शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोसळधार

By admin | Updated: June 22, 2015 02:37 IST

गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी दिवसभर अधून-मधून झालेल्या पावसाने सायंकाळनंतर मात्र थैमान घातले.

नागपूर : गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी दिवसभर अधून-मधून झालेल्या पावसाने सायंकाळनंतर मात्र थैमान घातले. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरु होता. त्यामुळे शहरातील मुख्य भागांसह सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी साचले होते. परिणामी शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. रात्री ९.४० वाजेपर्यंत ४५.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली होती. दरम्यान हवामान विभागाने अतिवृष्टीची शक्यता वर्तविली असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. गत पाच दिवसांपासून रोज धो धो पाऊ स पडत आहे. शिवाय शनिवारी रात्री शहरात धुंवाधार पाऊ स झाला. यामुळे स्थानिक प्रशासनाची पोलखोल झाली असून, शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी भरले होते. रविवारी त्यात आणखी भर पडली. शंकरनगर चौकासह पंचशील चौक, झांशी राणी चौक, धंतोली व व्हेरायटी चौक या शहारतील प्रमुख बाजारपेठेच्या चौकात पाण्याचे डबके तयार झाले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नवनिर्मित अपघात विभागासमोरच्या भागाला तलावाचे रुप आले होते. अपघात विभागात पाण्यातूनच ये-जा करण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातलगांना चांगलीच कसरत करावी लागली. दक्षिण नागपुरातील रामबाग, उत्तर नागपुरातील इंदोरा, मिसाळ-ले आऊट आदी सखल भागांतील वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. हवामान विभागाने यापूर्वीच येत्या २५ जूनपर्यंत विदर्भात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या दरम्यान सुमारे २४४ मि.मी.पर्यंत पाऊ स कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाने विशेष उपाययोजना सुरू करू न नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मोबाईल सेवेला फटकासंततधार पावसामुळ रविवारी मोबाईल सेवा ठप्प झाली होती. यामुळे मोबाईल ग्राहकांना फार मोठा त्रास सहन करावा लागला. माहिती सूत्रानुसार केबल लाईनमध्ये पाणी शिरल्याने ही समस्या निर्माण झाली होती. यामुळे अनेक मोबाईलवरील कॉल ड्रॉप होत होते. शिवाय एक-दुसऱ्यांना आवाज व्यवस्थित ऐकू येत नव्हता. रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे हालरविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे हाल झाले. रेल्वेस्थानकाच्या सर्वच प्लॅटफार्मवर पाणी जमा झाल्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यासाठीही जागा उरली नसल्याचे चित्र होते.एसटीत दक्षतेचा इशाराहवामान खात्याने आधीच मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे आम्ही एसटी महामंडळाच्या चालक-वाहकांना संबंधित ठिकाणी परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुरासारखी परिस्थिती उद्भवल्यास दक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाचे विभाग नियंत्रक राजीव घाटोळे यांनी दिली.