शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

लग्नाच्या सुरुवातीपासून पत्नीला सासरी एकटे ठेवणे हिंसाचारच : उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2022 17:20 IST

प्रकरणातील पती पोलीस कर्मचारी असून तो अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील रहिवासी आहे.

राकेश घानोडे

नागपूर : काेणतेही ठोस कारण नसताना लग्नाच्या सुरुवातीपासून पत्नीला सासरी एकटे ठेवणे व पतीने दुसऱ्या गावात एकटे राहणे, ही कृती कौटुंबिक हिंसाचारात मोडणारी आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय जोशी यांनी एका प्रकरणात दिला, तसेच पत्नी व तिच्या मुलीला मासिक आठ हजार रुपये खावटी मंजूर केली.

प्रकरणातील पती पोलीस कर्मचारी असून तो अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील रहिवासी आहे. ११ जून २०११ रोजी लग्न झाल्यानंतर तो नोकरीचे ठिकाण असलेल्या वणी येथे एकटाच निघून गेला. त्याने पत्नीला सासू-सासऱ्यासोबत ठेवले. सासू-सासरे पत्नीचा सतत छळ करीत होते. तिला गुलामासारखे वागवीत होते. सासरा तिच्यावर वाईट नजर ठेवत होता.

दरम्यान, पत्नीने आग्रह केल्यामुळे पतीने तिला डिसेंबर-२०११ मध्ये वणीला नेले. तेथे गेल्यानंतर पतीचे अनैतिक संबंध असल्याचे काही पुरावे पत्नीला मिळाले. तिने त्यासंदर्भात विचारपूस केली असता, पतीने तिला जबर मारहाण केली व पुन्हा सासरी आणून सोडले. त्यावेळी ती अधिक काळ छळ सहन करू शकली नाही व मुलीला घेऊन माहेरी निघून गेली. या बाबींवरून कौटुंबिक हिंसाचार सिद्ध होतो, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :Courtन्यायालयhusband and wifeपती- जोडीदारnagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय