शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नागपुरात खर्रा-सिगारेटची होतेय ब्लॅकमार्केटिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 18:55 IST

कोरोनाचे संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावत आहेत. सगळी दुकाने बंद आहेत. पानठेले सुद्धा बंद करण्यात आली आहेत. असे असतानाही काही नागरिक कायद्या धाब्यावर ठेऊन आपले व्यवहार करत असल्याचे दिसून येते. शहरात अनेक ठिकाणी खर्रा व सिगारेटचे ब्लॅकमार्केटिंग सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.

ठळक मुद्देपं. मालवीयनगर चौकात सर्रास होतेय विक्रीपोलीसांच्या हातावर तुरी देऊन शौकीन पडताहेत बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावत आहेत. सगळी दुकाने बंद आहेत. पानठेले सुद्धा बंद करण्यात आली आहेत. असे असतानाही काही नागरिक कायद्या धाब्यावर ठेऊन आपले व्यवहार करत असल्याचे दिसून येते. शहरात अनेक ठिकाणी खर्रा व सिगारेटचे ब्लॅकमार्केटिंग सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.वर्धा महामार्गावरील पं. मालवीयनगर चौकात खर्रा व सिगारेटचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते. जयप्रकाशनगर ते पांडे ले-आऊट दरम्यान पूर्वीच्या विज माता मंदिरापासून जाणाऱ्या जयताळा रोडवर हा प्रकार दिसून येत आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात केवळ भाजी-फळ विक्रेत्यांना ठेले लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. दैनंदित अत्यावश्यक सेवेत येणाºया या सेवा नागरिकांची धावपळ होऊ नये म्हणून ही सुविधा शासनातर्फे मुक्त करण्यात आली आहे. मात्र, या सेवेच्या नावाखाली काही व्यावसायिक आरोग्याशी खेळ करत असल्याचे दिसून येते. फळ व भाजी विके्रत्यांकडे हे व्यावसायिक खर्रा व सिगारेटचे पुडे ठेवत आहेत. पोलीस सहसा भाजीविके्रत्यांना व फळ विक्रेत्यांना जाब विचारत नसल्याचा हा गैरफायदा घेतला जात असल्याचे स्पष्ट होत आहेत. फळ आणि भाज्यांच्या ढिगाºयाखाली या वस्तू ठेऊन व्यसनाधिन व्यक्तीची ओळख झाली की त्यांना खर्रा व सिगारेट विकले जात आहे. जो खर्रा सामान्य काळात २० रुपयाला विकला जात होता, तोच खर्रा ४५ रुपयांना विकला जात आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे खर्रे १५० रुपयापर्यंत विकले जात आहेत तर सिगारेटची एक कांडी २५ ते ३० रुपयाला विकली जात आहे. विशेष म्हणजे, व्यसनाधिन माणसे सर्रास खरेदी करत आहेत आणि यामुळे लोक घराबाहेर पडत असल्याचे दिसून येते. पोलीसांची गाडी दिसताच सर्वत्र शांतता असते. गाडी केली लगेच फळ व भाजीविके्रत्यांकडे एकामागून एक व्यसनी व्यक्ती खर्रा व सिगारेट खरेदी करण्यासाठी येत असल्याचे चित्र सकाळ ते संध्याकाळ दिसून येत आहे. केवळ नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी पोलीस यंत्रणा भर उन्हात आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, विके्रत्यांना त्यांच्या परीश्रमाचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. अशाच प्रकारचा गोरखधंदा सोमवारी क्वार्टर, खरबी, वाठोडा, नंदनवन झोपडपट्टी, वर्धमाननगर, महाल या भागात फळ, भाजी विक्रेत्यांच्या व किरणा दुकानाच्या आळ केला जात आहे. याकडे प्रशासनाने विशेषत्त्वाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस