शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
3
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
4
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
5
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवस्त्र' पाहिलं का?
7
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
8
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
9
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
10
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
11
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
12
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
14
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
15
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
16
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
17
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
18
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
19
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
20
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

खिंडसी पूरक कालवा थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:08 IST

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : सिंचनाची समस्या सुटावी म्हणून खिंडसी पूरक कालवा ही महत्त्वाकांक्षी याेजना तयार ...

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : सिंचनाची समस्या सुटावी म्हणून खिंडसी पूरक कालवा ही महत्त्वाकांक्षी याेजना तयार करण्यात आली. त्यात पेंच जलाशयातील पाणी खिंडसी जलाशयात साेडून ते सिंचनासाठी वापरले जाणार हाेते. पेंच नदीवरील चाैराई धरणामुळे (मध्य प्रदेश) पेंच जलाशयातील पाणीसाठ्यावर विपरीत परिणाम झाला. पेंचमधील पाणीसाठा पूर्ववत ठेवण्यासाठी राज्य शासनाने कन्हान वळण प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यामुळे या प्रकल्पावर खिंडसी पूरक कालवा याेजनेचे भवितव्य अवलंबून आहे.

रामटेक तालुक्यात १५७ गावे आहेत. यातील केवळ २७ गावांना पेंच जलाशयाचे पाणी उपलब्ध हाेते. त्यामुळे इतर गावातील शेतकऱ्यांना काेरडवाहू शेती करावी लागते. ही समस्या साेडविण्यासाठी तसेच शेतीची उत्पादकता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने २०१० साली खिंडसी पूरक कालवा याेजनेला मंजुरी दिली. त्यावेळी या याेजनेचा प्रस्तावित खर्च २०७.०९ काेटी रुपये असल्याचे सांगण्यात आले हाेते. त्यानंतर या याेजनेची किंमत वाढली. यात पेंचमधील पाणी कालवा व टनलच्या माध्यमातून खिंडसीमध्ये साेडले जाणार हाेते. वन विभागाची आडकाठीही दूर करण्यात आली. या याेजनेवर २०० काेटी रुपयापेक्षा अधिक खर्च करण्यात आला असून, अंदाजे १० किमी कालव्याचे व त्यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या अधिग्रहणाचे काम शिल्लक आहे.

मध्य प्रदेशातील चाैराई धरणामुळे पेंच नदीवरील ताेतलाडाेह व पेंच या दाेन्ही जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्याने नवीन समस्या निर्माण झाली. ही समस्या साेडविण्यासाठी राज्य शासनाने कन्हान वळण प्रकल्पाला मंजुरी दिली. यात लाव्हाघाेघरी (मध्य प्रदेश) येथील कन्हान नदीवर असलेल्या तलावातील पाणी डब्ल्यूएपीसीओएसमार्फत ताेतलाडाेहमध्ये साेडले जाणार आहे. यासाठी तयार करण्यात येणाऱ्या टनलची लांबी ६० किमी असून, सहा मीटर गाेलाईचे पाईप वापरले जाणार आहेत.

या याेजनेद्वारे ताेतलाडाेहमधील २८४ दलघमी पाणी वाढविणे शक्य हाेणार आहे. यासाठी २,२८३ काेटी रुपयाचा खर्च प्रस्तावित असून, यासाठी फक्त ५० हेक्टर वनविभागाच्या जमिनीचा वापर केला जाणार आहे. खिंडसी पूरक कालवा याेजना मार्गी लावण्यासाठी लाेकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा तसेच शासनाकडून निधी मंजूर करवून घेत उर्वरित प्रक्रिया व काम पूर्ण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

...

जामघाट प्रकल्प बारगळला

रामटेक तालुक्यातील जामघाट प्रकल्पाला सन १९७० मध्ये मंजुरी देेण्यात आली. या प्रकल्पाला १,५०० हेक्टर वनजमीन लागत असल्याने वन विभागाने जमीन देण्यात नकार दिला आणि हा प्रकल्प बारगळला. या प्रकल्पाची किंमत ४,५४६ काेटी रुपये आकारण्यात आली हाेती. याला पर्याय म्हणून कन्हान वळण प्रकल्पाला शासनाने मंजुरी प्रदान केली. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांची नागपूर येथे नुकतीच एक बैठक पार पडली. परंतु, या बैठकीत खिंडसी पूरक कालवा याेजनेचा शब्दही उच्चारण्यात आला नाही.

...

दाेन याेजना प्रभावित

चाैराई धरणामुळे रामटेक तालुक्यातील खिंडसी पूरक कालवा याेजना व सत्रापूर उपसा सिंचन याेजना प्रभावित झाली आहे. खिंडसी पूरक कालवा याेजनेमुळे तालुक्यातील २,४९३ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार हाेती. खिंडसी जलाशयाची पाणी साठवण क्षमता १०४ दलघमीची असून, त्यात ६७ दलघमीच्यावर पाणीसाठा राहिल्यास उर्वरित पाणी सिंचनासाठी दिले जाणार हाेते. या याेजनेसाठी खिंडसी परिसरातील शेतकऱ्यांनी जमीन अधिग्रहणाला परवानगीही दिली. परंतु, ही याेजना थंडबस्त्यात जाण्याची शक्यता बळावल्याने शेतकऱ्यांच्या ताेंडचे पाणी पळाले आहे.