शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

मजूर निघून गेले, उद्योग क्षेत्र पंगू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:32 IST

कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन लागल्याने सर्वच उद्योग ठप्प पडले आहेत. आजाराची भीती आणि काम नसल्याने परराज्यातील जवळपास ९० टक्के स्थलांतरित मजुरांनी गावाकडे पलायन केले आहे. मजुरांच्या पलायनाने बांधकामसह उद्योग क्षेत्राचीही चिंता वाढविली आहे. शासनाच्या निर्देशानुसार काम सुरू केले तरी मजूर नसल्याने सर्वच क्षेत्र पंगू होण्याची भीती असून कामाचा वेग मंदावणे आणि महागाई वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देबांधकाम, उद्योग, फर्निचर, कृषी क्षेत्राची वाढली चिंता : वेग मंदावणे व महागाईची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन लागल्याने सर्वच उद्योग ठप्प पडले आहेत. आजाराची भीती आणि काम नसल्याने परराज्यातील जवळपास ९० टक्के स्थलांतरित मजुरांनी गावाकडे पलायन केले आहे. मजुरांच्या पलायनाने बांधकामसह उद्योग क्षेत्राचीही चिंता वाढविली आहे. शासनाच्या निर्देशानुसार काम सुरू केले तरी मजूर नसल्याने सर्वच क्षेत्र पंगू होण्याची भीती असून कामाचा वेग मंदावणे आणि महागाई वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही परराज्यातील मजूर मोठ्या प्रमाणात आहेत. केवळ नागपूर शहराचा विचार केल्यास परराज्याचे एक लाखाच्या वर मजूर आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आदी राज्यातून हे मजूर रोजगाराच्या शोधात येतात. कामाचे कौशल्य आणि काम करण्याची क्षमता अधिक असल्याने या मजुरांना उद्योग क्षेत्रात प्राधान्य दिले जाते. केवळ बांधकाम क्षेत्राचा विचार केल्यास २५ हजाराच्यावर मजूर परराज्यातील आहेत. जेसीबी मशीन, काँक्रट मशीन ऑपरेटर, लोहा बांधणारे, सेंटरिंग करणारे हे मजूर असतात. शिवाय कामाची क्षमता अधिक असूनही ते कमी पैशात उपलब्ध होत असल्याने कंत्राटदार मोठ्या संख्येने परराज्यातील मजूर कामासाठी आणत असतात. लॉकडाऊनमुळे यातले जवळपास सर्व मजूर त्यांच्या गावाकडे गेले आहेत. त्यामुळे कामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता या क्षेत्रातील उद्योजकांनी व्यक्त केली.क्रेडाईचे अध्यक्ष महेश साधवानी यांच्यानुसार शासनाने उद्योग व बांधकामासाठी परवानगी दिली तरी मोठ्या प्रमाणात मजुरांचा तुटवडा भासणार आहे. क्रेडाईचे जवळपास २५० सदस्य आहेत व त्यांच्याकडे १०००० च्यावर मजूर होते. आम्ही त्यांना पूर्ण सुविधा पुरवून थांबविण्याचे प्रयत्न केले. मात्र भीती आणि अनिश्चिततेमुळे बरेच मजूर गावाकडे गेले. आता स्थिती सुधारेपर्यंत चार पाच महिने तरी ते परतण्याची शक्यताही नाही आणि त्यांचा विश्वासही वाढणार नाही. त्यामुळे बांधकाम क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची भीती साधवानी यांनी व्यक्त केली. मजूर नसल्याने अनेकांचे कामही रखडल्याने त्यांनी सांगितले.उद्योग क्षेत्राचीही हीच अवस्था आहे. उद्योग क्षेत्र या मजुरांवर अवलंबून आहे आणि प्रत्येक उद्योगात त्यांचा मोठा समावेश आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्राचीही गती मंदावण्याची शक्यता व्हीआयएच्या वरिष्ठ सदस्याने व्यक्त केली. फर्निचरच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात राजस्थानच्या कामगारांचा समावेश राहिला आहे. त्यांच्या पलायनाने किमान चारपाच महिने तरी हा व्यवसाय पूर्वपदावर येण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. कृषी जगताचीही हीच अवस्था निर्माण झाली आहे.हे मजूर कौशल्यपूर्ण असतात आणि कामाची क्षमताही अधिक असते. असे असताना त्यांची रोजीही कमी असते. त्यामुळे कंत्राटदार त्यांना प्राधान्य देतात. हे मजूर गेल्याने मजुरांचा तुटवडा निर्माण होईल. कामाची गती तर मंदावेल, शिवाय बांधकामात महागाई वाढेल.महेश साधवानी, अध्यक्ष, क्रेडाईआम्ही लहान कंत्राटदार आहोत. सध्या मनपाच्या नालेसफाईचे काम आपल्याजवळ आहे. आमच्याकडे असलेले जेसीबी ऑपरेटर व इतर मजूर सोडुन गावाकडे गेले. आता स्थानिक कामगार काम करीत आहेत. मात्र इतर ठिकाणचे काम थांबले आहे.

परमानंद सुखदेवे, कंत्राटदार