शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
3
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
4
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
5
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
6
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
7
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
8
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
9
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
10
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
11
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
12
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
13
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
14
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
15
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
16
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
17
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
18
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
19
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
20
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक

कोराडी वीज प्रकल्पाचा राख बंधारा फुटला; शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 19:40 IST

Nagpur News कोराडी औष्णिक वीज प्रकल्प केंद्रालगतचा खसाळा राख बंधारा फुटला असून लाखो टन राख वाहून गेली आहे.

ठळक मुद्देजलप्रदूषणाचा धोका, पाणीपुरवठ्यालाही फटका

नागपूर: कोराडी औष्णिक वीज प्रकल्प केंद्रालगतचा खसाळा राख बंधारा फुटला असून लाखो टन राख वाहून गेली आहे. हे राख मिश्रीत पाणी खसाळा, मसाळा, खैरी गावातून परिसरातील नदी नाल्यात जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

गत दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, अतिवृष्टीने कोराडी वीज केंद्रालगतचा खसाळा राख बंधारा शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान पाण्याची पातळी वाढल्याने फुटला. नैसर्गिक आपदा लक्षात घेता प्रशासनाच्यावतीने संबंधित गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राख मिश्रीत पाण्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच नागपूर शहर व आजूबाजूच्या गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणारी यंत्रणाही प्रभावित होणार आहे.

कोराडी येथील वीज केंद्राची राख खसाळा-मसाळा येथील राख बंधाऱ्यात संग्रहित केली जाते. या तलावाला सुरक्षा म्हणून मोठा बंधारा बांधण्यात आला आहे. बंधारा फुटल्याने राख मिश्रीत पाण्याने खसाळा, मसाळा खैरी, कवठा, सुरादेवी या परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. तसेच पिवळी नदी व कन्हान नदीच्या पात्रातही हे राख मिश्रीत पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे. दरम्यान, दुपारी जिल्हाधिकारी आर. विमला यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर, तहसीलदार अक्षय पोयाम, खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे, जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, मसाळाचे सरपंच रवी पारधी, खैरीचे सरपंच मोरेश्वर कापसे, वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजेश कराळे, अभय हरणे, राजकुमार तासकर आदी उपस्थित होते.

जमीन सुपीक होण्यासाठी तीन वर्षे लागतील

राख मिश्रीत पाणी शेतीत गेल्यानंतर ती शेती पूर्ववत सुपीक बनण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे तीन वर्षे नुकसान होणार आहे.

तत्काळ पंचनाम्याचे आदेश

जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल यंत्रणेला सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेने परिसरातील पाण्याचे स्रोत दूषित झाल्याची दाट शक्यता आहे. तेही तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तिप्पट भरपाई देण्याची मागणी आमदार बावनकुळे यांनी केली आहे.

-

टॅग्स :koradi damकोराडी प्रकल्प