शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

संघप्रणीत किसान संघ केंद्राविरोधात रस्त्यांवर उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत भारतीय किसान संघाने परत एकदा केंद्र शासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत भारतीय किसान संघाने परत एकदा केंद्र शासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही पिकांना किमान आधारभूत किंमत लागू करून केंद्र सरकार जबाबदारी टाळू शकत नाही. ही आधारभूत किंमत ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात केलेली धूळफेकच आहे, असा आरोप लावत किसान संघाने रस्त्यांवर उतरण्याची भूमिका घेतली आहे. ८ सप्टेंबरला देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना उत्पादन मूल्य मिळत नसल्याने त्यांची गरिबी वाढत असून, कर्जाचा बोजा वाढतो आहे. क्षणिक मदतीतून शेतकरी संकटातून बाहेर निघू शकणार नाहीत. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनावर लाभ मिळाला पाहिजे. उत्पादन मूल्यावर सरकारचे नियंत्रण राहणे म्हणजे शेतकऱ्यांचे आयुष्य देशोधडीला लावण्याचा प्रकार असल्याचा किसान संघाचा सूर आहे. याबाबत व्यवस्थापन समितीच्या बैठकीत सखोल चर्चा झाली. त्यानंतर बैठकांचे सत्र चालले व केंद्राविरोधात आंदोलनाचा निर्णय झाला.

शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य भाव मिळावा यासाठी कठोर कायदा बनविण्याची गरज आहे. लाभदायक किमतीचा सरकारने कायदा आणावा, अन्यथा किसान संघ खासगी विधेयकाच्या माध्यमातून संसदेत कायदा बनविण्याची प्रक्रिया सुरू करेल, असे अखिल भारतीय संघटनमंत्री दिनेश कुलकर्णी यांनी सांगितले. जर ३१ ऑगस्टपर्यंत सरकारने सकारात्मक पाऊल उचलले नाही, तर ८ सप्टेंबरला सर्व जिल्हा केंद्रांवर एक दिवसीय आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. पत्रपरिषदेला प्रदेश संघटनमंत्री दादा लाड, विदर्भ प्रांत अध्यक्ष नाना आखरे, महामंत्री बापुसाहेब देशमुख, विदर्भ प्रांत संघटन मंत्री रमेश मंडाळे प्रामुख्याने उपस्थित होते.

किसान संघाच्या प्रमुख मागण्या

-शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत नको, तर उत्पादनाच्या आधारावर लाभदायक किंमत मिळावी.

-एकदा मूल्य घोषित झाल्यानंतर महागाईनुसार वास्तविक किंमत द्यावी

-घोषित किमतीहून कमीमध्ये विक्री झाली तर त्याला गुन्हा मानण्यात यावा.