शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

कोराडी वीज प्रकल्पाचा राख बंधारा फुटला; शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 19:40 IST

Nagpur News कोराडी औष्णिक वीज प्रकल्प केंद्रालगतचा खसाळा राख बंधारा फुटला असून लाखो टन राख वाहून गेली आहे.

ठळक मुद्देजलप्रदूषणाचा धोका, पाणीपुरवठ्यालाही फटका

नागपूर: कोराडी औष्णिक वीज प्रकल्प केंद्रालगतचा खसाळा राख बंधारा फुटला असून लाखो टन राख वाहून गेली आहे. हे राख मिश्रीत पाणी खसाळा, मसाळा, खैरी गावातून परिसरातील नदी नाल्यात जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

गत दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, अतिवृष्टीने कोराडी वीज केंद्रालगतचा खसाळा राख बंधारा शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान पाण्याची पातळी वाढल्याने फुटला. नैसर्गिक आपदा लक्षात घेता प्रशासनाच्यावतीने संबंधित गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राख मिश्रीत पाण्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच नागपूर शहर व आजूबाजूच्या गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणारी यंत्रणाही प्रभावित होणार आहे.

कोराडी येथील वीज केंद्राची राख खसाळा-मसाळा येथील राख बंधाऱ्यात संग्रहित केली जाते. या तलावाला सुरक्षा म्हणून मोठा बंधारा बांधण्यात आला आहे. बंधारा फुटल्याने राख मिश्रीत पाण्याने खसाळा, मसाळा खैरी, कवठा, सुरादेवी या परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. तसेच पिवळी नदी व कन्हान नदीच्या पात्रातही हे राख मिश्रीत पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे. दरम्यान, दुपारी जिल्हाधिकारी आर. विमला यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर, तहसीलदार अक्षय पोयाम, खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे, जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, मसाळाचे सरपंच रवी पारधी, खैरीचे सरपंच मोरेश्वर कापसे, वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजेश कराळे, अभय हरणे, राजकुमार तासकर आदी उपस्थित होते.

जमीन सुपीक होण्यासाठी तीन वर्षे लागतील

राख मिश्रीत पाणी शेतीत गेल्यानंतर ती शेती पूर्ववत सुपीक बनण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे तीन वर्षे नुकसान होणार आहे.

तत्काळ पंचनाम्याचे आदेश

जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल यंत्रणेला सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेने परिसरातील पाण्याचे स्रोत दूषित झाल्याची दाट शक्यता आहे. तेही तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तिप्पट भरपाई देण्याची मागणी आमदार बावनकुळे यांनी केली आहे.

-

टॅग्स :koradi damकोराडी प्रकल्प