शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कोविड हेल्थ सेंटरला डॉक्टर मिळेनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 11:31 IST

प्रशासनाने भरतीची प्रक्रिया सुरू केली मात्र डॉक्टर व परिचारिका मिळत नसल्याने मनपा प्रशासन हतबल झाले आहे. डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचारी न मिळाल्यास नागपुरातील सेंटर कसे सुरू करणार, अशी गंभीर समस्या उभी ठाकली आहे.

ठळक मुद्दे मनपा प्रशासन हतबल पाच सज्ज रुग्णालयात प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुलै महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढणार असल्याचे गृहीत धरून महापालिका प्रशासनाने पाच रुग्णालये अत्याधुनिक केली. ४५० खाटांसह आयसीयू सुविधा उपलब्ध आहे. यातील इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली सूतिकागृह व आयसोलेशन येथे एकूण २७२ खाटांचे डेडिकेटेड हेल्थ सेंटर सज्ज केले. यासाठी डॉक्टरांसह ५०० परिचारिका व प्रशिक्षक कर्मचाऱ्यांची गरज आहे. प्रशासनाने भरतीची प्रक्रिया सुरू केली मात्र डॉक्टर व परिचारिका मिळत नसल्याने मनपा प्रशासन हतबल झाले आहे. डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचारी न मिळाल्यास सेंटर कसे सुरू करणार, अशी गंभीर समस्या उभी ठाकली आहे.१०.५० कोटींचा खर्चपाच रुग्णालयांच्या अपग्रेडेशनवर सुमारे १०.५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यावर ७ कोटी खर्च करण्यात आले आहेत. गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय व पाचपावली सूतिकागृह येथे प्रत्येकी १३० बेडसह अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटरसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच इमामवाडा येथील आयसोलेशन रुग्णालय, काटोल रोड येथील के.टी.नगर रुग्णालय व सदर येथील आयुष रुग्णालय सज्ज केली आहेत.मेयो, मेडिकलचा भार कमी कसा होणार?कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोविड-१९ साथीचा उद्रेक बघता केंद्राच्या आदेशाप्रमाणे, गरज भासल्यास कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मनपाची रुग्णालये सज्ज करण्यात आली. परंतु डॉक्टर व परिचारिका नसल्याने उपचार करणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत मेयो, मेडिकलवरील रुग्णांचा भार कमी कसा करणार, असा प्रश्­न कायम आहे.हॉटेलमध्ये अडीच हजार शुल्कशहरातील आठ हॉटेल कोविड केअर सेंटरमध्ये परिवर्तित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या हॉटेलमध्ये कोरोनाची लक्षणे नसलेले पॉझिटिव्ह रुग्ण राहू शकतील; मात्र यासाठी रुग्णांना दररोज अडीच हजार रुपये शुल्क द्यावे लागेल.मनपा कर्मचाऱ्यांचीच उपचारासाठी भटकंतीमहापालिकेच्या अग्निशमन विभागातील १४ कर्मचारी व अधिकारी पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना उपचारासाठी भटकंती करावी लागली. मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची अशी अवस्था असेल तर सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न उभा ठाकला आहे. होम क्वारंटाईन असलेल्यांनाही उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस