शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

'हे' आहे चित्ता शावकांच्या मृत्यूचे कारण...; अभ्यासातील वास्तव 

By निशांत वानखेडे | Updated: May 28, 2023 19:10 IST

वर्षभरापूर्वी नामिबियामधून आणलेल्या आणि मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यात ठेवलेल्या चित्त्याच्या तीन शावकांच्या मृत्युमुळे वेगवेगळ्या शंकाकुशंका उपस्थित होत आहेत.

नागपूर : वर्षभरापूर्वी नामिबियामधून आणलेल्या आणि मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यात ठेवलेल्या चित्त्याच्या तीन शावकांच्या मृत्युमुळे वेगवेगळ्या शंकाकुशंका उपस्थित होत आहेत. चित्त्यांची प्रजाती भारतात टिकणारच नाही, अशी मते व्यक्त केली जात आहेत. मात्र चित्ते जगणार नाही, अशी भविष्यवाणी करणे चुकीचे आहे, असे मत चित्ता लेडी म्हणून प्रसिद्ध डॉ. प्रज्ञा गिरडकर यांनी व्यक्त केले. मात्र सध्या ते देखरेखीखाली बंदिवासात असून तेच त्यांच्या मृत्युचे कारण असल्याचे त्यांनी एका संशोधनावरून नमूद केले आहे. डॉ. प्रज्ञा गिरडकर या भारताच्या पहिल्या चित्ता संरक्षण म्हणून ओळखल्या जात असून नामिबियामध्ये राहून त्यांनी चित्त्यांच्या हालचालीवर अभ्यास केला आहे. त्यांनी अनुवंश शास्त्रज्ञ डॉ. स्टिफन ओब्रायन व डॉ. लॉरी मार्कर यांनी १९८५ साली सादर केलेल्या संशोध अहवालात चित्ता शावकांच्या मृत्युचे कारण नोंदविले आहे. वेगवेगळे वनक्षेत्र व चित्त्यांच्या अधिवासात शावकांच्या हालचालींचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या संशोधनानुसार बंदिवासात देखरेखीखाली असलेल्या चित्त्यांच्या शावकांचा मृत्युदर ७० टक्क्यांच्या वर असतो.

कुनो अभयारण्यात असलेल्या ज्वाला’ नामक मादी चित्त्याचे हे शावक असून आता केवळ एक शावक जिवंत राहिला आहे. डॉ. गिरडकर यांनी सांगितले चित्ता ही अतिशय संवेदनशील प्रजाती आहे. त्यांच्यामध्ये अनुवांशिक विविधता कमी असते. त्यामुळे तो अतिसंवेदनशील गटात गणला जातो. कधीकाळी एकट्या भारतात १०,००० चित्ते होते पण शिकारीमुळे त्यांचे अनैसर्गिक मृत्यु झाले व ही प्रजाती भारतातून नामशेष झाली. आता जगभरात केवळ ७००० चित्ते शिल्लक आहेत. गेल्या वर्षी नामिबियामधून चित्ते आणून एक प्रयोग केला जात आहे.  गिरडकर यांच्या मते आफ्रिकेत वाळवंटी प्रदेशात दिवसा अतिउष्णता व रात्री अति थंडी असते. अशा वातावरणात राहणारे चित्ते भारतीय वातावरणात रुळायला निश्चितच वेळ लागेल. बंदिवासात असल्याने त्यांना मुक्त संचार करण्यासाठी वाव मिळत नाही. त्यांच्यात हवी तशी रोगप्रतिकारशक्ती वाढत नाही. मात्र सध्यातरी या पाहुण्यांनी भारतीय वातावरणाशी जुळवून घेतले असून नैसर्गिक अधिवासात गेल्यानंतरच त्यांच्यातील प्रतिकारशक्ती वाढेल आणि या वातावरणात टिकून राहण्याची त्यांची क्षमता समजेल, असा विश्वास डॉ. गिरडकर यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :nagpurनागपूर