शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
4
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
5
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
6
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
9
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
10
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
11
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
12
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
13
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
14
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
15
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
16
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?

संग्राम बारमध्ये ‘खुनी संग्राम’

By admin | Updated: June 11, 2014 01:38 IST

आॅर्केस्ट्रातील गाण्यावर बारबालांचे थिरकणे सुरू असतानाच एका गाण्याच्या फर्माईशवरून काल मध्यरात्री कोतवाली हद्दीतील जगनाडे चौकानजीकच्या संग्राम बारमध्ये झालेल्या खुनी संग्रामात एक ठार आणि अन्य एक

गाण्याची फर्माईश कारणीभूत : एक ठार, एक जखमीनागपूर : आॅर्केस्ट्रातील गाण्यावर बारबालांचे थिरकणे सुरू असतानाच एका गाण्याच्या फर्माईशवरून काल मध्यरात्री कोतवाली हद्दीतील जगनाडे चौकानजीकच्या संग्राम बारमध्ये झालेल्या खुनी संग्रामात एक ठार आणि अन्य एक जण गंभीररीत्या जखमी झाला. या घटनेने जगनाडे चौक परिसरात आणि सीताबर्डी भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. सुमित सुरेश तिवारी (३०), असे मृताचे नाव आहे. मोहम्मद रियाज हक (३०), असे जखमीचे नाव आहे. ते सीताबर्डी टेम्पल बाजार पिंजारी गल्ली येथील रहिवासी आहेत. नगरसेवक प्रशांत धवड यांच्या पत्नीच्या नावे हा बार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बारला आॅर्केस्ट्राचा (मनोरंजन) परवाना आहे. परवान्याआड अधूनमधून या बारमध्ये ‘डान्स’ चालतात. आॅर्केस्ट्रात गाणाऱ्या दोन तरुणींसह एकूण सहा बाला या बारमध्ये असतात. या बालांचा पुरवठा राजू दलाल करीत असतो. सात-आठ वर्षांपूर्वी त्याच्याच भरवशावर सीताबर्डीत शेरे पंजाबमध्ये ‘डान्स फ्लोअर’ चालायचा. या प्रकरणातील मृत सुमित तिवारी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याने काही वर्षांपूर्वी सीताबर्डी भागात कल्लू यादव आणि गाडगीलवार , अशा दोन जणांचा खून केलेला आहे.डान्स चालू है क्या?या दोन्ही खुनात सबळ पुराव्या अभावी संशयाचा लाभ मिळून तो निर्दोष सुटला होता. सोमवारी रात्री सुमित तिवारी हा सीताबर्डीतीलच त्याचे मित्र मोहम्मद सलाम मोहम्मद सुफी (४७), मोहम्मद रियाज आणि आणखी दोन-तीन जणांसोबत हॉटेल राजसन्समध्ये बसले होते. त्यांना डान्स पाहण्याची इच्छा झाली. रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांनी संग्राम बारचा व्यवस्थापक किशोर याला फोन करून ‘डान्स चालू है क्या’, अशी विचारणा केली. त्याने होकार देताच मोहम्मद सलाम, रियाज आणि सुमित हे दोन अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन संग्राम बारमध्ये दाखल झाले. रात्री १.३० ते १.४५ वाजताच्या सुमारास कार्यक्रम रंगात आलेला असतानाच मोहम्मद सलाम याने आपल्या आवडत्या गाण्याची फर्माईश केली. त्यामुळे इतर चार-पाच अनोळखी लोक चिडले. त्यांच्यात भांडण झाले. परिणामी अनोळखी लोकांनी सलामसोबतच्या मोहम्मद रियाज याच्यावर सशस्त्र हल्ला केला. त्याला वाचविण्यासाठी सुमित तिवारी धावला असता त्याला या अनोळखी हल्लेखोरांनी सशस्त्र हल्ला करून आणि दगडाने ठेचून घटनास्थळीच ठार केले. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली आणि पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस ताफ्याने घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी मृत सुमित याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल कॉलेज इस्पितळाकडे रवाना केला. मोहम्मद सलाम याच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी अनोळखी लोकांविरुद्ध भादंविच्या १४३, १४७, १४८, ३०२, भारतीय हत्यार कायद्याच्या ४/२५ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अद्यापही आरोपींना अटक केलेली नाही. मात्र संशयित म्हणून बार मॅनेजर, वेटर, इतर कर्मचारी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेरा होता. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हल्लेखोरांची माहिती जाणून घेतली जात आहे. सुमितचा खून सिंबले बंधू आणि साथीदारांनी केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान जखमी मोहम्मद रियाज याला धंतोलीच्या श्युअरटेक इस्पितळात दाखल करण्यात आलेले आहे. (प्रतिनिधी)