शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुका ओल्या दुष्काळाच्या सावटात; सोयाबीन, कापूस, तूर पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 21:01 IST

Nagpur News काटोल तालुक्यात सततच्या मुसळधार पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे. जेमतेम बाहेर आलेले पीक सततच्या पावसाने पाण्याखाली असून सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके उगविण्याआधीच खराब होऊ लागले आहेत.

ठळक मुद्देबागायत शेतीलाही मोठा फटका

नागपूर : काटोल तालुक्यात सततच्या मुसळधार पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे. जेमतेम बाहेर आलेले पीक सततच्या पावसाने पाण्याखाली असून अद्यापही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे आता सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके उगविण्याआधीच खराब होऊ लागले आहेत. काही भागांत शेतकऱ्यांना रोपटे बाहेर येण्याच्या अशाच सोडल्या आहेत. दुसरीकडे बागायतदार शेतीला सुद्धा मोठा फटका बसला आहे. शेतात जिकडे तिकडे पाणीच पाणी येत आहे.

जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काटोल तालुक्यात पाऊस नसल्याने शेतकरी त्रस्त होते. यानंतर दोन ते तीन वेळा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. मात्र, गत बारा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात आतापर्यंत ५२६ मि.मी.चा पाऊस झाला आहे. तालुक्याला पाणीपुरवठा करणारा रिधोरा येथील जाम प्रकल्प आव्होरफ्लो झाला आहे. चिखली नाला प्रकल्पसुद्धा ओसंडून वाहत आहे. पावसाचा जोर सुरू राहिला तर ४९ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकाच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :agricultureशेती