शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील कृष्णा व वेणा नदी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 11:13 IST

बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील दोन कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी खुलेआम नालीत सोडले जाते. पुढे तेच पाणी नालीद्वारे वाहत कृष्णा व वेणा नदीच्या पात्रात जाते. त्यामुळे या दोन्ही नद्यांमधील पाणी तसेच परिसरातील जलस्रोत दूषित होण्याची शक्यता बळावली आहे.

ठळक मुद्देसीएटीपी प्लाँट

चंदू कावळे ।लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहत ही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. या वसाहतीतील दोन कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी खुलेआम नालीत सोडले जाते. पुढे तेच पाणी नालीद्वारे वाहत बुटीबोरी परिसरातून वाहणाऱ्या कृष्णा व वेणा नदीच्या पात्रात जाते. त्यामुळे या दोन्ही नद्यांमधील पाणी तसेच परिसरातील जलस्रोत दूषित होण्याची शक्यता बळावली आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराची प्रत्यक्ष पाहणी करून दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाला नोटिसा बजावल्या. परंतु, त्या कंपन्यांनी रसायनयुक्त पाणी नालीत सोडणे बंद केले नाही. ही बाब धोकादायक ठरू शकते.या औद्योगिक वसाहतीमध्ये विविध वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. परंतु, यातील काही कंपन्या त्यांच्या आर्थिक स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घेतात. येथील दोन कंपन्यांनी त्यांच्या रसायनयुक्त पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ते चक्क नालीत सोडले.वास्तवात, या परिसरात नाल्यांचे बांधकाम पावसाने पाणी वाहून जाण्यासाठी करण्यात आले आहे. मात्र, त्यात रसायनयुक्त पाणी सोडल्या जात असल्याने ते बुटीबोरी व टाकळघाट शिवारातून वाहणाऱ्या कृष्णा व वेणा नदीच्या पाण्यात मिसळते.विशेष म्हणजे, या वसाहतीतील बहुतांश कंपन्यांना रसायनयुक्त पाण्याची समस्या भेडसावत आहे. काही कंपन्या या रसायनयुक्त पाण्यावर ‘सीएटीपी’मध्ये प्रक्रिया करतात आणि नंतर त्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावतात. मात्र, या दोन कंपन्या त्याला अपवाद ठरल्या आहेत. त्या कंपन्या या रसायनयुक्त पाण्यावर कुठलीही प्रक्रिया न करता ते नालीद्वारे नदीत सोडतात. याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. या रसायनयुक्त पाण्याचा मुद्दा राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील अधिवेशनातही गाजला; परंतु त्यावर तोडगा निघाला नाही. ही समस्या वेळीच न सोडविल्यास ती भविष्यात घातक रूप धारण करेल, असा अंदाज काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केला.

जीवाशी गाठपरिसरातील जनावरे या दोन्ही नद्यांच्या पात्रात नेहमीच पाणी पित असून, पात्रातील झिरपलेले पाणी विहिरी, बोअरवेल्स व अन्य जलस्रोतात येते. पात्रातील पाणी दूषित झाल्यास इतर जलस्रोत दूषित होतात. नदीतील दूषित पाणी प्यायल्याने जनावरे दगावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या प्रकाराची केवळ थातूरमातूर चौकशी करून संबंधित कंपन्यांवर कुठलीही ठोस कारवाई कधीच करण्यात आली नाही. नदीतील पाणी दूषित झाल्यास ते सर्वांसाठीच धोकादायक ठरणार आहे.

सीएटीपी प्लाँटया पाण्यामध्ये काही अत्यंक घातक द्रव्य मिसळलेले असतात. ते मानवी व जनावरांच्या आरोग्यासाठी तसेच वनस्पतींसाठी धोकादायक ठरतात. या रसायनयुक्त पाण्यामुळे कुणालाही धोका उद्भवू नये म्हणून काही उद्योगपतींनी त्यांच्या त्यांच्या कंपनीच्या आवारात सीएटीपी प्लाँट बसविले आहेत. रसायनयुक्त पाण्यावर या प्लाँटमध्ये प्रक्रिया केल्यानंतर त्यातील घातक द्रव्य नष्ट होतात. काही उद्योगपती केवळ पैसे वाचविण्यासाठी त्यांच्या कंपनीच्या आवारात हा प्लांट बसवित नाही.

प्रदूषण मंडळाची नोटीसमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वानखेडे यांनी या दोन्ही कंपन्यांमधील रसायनयुक्त पाण्याची पाहणी केली. त्यात कंपनी व्यवस्थापन दोषी असल्याचे आढळून येताच कंपन्यांना नोटीस बजावण्यात आल्या. परंतु, कंपनी व्यवस्थापनावर या नोटीसचा काहीही परिणाम झाला नाही. या वसाहतीतील कंपन्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी क्षेत्र अधिकारी शुक्ला यांच्याकडे आहे. हा प्रकार न थांबल्यास कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत वानखेडे यांनी दिले.

टॅग्स :MIDCएमआयडीसी