शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कस्तूरचंद पार्कचा लूक बदलणार

By admin | Updated: November 2, 2016 02:20 IST

शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक कस्तूरचंद पार्क चे महत्त्व विचारात घेता या मैदानाचा कायापालट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक कस्तूरचंद पार्क चे महत्त्व विचारात घेता या मैदानाचा कायापालट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. २० नोव्हेंबर २०१६ पर्यंत विकासाचा नवीन कृती आराखडा तयार करण्यात येणर आहे. यामुळे कस्तूरचंद पार्कचा लूक बदलणार असल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. मैदानाचा वापर विविध कार्यक्रम व प्रदर्शनासाठी केला जातो. परंतु वापरानंतर मैदान पूर्ववत केले जात नाही. तसेच मैदानावर व परिसरात अतिक्रमण होते. यामुळे मैदानावर कचरा साचतो. याला आळा बसावा, यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी मंगळवारी लोकमतशी बोलताना दिली. नवीन विकास आराखड्यात मैदानाच्या वापरासंदर्भातील नियमात सुधारणा केली जाणार आहे. तसेच मैदानावर परिसरात अतिक्रमण होणार नाही. यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासोबतच परिसराचे सौंदयींकरण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. (प्रतिनिधी)अतिक्रमण रोखण्यासाठी भरारी पथककस्तूरचंद पार्क व परिसरात व्यावसायिक मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करतात. याचा कायमचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी तहसीलदार(नझुल) यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच मंडळ अधिकारी व तलाठी यांचे भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक दर दोन- तीन दिवसांनी कस्तूरचंद पार्कची पाहणी करून अतिक्रमण होणार नाही. याची खबरदारी घेणार असल्याची माहिती सचिन कुर्वे यांनी दिली.अतिक्रमण हटविले कस्तूरचंद पार्क व लगतच्या फूटपाथवर पोहे, नारळपाणी व चहा विक्रे त्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण के ले होते. यामुळे मैदानात घाणपाणी व कचरा साचत असल्याने मैदानाला बकाल स्वरूप आले होते. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी मैदावरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मंगळवारी तहसीलदार (नझुल) यांच्या नेतृत्वातील पथकाने मैदानावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. सेंट जोसेफ स्कूलच्या बाजूने कस्तूरचंद पार्क मैदानाच्या फू टपाथवर व मैदानात पोहे, नारळपाणी व चहा विक्रे त्यांनी अतिक्रमण केले होते. बाजूलाच नारळपाणी विक्रे त्यांची दुकाने होती. विक्रेते साहित्य व नारळांचा साठा ठेवण्यासाठी मैदानाचा वापर करीत होते. सर्वावर कारवाई करून मैदानाचा वापर केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.