शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

लग्नाच्या सुरुवातीपासून पत्नीला सासरी एकटे ठेवणे हिंसाचारच : उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2022 17:20 IST

प्रकरणातील पती पोलीस कर्मचारी असून तो अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील रहिवासी आहे.

राकेश घानोडे

नागपूर : काेणतेही ठोस कारण नसताना लग्नाच्या सुरुवातीपासून पत्नीला सासरी एकटे ठेवणे व पतीने दुसऱ्या गावात एकटे राहणे, ही कृती कौटुंबिक हिंसाचारात मोडणारी आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय जोशी यांनी एका प्रकरणात दिला, तसेच पत्नी व तिच्या मुलीला मासिक आठ हजार रुपये खावटी मंजूर केली.

प्रकरणातील पती पोलीस कर्मचारी असून तो अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील रहिवासी आहे. ११ जून २०११ रोजी लग्न झाल्यानंतर तो नोकरीचे ठिकाण असलेल्या वणी येथे एकटाच निघून गेला. त्याने पत्नीला सासू-सासऱ्यासोबत ठेवले. सासू-सासरे पत्नीचा सतत छळ करीत होते. तिला गुलामासारखे वागवीत होते. सासरा तिच्यावर वाईट नजर ठेवत होता.

दरम्यान, पत्नीने आग्रह केल्यामुळे पतीने तिला डिसेंबर-२०११ मध्ये वणीला नेले. तेथे गेल्यानंतर पतीचे अनैतिक संबंध असल्याचे काही पुरावे पत्नीला मिळाले. तिने त्यासंदर्भात विचारपूस केली असता, पतीने तिला जबर मारहाण केली व पुन्हा सासरी आणून सोडले. त्यावेळी ती अधिक काळ छळ सहन करू शकली नाही व मुलीला घेऊन माहेरी निघून गेली. या बाबींवरून कौटुंबिक हिंसाचार सिद्ध होतो, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :Courtन्यायालयhusband and wifeपती- जोडीदारnagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय