शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कस्तूरचंद पार्कला मिळाले ५० लाख रुपये : हायकोर्टात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 22:40 IST

Kasturchand Park gets Rs 50 lakh, Nagpur news सिव्हील लाईन्स येथील हेरिटेज कस्तूरचंद पार्क मैदानाचे समतलीकरण करण्यासाठी राज्य सरकारने ५० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देमैदानाचे समतलीकरण केले जाईल

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : सिव्हील लाईन्स येथील हेरिटेज कस्तूरचंद पार्क मैदानाचे समतलीकरण करण्यासाठी राज्य सरकारने ५० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती देण्यात आली.

यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. २०१७ मध्ये उच्च न्यायालयाने कस्तूरचंद पार्कच्या दुरवस्थेची दखल घेऊन स्वत:च ही याचिका दाखल करून घेतली होती. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी न्यायालयाला ही माहिती दिली. तसेच, उर्वरित निधी अन्य माध्यमातून मिळवून मैदान समतलीकरणाचे काम तातडीने पूर्ण केले जाईल असे सांगितले.

विविध विकास कामे, मुसळधार पाऊस व देखभालीकडे दुर्लक्ष यामुळे कस्तूरचंद पार्क मैदान ठिकठिकाणी उंच-सखल झाले आहे. तसेच, मैदानावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने नागरिकांना चांगल्या पद्धतीने खेळता यावे याकरिता मैदानाचे समतलीकरण करण्याचा आदेश दिला होता. सरकार त्या आदेशाचे पालन करीत आहे. सुरुवातीला सरकारने निधीच्या कमतरतेचे कारण सांगून विषय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, न्यायालयाने सरकारला योग्य समज देऊन हे काम करणे आवश्यक असल्याचे बजावले होते. प्रकरणावर आता २५ नोव्हेंबर राेजी पुढील सुनावणी होईल. न्यायालय मित्र ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी याचिकेचे, ॲड. गिरीश कुंटे यांनी नासुप्रतर्फे तर, ॲड. जेमिनी कासट यांनी मनपातर्फे कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयKasturchand Parkकस्तूरचंद पार्क