शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

काश्मीर हे ज्ञानाचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 11:52 IST

वास्तवात काश्मीर हे ज्ञानाचे केंद्र राहिले आहे. काश्मीरने भारतात ज्ञानाचे सृजन केले आहे पण ही सत्यता आपण विसरलो आहे, अशी खंत काश्मीर व्यवहाराचे जाणकार आणि प्रसिद्ध वक्ते सुशील पंडित यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमंथनच्या चर्चासत्रात मांडले विचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काश्मीरला आपण सर्व एका राज्याच्या रूपात ओळखतो. त्याच्या सुंदरतेबाबत वर्णन केले जाते. मात्र आपण काश्मीरची विशेषता जाणलीच नाही किंवा आपल्याला याबाबत सांगितले गेले नाही. वास्तवात काश्मीर हे ज्ञानाचे केंद्र राहिले आहे. काश्मीरने भारतात ज्ञानाचे सृजन केले आहे पण ही सत्यता आपण विसरलो आहे, अशी खंत काश्मीर व्यवहाराचे जाणकार आणि प्रसिद्ध वक्ते सुशील पंडित यांनी व्यक्त केली.मंथनच्यावतीने ‘जम्मू और कश्मीर का सत्य’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात प्रमुख वक्ता म्हणून त्यांनी हे विचार मांडले. त्रिमूर्तीनगर येथील आयटी पार्कच्या पर्सिस्टंट सिस्टीम सभागृहात या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. ते पुढे म्हणाले, काश्मीर भारताचे अंग नाही, असे म्हणने पूर्णपणे चुकीचे आहे. काश्मीर हे महाभारत काळापासूनच भारताचे अभिन्न अंग राहिले आहे. इतिहासातील सर्वात पुरातन मानला जाणारा ‘राजतरंगिनी’ हा ग्रंथ काश्मिरातच लिहिला गेला होता. महाऋषी पतंजली यांचा जन्मही काश्मिरातच झाला होता. संगीतावरील सर्वात पहिला ग्रंथ शरणदेव यांनी काश्मीरमध्येच लिहिला होता. एवढेच नाही तर ध्वनीवर आनंदवर्धन यांचे सर्वश्रेष्ठ पुस्तकही काश्मीरमध्येच लिहिले होते. त्यामुळे काश्मीर हे केवळ एक राज्य नसून भारताचे डोके आणि मेंदू आहे. मात्र आपल्याला हे कधीच शिकविले जात नाही.ललितादित्य हे काश्मीरचे सर्वात शक्तिशाली शासक होते व त्यांचे कार्यक्षेत्र दूरवर विस्तारले होते. त्यांच्याबाबत आपल्याला कधी सांगितलेच गेले नाही. महमूद गजनी हा काश्मीरमधून तीन वेळा पराजित होऊन परतला होता, मात्र तेही सांगितले गेले नाही. ज्ञानाचे केंद्र राहिलेल्या काश्मीरमध्ये नाट्यशास्त्रावर ध्वनिलोक, संगीत रत्नाकर यासारखे महान ग्रंथ लिहिले गेल्याची माहिती त्यांनी यावेळी सांगितली.

काश्मिरी पंडितांवरील अत्याचार दुर्लक्षित केलायावेळी सुशील पंडित यांनी काश्मिरी पंडितावर झालेल्या अत्याचाराबाबत कधी दखल घेतली गेली नाही, अशी खंत व्यक्त केली. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराच्यावेळी ब्रिटिश शासन नव्हते तर आपले सरकार आणि आपलेच शासन-प्रशासन होते. अत्याचाराच्या घटना मोठ्या होत्या. मात्र याबाबत बातमी झाली नाही, कधी चौकशी झाली नाही आणि कधी कुणावर खटला चालविला गेला नसल्याचा असंतोष त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :SocialसामाजिकJammu Kashmirजम्मू-काश्मीर