शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाच्या विचारांचा झेंडा घेऊन पुढे चालत रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 11:14 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यातील विनम्रतेचा परिचय रविवारी सुमतीताई सुकळीकर यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात आला. पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या निर्मला चितळे यांचे गडकरींनी पाया पडून आशीर्वाद घेतले अन् तेव्हा अख्खे सभागृह भारावून गेले.

ठळक मुद्देसुमतीताई सुकळीकर स्मृतिदिन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्ता ही क्षणभंगूर आहे. आज मिळणारा मान उद्या मिळणार नाही. त्यामुळे सत्तेचा मोह सोडून पक्षाच्या विचारांचा झेंडा घेऊन पुढे चालत रहा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना केले.भारतीय जनता पार्टी नागपूर महानगरतर्फे सुमतीताई सुकळीकर स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन रविवारी विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नितीन गडकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती मीरा खडक्कार होत्या. त्याचबरोबर माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृ ष्णा खोपडे, मोहन मते, शहर अध्यक्ष प्रवीण दटके, उपमहापौर मनिषा कोठे, माजी महापौर अर्चना डेहनकर उपस्थित होते. यावेळी भाजपाच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या सुधा सोहनी यांचा सत्कार करण्यात आला. सुमतीतार्इंच्या कार्याबद्दल गडकरी म्हणाले, तार्इंचे जीवनकार्य मोठे आहे. जनसंघाच्या काळापासून सुमतीताई कार्य करीत होत्या. तेव्हा पक्षाला लोकसमर्थन नव्हते. विचारांना प्रतिष्ठा नव्हती, ब्राह्मणांची पार्टी म्हणून हिणवले जात होते. जातीयवादी, सांप्रदायिक, गांधीचा खून करणारे म्हणून अपमानित केले जात होते. तो काळ अतिशय प्रतिकूल होता. अशावेळी सुमतीताई सुकळीकर यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम केले. अपमान सहन करीत प्रवाहाच्या विरोधात जाऊन पक्षाचा विचार समाजात रुजविला. भाजपाला आज जे यश मिळत आहे, ते तार्इंसारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी दिलेल्या बलिदानाचे प्रतीक आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी हा इतिहास महत्त्वाचा आहे. आपण भूतकाळ विसरलो तर उद्याचे उज्वल भविष्य लिहू शकणार नाही. सत्ता, यश यामागे न धावता भारतीय जनता पक्षाच्या विचारांना तळागळात पोहचविण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. तार्इंच्या कामाचे मूल्यमापनच होऊ शकत नसल्याचे खडक्कार म्हणाल्या.

भीती निर्माण करून व्होटबँकेचे राजकारण होत आहेसीएएच्या नावावर देशभरात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. मुस्लीम समाजाला भीती दाखवून व्होटबँक मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या परिस्थिती आव्हानात्मक आहे. त्यामुळे पक्षाचा, संघटनेचा विचार तळागळापर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचेही गडकरी म्हणाले.-वृत्त/८

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी