शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

नागपुरात खर्रा-सिगारेटची होतेय ब्लॅकमार्केटिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 18:55 IST

कोरोनाचे संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावत आहेत. सगळी दुकाने बंद आहेत. पानठेले सुद्धा बंद करण्यात आली आहेत. असे असतानाही काही नागरिक कायद्या धाब्यावर ठेऊन आपले व्यवहार करत असल्याचे दिसून येते. शहरात अनेक ठिकाणी खर्रा व सिगारेटचे ब्लॅकमार्केटिंग सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.

ठळक मुद्देपं. मालवीयनगर चौकात सर्रास होतेय विक्रीपोलीसांच्या हातावर तुरी देऊन शौकीन पडताहेत बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावत आहेत. सगळी दुकाने बंद आहेत. पानठेले सुद्धा बंद करण्यात आली आहेत. असे असतानाही काही नागरिक कायद्या धाब्यावर ठेऊन आपले व्यवहार करत असल्याचे दिसून येते. शहरात अनेक ठिकाणी खर्रा व सिगारेटचे ब्लॅकमार्केटिंग सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.वर्धा महामार्गावरील पं. मालवीयनगर चौकात खर्रा व सिगारेटचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते. जयप्रकाशनगर ते पांडे ले-आऊट दरम्यान पूर्वीच्या विज माता मंदिरापासून जाणाऱ्या जयताळा रोडवर हा प्रकार दिसून येत आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात केवळ भाजी-फळ विक्रेत्यांना ठेले लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. दैनंदित अत्यावश्यक सेवेत येणाºया या सेवा नागरिकांची धावपळ होऊ नये म्हणून ही सुविधा शासनातर्फे मुक्त करण्यात आली आहे. मात्र, या सेवेच्या नावाखाली काही व्यावसायिक आरोग्याशी खेळ करत असल्याचे दिसून येते. फळ व भाजी विके्रत्यांकडे हे व्यावसायिक खर्रा व सिगारेटचे पुडे ठेवत आहेत. पोलीस सहसा भाजीविके्रत्यांना व फळ विक्रेत्यांना जाब विचारत नसल्याचा हा गैरफायदा घेतला जात असल्याचे स्पष्ट होत आहेत. फळ आणि भाज्यांच्या ढिगाºयाखाली या वस्तू ठेऊन व्यसनाधिन व्यक्तीची ओळख झाली की त्यांना खर्रा व सिगारेट विकले जात आहे. जो खर्रा सामान्य काळात २० रुपयाला विकला जात होता, तोच खर्रा ४५ रुपयांना विकला जात आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे खर्रे १५० रुपयापर्यंत विकले जात आहेत तर सिगारेटची एक कांडी २५ ते ३० रुपयाला विकली जात आहे. विशेष म्हणजे, व्यसनाधिन माणसे सर्रास खरेदी करत आहेत आणि यामुळे लोक घराबाहेर पडत असल्याचे दिसून येते. पोलीसांची गाडी दिसताच सर्वत्र शांतता असते. गाडी केली लगेच फळ व भाजीविके्रत्यांकडे एकामागून एक व्यसनी व्यक्ती खर्रा व सिगारेट खरेदी करण्यासाठी येत असल्याचे चित्र सकाळ ते संध्याकाळ दिसून येत आहे. केवळ नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी पोलीस यंत्रणा भर उन्हात आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, विके्रत्यांना त्यांच्या परीश्रमाचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. अशाच प्रकारचा गोरखधंदा सोमवारी क्वार्टर, खरबी, वाठोडा, नंदनवन झोपडपट्टी, वर्धमाननगर, महाल या भागात फळ, भाजी विक्रेत्यांच्या व किरणा दुकानाच्या आळ केला जात आहे. याकडे प्रशासनाने विशेषत्त्वाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस