शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पतंगबाजी : नागपुरात १०० हून अधिक पक्षी नायलॉन मांजाचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 23:32 IST

एकीकडे नायलॉन मांजामुळे २० च्यावर माणसे गंभीर जखमी झाली असताना पक्ष्यांवरही संक्रांत बरसली आहे. वनविभागाच्या अंदाजानुसार मकरसंक्रांतीच्या एकाच दिवसात १०० पेक्षा अधिक पक्ष्यांचा बळी गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देउपचार केंद्रात ३० कबुतर, बगळे, घुबड, कोकीळ घारीवर उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बंदी असूनही सर्रासपणे झालेल्या नायलॉन मांजाच्या विक्रीमुळे अपेक्षेप्रमाणे व्हायचे ते दुष्परिणाम झालेच. एकीकडे नायलॉन मांजामुळे २० च्यावर माणसे गंभीर जखमी झाली असताना पक्ष्यांवरही संक्रांत बरसली आहे. वनविभागाच्या अंदाजानुसार मकरसंक्रांतीच्या एकाच दिवसात १०० पेक्षा अधिक पक्ष्यांचा बळी गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यापेक्षा अधिक जायबंदी झाले आहेत. दरम्यान वनविभागाने सुरू केलेल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दिवसभरात ५० च्यावर जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यात आले.वनविभागाच्या ट्रान्झिट सेंटरचे पक्षितज्ज्ञ डॉ. मयूर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार विभागाच्या आपात्कालीन संपर्क क्रमांकावर ६० च्यावर जागेहून पक्ष्यांच्या अपघाताबाबत माहिती आली. या पक्ष्यांना पक्षिमित्र कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले. त्यातील ५० च्यावर पक्ष्यांवर सध्या केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. यात कबुतर, घुबड व घारींची संख्या अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ट्रान्झिट केंद्रात ३० कबुतर, १० ते १२ बगळे, ४ घारींवर उपचार करण्यात आले. याशिवाय घुबड, कोकीळ, पोपट, शिक्रा आदी पक्ष्यांवरही उपचार करण्यात आल्याची माहिती डॉ. काटे यांनी दिली. नायलॉन मांजा झाडावर अडकला असल्याने रात्री भ्रमंती करणारे घुबड आणखी जखमी होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. यामधील किरकोळ जखमी झालेल्या काही पक्ष्यांना उपचारानंतर सोडून देण्यात आले. मात्र गंभीर जखमी असलेल्या पक्ष्यांना सेंटरमध्येच ठेवण्यात आले आहे. गंभीर असलेल्या काही पक्ष्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. साधारणत: महिनाभर त्यांच्यावर औषधोपचार करून ते सक्षम झाल्यावर त्यांना सोडून देण्यात येणार असल्याचेही डॉ. काटे यांनी स्पष्ट केले.दरम्यान एवढ्या पक्ष्यांवर उपचार सुरू असले तरी अनेक पक्षी जायबंदी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत पक्ष्यांचा आकडा आज मिळू शकला नसला तरी १०० हून अधिक पक्ष्यांचा बळी गेला असण्याची आणि यापेक्षा दुपटीने जायबंदी झाले असण्याची भीती डॉ. काटे यांनी व्यक्त केली. मकरसंक्रांतीनंतर गुरुवारी याबाबत माहिती मिळेल, अशी शक्यता त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

 

टॅग्स :kiteपतंगnagpurनागपूर