शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

नागपुरात  धकातेची हत्या दहशत निर्माण करण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 20:41 IST

गुन्हेगारांमधील आपसी वर्चस्वाच्या लढाईतूनच गोळीबार चौकाजवळ रविवारी रात्री अंकित धकातेची हत्या करण्यात आली. गुन्हेगारांच्या दोन टोळळ्यांमधील वर्चस्वाची लढाई या हत्येमागे आहे. त्याची हत्या करून आपल्या टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी अत्यंत क्रूरपणे धकातेची हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देगुन्हेगारांमधील वर्चस्वाची लढाई : दोघांना अटक, तीन फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हेगारांमधील आपसी वर्चस्वाच्या लढाईतूनच गोळीबार चौकाजवळ रविवारी रात्री अंकित धकातेची हत्या करण्यात आली. गुन्हेगारांच्या दोन टोळळ्यांमधील वर्चस्वाची लढाई या हत्येमागे आहे. त्याची हत्या करून आपल्या टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी अत्यंत क्रूरपणे धकातेची हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. तहसील पोलिसांनी हत्येचा सूत्रधार रोशन चिंचघरे आणि त्याचा साथीदार नितीन उर्फ मच्छी धकाते या दोघांना अटक केली. तर, गुन्ह्यांतील तीन आरोपी अद्याप फरार आहेत.अंकित रामू धकाते (रा. पाचपावली) हा जुना गुन्हेगार असून, तो सध्या मटका अड्डा चालवायचा. वर्चस्वाच्या लढाईमुळे चिचघरे टोळीसोबत गेल्या काही दिवसांपासून टोकाचे वैमनस्य होते. अंकितची या भागात चांगली चलती आहे. त्याचे अवैध धंदे सुरू आहेत. त्याचे कोणतेही काम होते, ही बाब आरोपींना खटकत होती. तो पोलिसांचा खबरी आहे, असाही आरोपींना संशय आहे. त्यामुळे अंकितचे शत्रू त्याचा गेम करण्याची संधी शोधत होते. रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास अंकित तहसीलमध्ये आला. तो गोळबार चौकाजवळच्या पटवी गल्लीतून जात असताना आरोपी रोशन चिंचघरे (वय २२), अंकूश चिंचघरे (वय २५) आणि सचिन चिंचघरे तसेच नितीन उर्फ मच्छी आणि राहुल (रा. सर्व पाचपावली) यांनी अंकितला घेरले. त्याच्यावर सत्तूर, गुप्तीसारख्या शस्त्राचे अनेक घाव घालून त्याची हत्या केली. आरोपींनी अंकितला एवढ्या निर्दयपणे मारले की त्याचा एक हात मनगटापासून तोडून टाकला. अत्यंत वर्दळीच्या भागात झालेल्या या अमानुष हत्याकांडामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. माहिती कळताच तहसीलचे ठाणेदार अजयकुमार मालवीय आपल्या सहका-यांसह आरोपींच्या शोधासाठी कामी लागले होते. सोमवारी पहाटे त्यांनी आरोपी रोशन आणि नितीनला ताब्यात घेतले. अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे.आरोपींच्या मनात होती भीतीवर्षभरापूर्वी मित्र असलेल्या अंकित आणि आरोपी चिंचघरे टोळीत अलिकडे नेहमीच वाद व्हायचे. त्यांच्यात एक महिन्यापूर्वी कडाक्याचे भांडण झाले होते. यावेळी त्यांनी एकमेकांना संपविण्याची भाषा वापरली होती. अंकितचा गेम केला नाही तर तो आपल्याला संपवेल अशी चिंचघरे टोळीतील आरोपींना भीती वाटत होती. त्याचमुळे त्यांनी अंकितची हत्या केली.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर