शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

पक्षाच्या विचारांचा झेंडा घेऊन पुढे चालत रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 11:14 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यातील विनम्रतेचा परिचय रविवारी सुमतीताई सुकळीकर यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात आला. पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या निर्मला चितळे यांचे गडकरींनी पाया पडून आशीर्वाद घेतले अन् तेव्हा अख्खे सभागृह भारावून गेले.

ठळक मुद्देसुमतीताई सुकळीकर स्मृतिदिन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्ता ही क्षणभंगूर आहे. आज मिळणारा मान उद्या मिळणार नाही. त्यामुळे सत्तेचा मोह सोडून पक्षाच्या विचारांचा झेंडा घेऊन पुढे चालत रहा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना केले.भारतीय जनता पार्टी नागपूर महानगरतर्फे सुमतीताई सुकळीकर स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन रविवारी विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नितीन गडकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती मीरा खडक्कार होत्या. त्याचबरोबर माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृ ष्णा खोपडे, मोहन मते, शहर अध्यक्ष प्रवीण दटके, उपमहापौर मनिषा कोठे, माजी महापौर अर्चना डेहनकर उपस्थित होते. यावेळी भाजपाच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या सुधा सोहनी यांचा सत्कार करण्यात आला. सुमतीतार्इंच्या कार्याबद्दल गडकरी म्हणाले, तार्इंचे जीवनकार्य मोठे आहे. जनसंघाच्या काळापासून सुमतीताई कार्य करीत होत्या. तेव्हा पक्षाला लोकसमर्थन नव्हते. विचारांना प्रतिष्ठा नव्हती, ब्राह्मणांची पार्टी म्हणून हिणवले जात होते. जातीयवादी, सांप्रदायिक, गांधीचा खून करणारे म्हणून अपमानित केले जात होते. तो काळ अतिशय प्रतिकूल होता. अशावेळी सुमतीताई सुकळीकर यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम केले. अपमान सहन करीत प्रवाहाच्या विरोधात जाऊन पक्षाचा विचार समाजात रुजविला. भाजपाला आज जे यश मिळत आहे, ते तार्इंसारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी दिलेल्या बलिदानाचे प्रतीक आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी हा इतिहास महत्त्वाचा आहे. आपण भूतकाळ विसरलो तर उद्याचे उज्वल भविष्य लिहू शकणार नाही. सत्ता, यश यामागे न धावता भारतीय जनता पक्षाच्या विचारांना तळागळात पोहचविण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. तार्इंच्या कामाचे मूल्यमापनच होऊ शकत नसल्याचे खडक्कार म्हणाल्या.

भीती निर्माण करून व्होटबँकेचे राजकारण होत आहेसीएएच्या नावावर देशभरात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. मुस्लीम समाजाला भीती दाखवून व्होटबँक मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या परिस्थिती आव्हानात्मक आहे. त्यामुळे पक्षाचा, संघटनेचा विचार तळागळापर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचेही गडकरी म्हणाले.-वृत्त/८

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी