शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

पत्नीसह मुलाची हत्या : नागपूर जिल्ह्यातील घोटमुंढरी येथील थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 20:07 IST

पहिल्या पत्नीने मुलासाठी पतीला त्याच्या मालकीच्या शेताचा हिस्सा मागितला. त्यामुळे संतप्त झालेल्या पतीने शांत डोक्याने पत्नीसह तरुण मुलाला शेतात नेले आणि दोघांचीही हत्या करून त्यांचे मृतदेह शेतात एकाच खड्ड्यात पुरले. दोघांचीही हत्या दगडाने ठेचून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. शिवाय, आरोपी पतीने समर्पण करून गुन्हा कबूल करीत घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. ही घटना अरोली (ता. मौदा) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खात नजीकच्या घोटमुंढरी शिवारात मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

ठळक मुद्देहत्येनंतर दोन्ही मृतदेह शेतात पुरले : शेतीच्या वाटणीवरून होता वाद

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर (खात) : पहिल्या पत्नीने मुलासाठी पतीला त्याच्या मालकीच्या शेताचा हिस्सा मागितला. त्यामुळे संतप्त झालेल्या पतीने शांत डोक्याने पत्नीसह तरुण मुलाला शेतात नेले आणि दोघांचीही हत्या करून त्यांचे मृतदेह शेतात एकाच खड्ड्यात पुरले. दोघांचीही हत्या दगडाने ठेचून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. शिवाय, आरोपी पतीने समर्पण करून गुन्हा कबूल करीत घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. ही घटना अरोली (ता. मौदा) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खात नजीकच्या घोटमुंढरी शिवारात मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.लता अनिरुद्ध बावणे (३८) व धीरज अनिरुद्ध बावणे (१८) अशी मृत आई व मुलाची नावे असून, अनिरुद्ध बावणे, सर्व रा. घोटमुंढरी, ता. मौदा असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. लता व अनिरुद्ध एकाच गावचे असून, त्यांनी १९ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. धीरजच्या जन्मानंतर त्या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि दोघेही वेगवेगळे राहू लागले. दरम्यान, अनिरुद्धने दुसरा विवाह केला. त्यामुळे लता तिचा मुलगा, आई व वडिलांसह काटोलला राहायला गेली. याच काळात त्यांचा वाद न्यायालयात पोहोचला. अनिरुद्ध तिला पोटगीही द्यायचा.दोन वर्षांपूर्वी या पती - पत्नीमध्ये समेट झाला आणि दोघेही नागपूरला राहू लागले. धीरजही त्यांच्यासोबत होता. लताला तिच्या मुलासाठी अनिरुद्धच्या संपत्तीतील हिस्सा हवा होता. त्यामुळे तिने अनिरुद्धकडे शेतीसाठी तगादा लावला होता. अनिरुद्ध आधीच नागपूरहून घोटमुंढरीला पोहोचला. त्यानंतर लता व धीरज मंगळवारी (दि. २७) घोटमुंढरीला गेले. 

दोघांनाही त्याने सायंकाळी शेत पाहण्याच्या निमित्ताने शेतात बोलावले. तिथे त्याने दोघांचीही दगडाने ठेचून हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने दोन्ही मृतदेह शेतात खोल खड्डा खोदून त्यात पुरले. दरम्यान, लता व धीरज बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी भंडारा पोलीस ठाण्यात नोंदविली. याची कुणकुण अनिरुद्धला लागली. पोलीस कारवाईच्या भीतीने त्याने सोमवारी मध्यरात्री अरोली पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला.पोलिसांनी मंगळवारी सकाळी त्याच्या शेतातील खड्ड्यातून दोन्ही मृतदेह बाहेर काढले व उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी नयन आलूरकर यांनी घटनास्थची पाहणी केली. याप्रकरणी अनिरुद्धला भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली.पूर्वनियोजित कट 
विशेष म्हणजे, ज्या खड्ड्यात अनिरुद्धने दोन्ही मृतदेह पुरले होते, तेथे त्याने मीठ टाकले होते. त्यामुळे त्याचा हा पूर्वनियोजित कट असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होते. दुसरी बाब म्हणजे, धीरज व त्याची आई लता दोघेही तरुण आहेत. या दोघांना एका व्यक्तीने दगडाने ठेचून मारणे शक्य नाही. कारण त्याने पहिल्यांदा दोघांपैकी एकास मारायला सुरुवात करताच, दुसऱ्याने प्रतिकार केला असेल किंवा आरडाओरड तरी केली असती. त्यामुळे या कटात अन्य आरोपी सहभागी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून