शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

खिंडसी पूरक कालवा थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:08 IST

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : सिंचनाची समस्या सुटावी म्हणून खिंडसी पूरक कालवा ही महत्त्वाकांक्षी याेजना तयार ...

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : सिंचनाची समस्या सुटावी म्हणून खिंडसी पूरक कालवा ही महत्त्वाकांक्षी याेजना तयार करण्यात आली. त्यात पेंच जलाशयातील पाणी खिंडसी जलाशयात साेडून ते सिंचनासाठी वापरले जाणार हाेते. पेंच नदीवरील चाैराई धरणामुळे (मध्य प्रदेश) पेंच जलाशयातील पाणीसाठ्यावर विपरीत परिणाम झाला. पेंचमधील पाणीसाठा पूर्ववत ठेवण्यासाठी राज्य शासनाने कन्हान वळण प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यामुळे या प्रकल्पावर खिंडसी पूरक कालवा याेजनेचे भवितव्य अवलंबून आहे.

रामटेक तालुक्यात १५७ गावे आहेत. यातील केवळ २७ गावांना पेंच जलाशयाचे पाणी उपलब्ध हाेते. त्यामुळे इतर गावातील शेतकऱ्यांना काेरडवाहू शेती करावी लागते. ही समस्या साेडविण्यासाठी तसेच शेतीची उत्पादकता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने २०१० साली खिंडसी पूरक कालवा याेजनेला मंजुरी दिली. त्यावेळी या याेजनेचा प्रस्तावित खर्च २०७.०९ काेटी रुपये असल्याचे सांगण्यात आले हाेते. त्यानंतर या याेजनेची किंमत वाढली. यात पेंचमधील पाणी कालवा व टनलच्या माध्यमातून खिंडसीमध्ये साेडले जाणार हाेते. वन विभागाची आडकाठीही दूर करण्यात आली. या याेजनेवर २०० काेटी रुपयापेक्षा अधिक खर्च करण्यात आला असून, अंदाजे १० किमी कालव्याचे व त्यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या अधिग्रहणाचे काम शिल्लक आहे.

मध्य प्रदेशातील चाैराई धरणामुळे पेंच नदीवरील ताेतलाडाेह व पेंच या दाेन्ही जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्याने नवीन समस्या निर्माण झाली. ही समस्या साेडविण्यासाठी राज्य शासनाने कन्हान वळण प्रकल्पाला मंजुरी दिली. यात लाव्हाघाेघरी (मध्य प्रदेश) येथील कन्हान नदीवर असलेल्या तलावातील पाणी डब्ल्यूएपीसीओएसमार्फत ताेतलाडाेहमध्ये साेडले जाणार आहे. यासाठी तयार करण्यात येणाऱ्या टनलची लांबी ६० किमी असून, सहा मीटर गाेलाईचे पाईप वापरले जाणार आहेत.

या याेजनेद्वारे ताेतलाडाेहमधील २८४ दलघमी पाणी वाढविणे शक्य हाेणार आहे. यासाठी २,२८३ काेटी रुपयाचा खर्च प्रस्तावित असून, यासाठी फक्त ५० हेक्टर वनविभागाच्या जमिनीचा वापर केला जाणार आहे. खिंडसी पूरक कालवा याेजना मार्गी लावण्यासाठी लाेकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा तसेच शासनाकडून निधी मंजूर करवून घेत उर्वरित प्रक्रिया व काम पूर्ण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

...

जामघाट प्रकल्प बारगळला

रामटेक तालुक्यातील जामघाट प्रकल्पाला सन १९७० मध्ये मंजुरी देेण्यात आली. या प्रकल्पाला १,५०० हेक्टर वनजमीन लागत असल्याने वन विभागाने जमीन देण्यात नकार दिला आणि हा प्रकल्प बारगळला. या प्रकल्पाची किंमत ४,५४६ काेटी रुपये आकारण्यात आली हाेती. याला पर्याय म्हणून कन्हान वळण प्रकल्पाला शासनाने मंजुरी प्रदान केली. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांची नागपूर येथे नुकतीच एक बैठक पार पडली. परंतु, या बैठकीत खिंडसी पूरक कालवा याेजनेचा शब्दही उच्चारण्यात आला नाही.

...

दाेन याेजना प्रभावित

चाैराई धरणामुळे रामटेक तालुक्यातील खिंडसी पूरक कालवा याेजना व सत्रापूर उपसा सिंचन याेजना प्रभावित झाली आहे. खिंडसी पूरक कालवा याेजनेमुळे तालुक्यातील २,४९३ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार हाेती. खिंडसी जलाशयाची पाणी साठवण क्षमता १०४ दलघमीची असून, त्यात ६७ दलघमीच्यावर पाणीसाठा राहिल्यास उर्वरित पाणी सिंचनासाठी दिले जाणार हाेते. या याेजनेसाठी खिंडसी परिसरातील शेतकऱ्यांनी जमीन अधिग्रहणाला परवानगीही दिली. परंतु, ही याेजना थंडबस्त्यात जाण्याची शक्यता बळावल्याने शेतकऱ्यांच्या ताेंडचे पाणी पळाले आहे.