शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

नागपुरात  धकातेची हत्या दहशत निर्माण करण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 20:41 IST

गुन्हेगारांमधील आपसी वर्चस्वाच्या लढाईतूनच गोळीबार चौकाजवळ रविवारी रात्री अंकित धकातेची हत्या करण्यात आली. गुन्हेगारांच्या दोन टोळळ्यांमधील वर्चस्वाची लढाई या हत्येमागे आहे. त्याची हत्या करून आपल्या टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी अत्यंत क्रूरपणे धकातेची हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देगुन्हेगारांमधील वर्चस्वाची लढाई : दोघांना अटक, तीन फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हेगारांमधील आपसी वर्चस्वाच्या लढाईतूनच गोळीबार चौकाजवळ रविवारी रात्री अंकित धकातेची हत्या करण्यात आली. गुन्हेगारांच्या दोन टोळळ्यांमधील वर्चस्वाची लढाई या हत्येमागे आहे. त्याची हत्या करून आपल्या टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी अत्यंत क्रूरपणे धकातेची हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. तहसील पोलिसांनी हत्येचा सूत्रधार रोशन चिंचघरे आणि त्याचा साथीदार नितीन उर्फ मच्छी धकाते या दोघांना अटक केली. तर, गुन्ह्यांतील तीन आरोपी अद्याप फरार आहेत.अंकित रामू धकाते (रा. पाचपावली) हा जुना गुन्हेगार असून, तो सध्या मटका अड्डा चालवायचा. वर्चस्वाच्या लढाईमुळे चिचघरे टोळीसोबत गेल्या काही दिवसांपासून टोकाचे वैमनस्य होते. अंकितची या भागात चांगली चलती आहे. त्याचे अवैध धंदे सुरू आहेत. त्याचे कोणतेही काम होते, ही बाब आरोपींना खटकत होती. तो पोलिसांचा खबरी आहे, असाही आरोपींना संशय आहे. त्यामुळे अंकितचे शत्रू त्याचा गेम करण्याची संधी शोधत होते. रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास अंकित तहसीलमध्ये आला. तो गोळबार चौकाजवळच्या पटवी गल्लीतून जात असताना आरोपी रोशन चिंचघरे (वय २२), अंकूश चिंचघरे (वय २५) आणि सचिन चिंचघरे तसेच नितीन उर्फ मच्छी आणि राहुल (रा. सर्व पाचपावली) यांनी अंकितला घेरले. त्याच्यावर सत्तूर, गुप्तीसारख्या शस्त्राचे अनेक घाव घालून त्याची हत्या केली. आरोपींनी अंकितला एवढ्या निर्दयपणे मारले की त्याचा एक हात मनगटापासून तोडून टाकला. अत्यंत वर्दळीच्या भागात झालेल्या या अमानुष हत्याकांडामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. माहिती कळताच तहसीलचे ठाणेदार अजयकुमार मालवीय आपल्या सहका-यांसह आरोपींच्या शोधासाठी कामी लागले होते. सोमवारी पहाटे त्यांनी आरोपी रोशन आणि नितीनला ताब्यात घेतले. अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे.आरोपींच्या मनात होती भीतीवर्षभरापूर्वी मित्र असलेल्या अंकित आणि आरोपी चिंचघरे टोळीत अलिकडे नेहमीच वाद व्हायचे. त्यांच्यात एक महिन्यापूर्वी कडाक्याचे भांडण झाले होते. यावेळी त्यांनी एकमेकांना संपविण्याची भाषा वापरली होती. अंकितचा गेम केला नाही तर तो आपल्याला संपवेल अशी चिंचघरे टोळीतील आरोपींना भीती वाटत होती. त्याचमुळे त्यांनी अंकितची हत्या केली.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर