शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

नागपुरातील खाऊगल्ली बनली असामाजिक तत्त्वांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 22:30 IST

महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत यांनी खाऊगल्लीची संकल्पना बजेटमध्ये ठेवली होती. रमण विज्ञान केंद्रासमोरील जागेची निवड करण्यात आली होती. ८० लाख खर्च करून येथे प्लॉस्टिकचे डोम तयार करण्यात आले. लाखो रुपये खर्चून टाईल्स लावण्यात आल्या, आवश्यक सोयीसुविधा विकसित करण्यात आल्या. परंतु अडीच वर्षानंतरही खाऊगल्लीच्या उद्घाटनाचा मुहूर्त निघाला नाही. आज खाऊगल्लीची दुरावस्था झाली आहे. तिथे असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनला आहे.

ठळक मुद्देलाखोंचा झाला खर्च : उद्घाटनाच्या प्रतिक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत यांनी खाऊगल्लीची संकल्पना बजेटमध्ये ठेवली होती. रमण विज्ञान केंद्रासमोरील जागेची निवड करण्यात आली होती. ८० लाख खर्च करून येथे प्लॉस्टिकचे डोम तयार करण्यात आले. लाखो रुपये खर्चून टाईल्स लावण्यात आल्या, आवश्यक सोयीसुविधा विकसित करण्यात आल्या. परंतु अडीच वर्षानंतरही खाऊगल्लीच्या उद्घाटनाचा मुहूर्त निघाला नाही. आज खाऊगल्लीची दुरावस्था झाली आहे. तिथे असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनला आहे.खाऊगल्लीमध्ये ३० डोम लावण्यात आले आहे. हे डोम तुटलेले आहे. टाईल्स निघालेल्या आहे. ज्या सुविधा करण्यात आल्या होत्या. त्या सुद्धा आता अस्ताव्यस्त झाल्या आहे. आता तर खाऊगल्ली ही असामाजिक तत्त्वांचा अड्डा झाला आहे. अंधार झाला की, दारुड्यांची मैफिल, अमली पदार्थांचे सेवन करणारे येथे दिसतात. दुपारच्या सुमारास भिकारी येथे झोपा काढतात. प्रेमी युगुलही अश्लील चाळे येथे करीत असतात. ज्या उद्देशाने खाऊगल्ली साकारण्यात आली होती आज तिची दुरवस्था झाली आहे.विशेष म्हणजे बंडू राऊत यांच्यानंतर स्थायी समितीच्या कुठल्याच अध्यक्षांनी खाऊगल्लीबाबत उत्साह दाखविला नाही. स्थानिक काँग्रेसचे नगरसेवक हर्षला मनोज साबळे यांनी खाऊगल्ली सुरू करण्यासंदर्भात अनेकदा प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही.दर जास्त असल्यामुळे दुकान घ्यायला कुणी तयार नाहीखाऊगल्लीमध्ये दुकान लावण्यासाठी अनेकवेळा उद्यान विभागामार्फत निविदा काढण्यात आल्या. परंतु निविदा भरण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार एका दुकानदाराकडून १० हजार रुपये महिना भाडे घेण्याचा प्रस्ताव आहे व १० हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा द्यायचे आहे. त्याचबरोबर काही अटी आणि शर्तीही ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे या गल्लीची रौनक अद्यापही येऊ शकली नाही.भाडे अर्धे करावे - साबळेनगरसेवक हर्षला साबळे यांचे म्हणणे आहे की, खाऊगल्लीची संकल्पना खरंच चांगली होती. मात्र मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे याचे उद्घाटन होऊ शकले नाही. भाडे १० हजाराऐवजी ५ हजार रुपये ठेवणे आवश्यक होते. सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा घ्यायला नको. पहिले खाऊगल्लीचे उद्घाटन होणे गरजेचे आहे. लोक जसजसे येतील, तसतसा किराया वाढवायला हरकत नाही. खाऊगल्लीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे सर्व नासधूस झाली आहे. त्यामुळे खाऊगल्लीचे उद्घाटन होणे गरजेचे आहे. जर मनपा प्रशासनाने लवकरच पावले उचलली नाही, तर पावसाळ्यानंतर येथे हॉकर्सला बसवावे लागेल.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका