शहरं
Join us  
Trending Stories
1
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
2
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
3
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
4
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
5
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
6
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
7
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
8
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
9
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
10
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
11
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
12
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
13
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
14
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
15
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
16
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
17
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
18
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
19
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
20
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश

केरळचा कळवळा, विदर्भातील शेतक-यांबाबत मौन; भाजप नेत्यांचे असेही समाजकारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 23:35 IST

हत्यांचा निषेध करत असताना आपल्या मातीतील शेतकयांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना रस्त्यावर का उतरावेसे वाटले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नागपूर : शालेय पुस्तकांमध्ये आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी ही म्हण अनेकदा वाचनात येते. मात्र राजकीय पटलावर ही म्हण कशी चपखलपणे बसते हे भाजपच्या शहर कार्यकारिणीतील नेत्यांनी दाखवून दिले. विदर्भात अपु-या पावसामुळे अगोदरच संकटात सापडलेल्या बळीराजाचे मनोबल रासायनिक खताच्या फवा-यामुळे झालेल्या शेतकरी मृत्यूंमुळे ढासळले आहे. शेतकयांच्या या परिस्थितीबाबत मौन बाळगून असलेल्या भाजपच्या नेत्यांना हजारो किलोमीटर दूर असलेल्या केरळमधील भाजप कार्यकर्त्यांचा कळवळा आला. तेथील हत्यांचा निषेध करत असताना आपल्या मातीतील शेतकयांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना रस्त्यावर का उतरावेसे वाटले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर हल्ले करण्यात येत असल्याचा आरोप अनेक दिवसांपासून होत आहे. संघाने यासंदर्भात कधी नव्हे ती उघडपणे भुमिका घेतली. भाजपतर्फे केरळात जनरक्षा यात्रेची मोहिम राबविण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील याला उपस्थित होते. उपराजधानीपासून १५०० किलोमीटर केरळमधील सत्ताधा-यांकडून होणा-या या राजकीय हिंसेचा निषेध करण्यासाठी व जनरक्षा यात्रेच्या समर्थनार्थ शहर भाजपतर्फे सोमवारी दुपारी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. भाजपाचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, आ.कृष्णा खोपडे, आ.मिलींद माने, महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, महामंत्री संदीप जोशी, किशोर पलांदूरकर, संदीप जाधव, प्रवीण दटके, जयप्रकाश गुप्ता, श्रीकांत देशपांडे, संजय बंगाले, धर्मपाल मेश्राम, इत्यादी नेते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. केरळ सरकारविरोधात यावेळी जोरजोराने नारे लावण्यात आले व जर हत्या थांबल्या नाहीत तर नागपुरातील भाजप कार्यकर्ते केरळमध्ये जाऊन शासनाला प्रत्युत्तर देतील, असे दावेदेखील करण्यात आले.

हजारो किलोमीटरवर सुरू असलेल्या हिंसेला नागपुरातून जाऊन उत्तर देण्याची भाषा करणाºया नेत्यांना विदर्भातील शेतकºयांचा मात्र विसर पडला होता. रासायनिक खतांच्या फवाºयामुळे यवतमाळमध्ये झालेल्या जीवघेण्या घटनांचे लोण नागपूर जिल्ह्यातदेखील पसरले. शेतकºयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. जिल्ह्यातदेखील काही शेतकरी यामुळे आजारी पडले आहेत. सोबतच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अपुºया पावसामुळे शेतकºयांना फटका बसला आहे. मात्र नागपूर शहरातील एकाही आमदाराने यासंदर्भात सरकारकडे मागणी केलेली नाही. इतकेच काय तर शेतकºयांच्या मृत्यूसंदर्भात सांत्वना देणारे साधे पत्रदेखील काढलेले नाही. केरळमधील हिंसा निषेधार्हच आहे. मात्र तेथील कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत असताना भाजप नेत्यांना विदर्भातील शेतकºयांचे अश्रू दिसले नाहीत का, असे प्रश्न संविधान चौकात उपस्थित असलेल्या जनसामान्यांमधूनच उपस्थित झाले.

टॅग्स :BJPभाजपा