शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

कस्तूरचंद पार्कचा लूक बदलणार

By admin | Updated: November 2, 2016 02:20 IST

शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक कस्तूरचंद पार्क चे महत्त्व विचारात घेता या मैदानाचा कायापालट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक कस्तूरचंद पार्क चे महत्त्व विचारात घेता या मैदानाचा कायापालट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. २० नोव्हेंबर २०१६ पर्यंत विकासाचा नवीन कृती आराखडा तयार करण्यात येणर आहे. यामुळे कस्तूरचंद पार्कचा लूक बदलणार असल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. मैदानाचा वापर विविध कार्यक्रम व प्रदर्शनासाठी केला जातो. परंतु वापरानंतर मैदान पूर्ववत केले जात नाही. तसेच मैदानावर व परिसरात अतिक्रमण होते. यामुळे मैदानावर कचरा साचतो. याला आळा बसावा, यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी मंगळवारी लोकमतशी बोलताना दिली. नवीन विकास आराखड्यात मैदानाच्या वापरासंदर्भातील नियमात सुधारणा केली जाणार आहे. तसेच मैदानावर परिसरात अतिक्रमण होणार नाही. यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासोबतच परिसराचे सौंदयींकरण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. (प्रतिनिधी)अतिक्रमण रोखण्यासाठी भरारी पथककस्तूरचंद पार्क व परिसरात व्यावसायिक मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करतात. याचा कायमचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी तहसीलदार(नझुल) यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच मंडळ अधिकारी व तलाठी यांचे भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक दर दोन- तीन दिवसांनी कस्तूरचंद पार्कची पाहणी करून अतिक्रमण होणार नाही. याची खबरदारी घेणार असल्याची माहिती सचिन कुर्वे यांनी दिली.अतिक्रमण हटविले कस्तूरचंद पार्क व लगतच्या फूटपाथवर पोहे, नारळपाणी व चहा विक्रे त्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण के ले होते. यामुळे मैदानात घाणपाणी व कचरा साचत असल्याने मैदानाला बकाल स्वरूप आले होते. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी मैदावरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मंगळवारी तहसीलदार (नझुल) यांच्या नेतृत्वातील पथकाने मैदानावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. सेंट जोसेफ स्कूलच्या बाजूने कस्तूरचंद पार्क मैदानाच्या फू टपाथवर व मैदानात पोहे, नारळपाणी व चहा विक्रे त्यांनी अतिक्रमण केले होते. बाजूलाच नारळपाणी विक्रे त्यांची दुकाने होती. विक्रेते साहित्य व नारळांचा साठा ठेवण्यासाठी मैदानाचा वापर करीत होते. सर्वावर कारवाई करून मैदानाचा वापर केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.