शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
2
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
3
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
4
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
5
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
6
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
7
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
8
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
9
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
10
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
11
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
12
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
13
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
14
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
15
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
16
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
17
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
18
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
19
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
20
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
Daily Top 2Weekly Top 5

केदारनाथची आपत्ती शासनाच्या चुकीमुळेच

By admin | Updated: June 15, 2014 00:42 IST

केदारनाथमधील आपत्ती ही नैसर्गिक नसून शासनाची चूक आहे. शासनाने तातडीने पावले उचलली असती तर एकाही यात्रेकरूला आपला जीव गमवावा लागला नसता, अशी टीका केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती

उमा भारती यांची टीका : नर्मदा धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाचे स्वागतनागपूर : केदारनाथमधील आपत्ती ही नैसर्गिक नसून शासनाची चूक आहे. शासनाने तातडीने पावले उचलली असती तर एकाही यात्रेकरूला आपला जीव गमवावा लागला नसता, अशी टीका केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांनी शनिवारी येथे केली. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच नागपुरात आल्या होत्या. रेल्वे स्थानकावर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी वरील मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या केदारनाथमध्ये घडलेली दुर्घटना नैसर्गिक नव्हती. त्यासाठी तेथील शासनाची चूक कारणीभूत ठरली. केदारनाथमध्ये पाणी भरले तेव्हा लोकांना आधीच कल्पना द्यायला हवी होती. त्यांना तातडीने सुरक्षित बाहेर काढता आले असते. परंतु शासनाने आपले काम योग्यपणे बजावले नाही. परिणामी शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला.काँग्रेसप्रणित युपीए सरकारवर जोरदार प्रहार केले. केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारने भाजपशासित मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यांवर नेहमीच अन्याय केला.गंगा नदीमध्ये थुंकल्यावरून सध्या बरेच वादळ उठले आहे. यावर त्यांना छेडले असता त्या म्हणाल्या की, गंगा नदीमध्ये थुंकल्यास कठोर शिक्षा केली जाईल, यासंबंधात कुप्रचार केला जात आहे. कशाप्रकारे हा प्रकार थांबविता येईल, दंड कसा आकारता येईल, यावर अजून चर्चा सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. नर्मदा नदीवरील धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. सर्व बाबी विचारात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे धरणाची उंची वाढल्यास सर्वांचाच फायदा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गोसेखुर्दकडे लक्ष द्या,गडकरींची विनंती उमा भारती या नागपूर दौऱ्यावर असताना त्या काही वेळ रविभवन येथे थांबल्या होत्या. त्यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची नागपूरच्या विविध प्रश्नांसंदर्भात रविभवन सभागृहात बैठक सुरू होती. उमा भारती यांना याबाबत कळताच त्यांनी बैठक स्थळी जाऊन नितीन गडकरी यांची भेट घेतली. या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली. विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्दकडे लक्ष द्या, अशी विनंती नितीन गडकरी यांनी उमा भारती यांना केली.