शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
2
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
3
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
4
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
5
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
6
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
7
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
8
Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा
9
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
10
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
11
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
12
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
13
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
14
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
15
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; सीएम योगींनी वाहिली श्रद्धांजली
16
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
17
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
18
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
19
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
20
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
Daily Top 2Weekly Top 5

कोराडी वीज प्रकल्पाचा राख बंधारा फुटला; शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 19:40 IST

Nagpur News कोराडी औष्णिक वीज प्रकल्प केंद्रालगतचा खसाळा राख बंधारा फुटला असून लाखो टन राख वाहून गेली आहे.

ठळक मुद्देजलप्रदूषणाचा धोका, पाणीपुरवठ्यालाही फटका

नागपूर: कोराडी औष्णिक वीज प्रकल्प केंद्रालगतचा खसाळा राख बंधारा फुटला असून लाखो टन राख वाहून गेली आहे. हे राख मिश्रीत पाणी खसाळा, मसाळा, खैरी गावातून परिसरातील नदी नाल्यात जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

गत दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, अतिवृष्टीने कोराडी वीज केंद्रालगतचा खसाळा राख बंधारा शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान पाण्याची पातळी वाढल्याने फुटला. नैसर्गिक आपदा लक्षात घेता प्रशासनाच्यावतीने संबंधित गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राख मिश्रीत पाण्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच नागपूर शहर व आजूबाजूच्या गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणारी यंत्रणाही प्रभावित होणार आहे.

कोराडी येथील वीज केंद्राची राख खसाळा-मसाळा येथील राख बंधाऱ्यात संग्रहित केली जाते. या तलावाला सुरक्षा म्हणून मोठा बंधारा बांधण्यात आला आहे. बंधारा फुटल्याने राख मिश्रीत पाण्याने खसाळा, मसाळा खैरी, कवठा, सुरादेवी या परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. तसेच पिवळी नदी व कन्हान नदीच्या पात्रातही हे राख मिश्रीत पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे. दरम्यान, दुपारी जिल्हाधिकारी आर. विमला यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर, तहसीलदार अक्षय पोयाम, खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे, जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, मसाळाचे सरपंच रवी पारधी, खैरीचे सरपंच मोरेश्वर कापसे, वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजेश कराळे, अभय हरणे, राजकुमार तासकर आदी उपस्थित होते.

जमीन सुपीक होण्यासाठी तीन वर्षे लागतील

राख मिश्रीत पाणी शेतीत गेल्यानंतर ती शेती पूर्ववत सुपीक बनण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे तीन वर्षे नुकसान होणार आहे.

तत्काळ पंचनाम्याचे आदेश

जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल यंत्रणेला सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेने परिसरातील पाण्याचे स्रोत दूषित झाल्याची दाट शक्यता आहे. तेही तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तिप्पट भरपाई देण्याची मागणी आमदार बावनकुळे यांनी केली आहे.

-

टॅग्स :koradi damकोराडी प्रकल्प