शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

हेटीसुर्ला साखर कारखान्याचे संचालक कात्रीत

By admin | Updated: March 4, 2016 02:56 IST

सावनेर तालुक्यातील हेटीसुर्ला येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याचे संचालक मंडळ कारखाना बंद होऊन विक्री झाल्याच्या नऊ वर्षानंतर अडचणीत आले आहेत.

मुंबई जिल्हा बँकेने बजावली नोटीस : कर्जाची परतफेड करण्याची ताकीद कमलेश वानखेडे नागपूरसावनेर तालुक्यातील हेटीसुर्ला येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याचे संचालक मंडळ कारखाना बंद होऊन विक्री झाल्याच्या नऊ वर्षानंतर अडचणीत आले आहेत. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेने साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री रणजित देशमुख यांच्यासह संचालक मंडळातील १८ संचालकांना वसुलीची नोटीस बजावली आहे. प्रसंगी संपती जप्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बहुतांश संचालक हे सामान्य शेतकरी असून त्यावेळचे देशमुखांचे खंदे समर्थक आहेत. आता वसुलीच्या नोटिसीमुळे या संचालकांची झोप उडाली आहे.काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री रणजित देशमुख यांनी हेटीसुर्ला येथे साखर कारखाना सुरू केला होता. त्यावेळी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून कारखान्यासाठी १५ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. बदल्यात कारखाना राज्य सहकारी बँकेकडे तारण ठेवण्यात आला होता. सध्या कर्ज व व्याज मिळून सुमारे ६०.७७ कोटी रुपये कारखान्याकडे थकीत आहेत. संबंधित कर्जाची परतफेड करण्यात कारखाना अपयशी ठरला. त्यामुळे राज्य बँकेने सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्ट २००२ नुसार कारवाई करीत २२ डिसेंबर २००६ रोजी काखान्याची मालमत्ता जप्त केली. पुढे ४ मे २००७ रोजी राज्य बँकेने कारखाना ‘जसा आहे तसा’ या अटीवर मे. प्रसाद शुगर्स अ‍ॅण्ड अलाईड अ‍ॅग्रो प्रॉडक्ट प्रा. लि., राहुरी, जिल्हा अहमदनगर यांना १२.९५ कोटी रुपयांमध्ये विकला.