपर्यंत चार पाच महिने तरी ते परतण्याची शक्यताही नाही आणि त्यांचा विश्वासही वाढणार नाही. त्यामुळे बांधकाम क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची भीती साधवानी यांनी व्यक्त केली. मजूर नसल्याने अनेकांचे कामही रखडल्याने त्यांनी सांगितले.उद्योग क्षेत्राचीही हीच अवस्था आहे. उद्योग क्षेत्र या मजुरांवर अवलंबून आहे आणि प्रत्येक उद्योगात त्यांचा मोठा समावेश आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्राचीही गती मंदावण्याची शक्यता व्हीआयएच्या वरिष्ठ सदस्याने व्यक्त केली. फर्निचरच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात राजस्थानच्या कामगारांचा समावेश राहिला आहे. त्यांच्या पलायनाने किमान चारपाच महिने तरी हा व्यवसाय पूर्वपदावर येण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. कृषी जगताचीही हीच अवस्था निर्माण झाली आहे.हे मजूर कौशल्यपूर्ण असतात आणि कामाची क्षमताही अधिक असते. असे असताना त्यांची रोजीही कमी असते. त्यामुळे कंत्राटदार त्यांना प्राधान्य देतात. हे मजूर गेल्याने मजुरांचा तुटवडा निर्माण होईल. कामाची गती तर मंदावेल, शिवाय बांधकामात महागाई वाढेल.महेश साधवानी, अध्यक्ष, क्रेडाईआम्ही लहान कंत्राटदार आहोत. सध्या मनपाच्या नालेसफाईचे काम आपल्याजवळ आहे. आमच्याकडे असलेले जेसीबी ऑपरेटर व इतर मजूर सोडुन गावाकडे गेले. आता स्थानिक कामगार काम करीत आहेत. मात्र इतर ठिकाणचे काम थांबले आहे.

परमानंद सुखदेवे, कंत्राटदार