शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

'हे' आहे चित्ता शावकांच्या मृत्यूचे कारण...; अभ्यासातील वास्तव 

By निशांत वानखेडे | Updated: May 28, 2023 19:10 IST

वर्षभरापूर्वी नामिबियामधून आणलेल्या आणि मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यात ठेवलेल्या चित्त्याच्या तीन शावकांच्या मृत्युमुळे वेगवेगळ्या शंकाकुशंका उपस्थित होत आहेत.

नागपूर : वर्षभरापूर्वी नामिबियामधून आणलेल्या आणि मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यात ठेवलेल्या चित्त्याच्या तीन शावकांच्या मृत्युमुळे वेगवेगळ्या शंकाकुशंका उपस्थित होत आहेत. चित्त्यांची प्रजाती भारतात टिकणारच नाही, अशी मते व्यक्त केली जात आहेत. मात्र चित्ते जगणार नाही, अशी भविष्यवाणी करणे चुकीचे आहे, असे मत चित्ता लेडी म्हणून प्रसिद्ध डॉ. प्रज्ञा गिरडकर यांनी व्यक्त केले. मात्र सध्या ते देखरेखीखाली बंदिवासात असून तेच त्यांच्या मृत्युचे कारण असल्याचे त्यांनी एका संशोधनावरून नमूद केले आहे. डॉ. प्रज्ञा गिरडकर या भारताच्या पहिल्या चित्ता संरक्षण म्हणून ओळखल्या जात असून नामिबियामध्ये राहून त्यांनी चित्त्यांच्या हालचालीवर अभ्यास केला आहे. त्यांनी अनुवंश शास्त्रज्ञ डॉ. स्टिफन ओब्रायन व डॉ. लॉरी मार्कर यांनी १९८५ साली सादर केलेल्या संशोध अहवालात चित्ता शावकांच्या मृत्युचे कारण नोंदविले आहे. वेगवेगळे वनक्षेत्र व चित्त्यांच्या अधिवासात शावकांच्या हालचालींचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या संशोधनानुसार बंदिवासात देखरेखीखाली असलेल्या चित्त्यांच्या शावकांचा मृत्युदर ७० टक्क्यांच्या वर असतो.

कुनो अभयारण्यात असलेल्या ज्वाला’ नामक मादी चित्त्याचे हे शावक असून आता केवळ एक शावक जिवंत राहिला आहे. डॉ. गिरडकर यांनी सांगितले चित्ता ही अतिशय संवेदनशील प्रजाती आहे. त्यांच्यामध्ये अनुवांशिक विविधता कमी असते. त्यामुळे तो अतिसंवेदनशील गटात गणला जातो. कधीकाळी एकट्या भारतात १०,००० चित्ते होते पण शिकारीमुळे त्यांचे अनैसर्गिक मृत्यु झाले व ही प्रजाती भारतातून नामशेष झाली. आता जगभरात केवळ ७००० चित्ते शिल्लक आहेत. गेल्या वर्षी नामिबियामधून चित्ते आणून एक प्रयोग केला जात आहे.  गिरडकर यांच्या मते आफ्रिकेत वाळवंटी प्रदेशात दिवसा अतिउष्णता व रात्री अति थंडी असते. अशा वातावरणात राहणारे चित्ते भारतीय वातावरणात रुळायला निश्चितच वेळ लागेल. बंदिवासात असल्याने त्यांना मुक्त संचार करण्यासाठी वाव मिळत नाही. त्यांच्यात हवी तशी रोगप्रतिकारशक्ती वाढत नाही. मात्र सध्यातरी या पाहुण्यांनी भारतीय वातावरणाशी जुळवून घेतले असून नैसर्गिक अधिवासात गेल्यानंतरच त्यांच्यातील प्रतिकारशक्ती वाढेल आणि या वातावरणात टिकून राहण्याची त्यांची क्षमता समजेल, असा विश्वास डॉ. गिरडकर यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :nagpurनागपूर