शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

केदारनाथची आपत्ती शासनाच्या चुकीमुळेच

By admin | Updated: June 15, 2014 00:42 IST

केदारनाथमधील आपत्ती ही नैसर्गिक नसून शासनाची चूक आहे. शासनाने तातडीने पावले उचलली असती तर एकाही यात्रेकरूला आपला जीव गमवावा लागला नसता, अशी टीका केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती

उमा भारती यांची टीका : नर्मदा धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाचे स्वागतनागपूर : केदारनाथमधील आपत्ती ही नैसर्गिक नसून शासनाची चूक आहे. शासनाने तातडीने पावले उचलली असती तर एकाही यात्रेकरूला आपला जीव गमवावा लागला नसता, अशी टीका केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांनी शनिवारी येथे केली. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच नागपुरात आल्या होत्या. रेल्वे स्थानकावर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी वरील मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या केदारनाथमध्ये घडलेली दुर्घटना नैसर्गिक नव्हती. त्यासाठी तेथील शासनाची चूक कारणीभूत ठरली. केदारनाथमध्ये पाणी भरले तेव्हा लोकांना आधीच कल्पना द्यायला हवी होती. त्यांना तातडीने सुरक्षित बाहेर काढता आले असते. परंतु शासनाने आपले काम योग्यपणे बजावले नाही. परिणामी शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला.काँग्रेसप्रणित युपीए सरकारवर जोरदार प्रहार केले. केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारने भाजपशासित मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यांवर नेहमीच अन्याय केला.गंगा नदीमध्ये थुंकल्यावरून सध्या बरेच वादळ उठले आहे. यावर त्यांना छेडले असता त्या म्हणाल्या की, गंगा नदीमध्ये थुंकल्यास कठोर शिक्षा केली जाईल, यासंबंधात कुप्रचार केला जात आहे. कशाप्रकारे हा प्रकार थांबविता येईल, दंड कसा आकारता येईल, यावर अजून चर्चा सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. नर्मदा नदीवरील धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. सर्व बाबी विचारात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे धरणाची उंची वाढल्यास सर्वांचाच फायदा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गोसेखुर्दकडे लक्ष द्या,गडकरींची विनंती उमा भारती या नागपूर दौऱ्यावर असताना त्या काही वेळ रविभवन येथे थांबल्या होत्या. त्यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची नागपूरच्या विविध प्रश्नांसंदर्भात रविभवन सभागृहात बैठक सुरू होती. उमा भारती यांना याबाबत कळताच त्यांनी बैठक स्थळी जाऊन नितीन गडकरी यांची भेट घेतली. या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली. विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्दकडे लक्ष द्या, अशी विनंती नितीन गडकरी यांनी उमा भारती यांना केली.