शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

अग्रवाल यांना निर्जन ठिकाणी नेऊन वसुलणार होते खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 21:20 IST

हल्दीराम फूड प्रा. लि. कंपनीचे मालक राजेंद्र अग्रवाल यांचे अपहरण करून त्यांना निर्जन ठिकाणी न्यायचे आणि अग्रवाल यांच्या नातेवाईकांकडून खंडणीची रक्कम मागायची, असा आरोपींचा कट होता. पोलिसांच्या तपासात आरोपींनी या प्रकारची कबुलीजबाबवजा माहिती तपास अधिकाऱ्यांना दिली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देहल्दीरामच्या मालकाच्या अपहरणाचा कट : आरोपींनी दिली पोलिसांना माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हल्दीराम फूड प्रा. लि. कंपनीचे मालक राजेंद्र अग्रवाल यांचे अपहरण करून त्यांना निर्जन ठिकाणी न्यायचे आणि अग्रवाल यांच्या नातेवाईकांकडून खंडणीची रक्कम मागायची, असा आरोपींचा कट होता. पोलिसांच्या तपासात आरोपींनी या प्रकारची कबुलीजबाबवजा माहिती तपास अधिकाऱ्यांना दिली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तविली आहे.मध्यभारतातील व्यापारी-उद्योजकांत प्रचंड खळबळ निर्माण करणाऱ्या या प्रकरणाचा उलगडा करून धंतोली पोलिसांनी २ जुलैच्या रात्री टळलेल्या या अपहरण कांडाचा सूत्रधार पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०, रा. हिवरीनगर), सौरभ भीमराव चव्हाण (वय २१), रोहित राजेंद्र घुमडे (वय २९), अतुल गोपाळ पाटील (वय २४), विनोद भूमेश्वर गेडाम (वय २३) यांना अटक केली. न्यायालयातून त्यांची ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे. त्यांचा साथीदार बाळू ऊर्फ नीलेश अंबाडरे (वय २७, रा. इमामवाडा) हा फरार आहे.अटकेतील आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली एक मारुती व्हॅनही जप्त केली आहे. या आरोपींची गेल्या ४८ तासांपासून पोलीस चौकशी करीत आहेत. त्यांनी या गुन्ह्यात आणखी काही आरोपी असल्याची कबुली पोलिसांना दिल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, अग्रवाल यांना कळमेश्वर मार्गावर एका निर्जन ठिकाणी नेऊन तेथून त्यांच्या नातेवाईकांना फोन करायचा आणि खंडणीची रक्कम वसूल करायची, असाही आरोपींचा कट होता,असे आरोपींनी सांगितल्याचे समजते.

टॅग्स :Crimeगुन्हाKidnappingअपहरण