शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कस्तूरचंद पार्कला मिळाले ५० लाख रुपये : हायकोर्टात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 22:40 IST

Kasturchand Park gets Rs 50 lakh, Nagpur news सिव्हील लाईन्स येथील हेरिटेज कस्तूरचंद पार्क मैदानाचे समतलीकरण करण्यासाठी राज्य सरकारने ५० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देमैदानाचे समतलीकरण केले जाईल

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : सिव्हील लाईन्स येथील हेरिटेज कस्तूरचंद पार्क मैदानाचे समतलीकरण करण्यासाठी राज्य सरकारने ५० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती देण्यात आली.

यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. २०१७ मध्ये उच्च न्यायालयाने कस्तूरचंद पार्कच्या दुरवस्थेची दखल घेऊन स्वत:च ही याचिका दाखल करून घेतली होती. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी न्यायालयाला ही माहिती दिली. तसेच, उर्वरित निधी अन्य माध्यमातून मिळवून मैदान समतलीकरणाचे काम तातडीने पूर्ण केले जाईल असे सांगितले.

विविध विकास कामे, मुसळधार पाऊस व देखभालीकडे दुर्लक्ष यामुळे कस्तूरचंद पार्क मैदान ठिकठिकाणी उंच-सखल झाले आहे. तसेच, मैदानावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने नागरिकांना चांगल्या पद्धतीने खेळता यावे याकरिता मैदानाचे समतलीकरण करण्याचा आदेश दिला होता. सरकार त्या आदेशाचे पालन करीत आहे. सुरुवातीला सरकारने निधीच्या कमतरतेचे कारण सांगून विषय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, न्यायालयाने सरकारला योग्य समज देऊन हे काम करणे आवश्यक असल्याचे बजावले होते. प्रकरणावर आता २५ नोव्हेंबर राेजी पुढील सुनावणी होईल. न्यायालय मित्र ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी याचिकेचे, ॲड. गिरीश कुंटे यांनी नासुप्रतर्फे तर, ॲड. जेमिनी कासट यांनी मनपातर्फे कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयKasturchand Parkकस्तूरचंद पार्क