शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अन् खैरी गावात पोहोचली एसटी

By admin | Updated: March 30, 2016 03:10 IST

दुर्गम गावात एसटी बस येण्याचा आनंदोत्सव या प्रगत काळात साजरा होत असेल तर कुणालाही नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

महिला नागरिकांचा आनंदोत्सव : मुलींचा शैक्षणिक प्रवास होणार सुलभनागपूर : दुर्गम गावात एसटी बस येण्याचा आनंदोत्सव या प्रगत काळात साजरा होत असेल तर कुणालाही नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे उलटूनही एसटी बसच्या सुविधेपासून गाव वंचित असेल, याची कल्पनाही आपण करू शकत नाही. परंतु तसे झाले आहे. राज्याच्या उपराजधानीपासून ४० किमी अंतरावर अडेगाव मार्गावर जंगल व डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या खैरी (सीता) या दुर्गम गावात रविवारी (दि. २७) एसटी बस सुरू झाली. गावात एसटी पोहोचताच महिला नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. सुमारे ४०० लोकवस्ती असलेल्या या आदिवासीबहुल गावात एसटी बससेवा सुरू झाली. तीन किलोमीटर अंतरावरील अडेगाव फाट्यावरून वाजतगाजत आणि गुलाल उधळत महिलांनी नाचत गावात बस आणली. खैरी सीता हे गाव नागपूर-अमरावती महामार्गावरील शिवासावंगा गावापासून १५ किमी अंतरावर वसले आहे. चांगला डांबरी रस्ता, दुतर्फा वृक्षांची रांगच-रांग, सभोवताली डोंगर, त्यापैकी एका डोंगराच्या पायथ्याशी हे गाव आहे. या गावातून लहानाचे मोठे झालेले, सध्या अमरावती येथे विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त असलेले भीमराव खंडाते यांनी आपल्या या गावाचे ऋण फेडाण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रणजितसिंह देओल यांच्याशी संपर्क साधून खैरी सीता या गावात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात होणारी गैरसोय टाळण्यासाठी एसटी बस सुरू करण्याची विनंती त्यांनी केली. देओल यांनी संबंधिताना त्याबाबत आदेश दिले. काही तांत्रिक बाबी दूर करून बससेवा सुरू झाली आणि गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. याप्रसंगी एसटीचे प्रादेशिक व्यवस्थापक ए.एन. गोहात्रे, किशोर भोयर, उपसरपंच विलास वाघाडे, विभागीय वाहतूक निरीक्षक टी. डी. काळमेघ, सहायक वाहतूक निरीक्षक दाचेवार व ठोसर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)