शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर हे ज्ञानाचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 11:52 IST

वास्तवात काश्मीर हे ज्ञानाचे केंद्र राहिले आहे. काश्मीरने भारतात ज्ञानाचे सृजन केले आहे पण ही सत्यता आपण विसरलो आहे, अशी खंत काश्मीर व्यवहाराचे जाणकार आणि प्रसिद्ध वक्ते सुशील पंडित यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमंथनच्या चर्चासत्रात मांडले विचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काश्मीरला आपण सर्व एका राज्याच्या रूपात ओळखतो. त्याच्या सुंदरतेबाबत वर्णन केले जाते. मात्र आपण काश्मीरची विशेषता जाणलीच नाही किंवा आपल्याला याबाबत सांगितले गेले नाही. वास्तवात काश्मीर हे ज्ञानाचे केंद्र राहिले आहे. काश्मीरने भारतात ज्ञानाचे सृजन केले आहे पण ही सत्यता आपण विसरलो आहे, अशी खंत काश्मीर व्यवहाराचे जाणकार आणि प्रसिद्ध वक्ते सुशील पंडित यांनी व्यक्त केली.मंथनच्यावतीने ‘जम्मू और कश्मीर का सत्य’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात प्रमुख वक्ता म्हणून त्यांनी हे विचार मांडले. त्रिमूर्तीनगर येथील आयटी पार्कच्या पर्सिस्टंट सिस्टीम सभागृहात या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. ते पुढे म्हणाले, काश्मीर भारताचे अंग नाही, असे म्हणने पूर्णपणे चुकीचे आहे. काश्मीर हे महाभारत काळापासूनच भारताचे अभिन्न अंग राहिले आहे. इतिहासातील सर्वात पुरातन मानला जाणारा ‘राजतरंगिनी’ हा ग्रंथ काश्मिरातच लिहिला गेला होता. महाऋषी पतंजली यांचा जन्मही काश्मिरातच झाला होता. संगीतावरील सर्वात पहिला ग्रंथ शरणदेव यांनी काश्मीरमध्येच लिहिला होता. एवढेच नाही तर ध्वनीवर आनंदवर्धन यांचे सर्वश्रेष्ठ पुस्तकही काश्मीरमध्येच लिहिले होते. त्यामुळे काश्मीर हे केवळ एक राज्य नसून भारताचे डोके आणि मेंदू आहे. मात्र आपल्याला हे कधीच शिकविले जात नाही.ललितादित्य हे काश्मीरचे सर्वात शक्तिशाली शासक होते व त्यांचे कार्यक्षेत्र दूरवर विस्तारले होते. त्यांच्याबाबत आपल्याला कधी सांगितलेच गेले नाही. महमूद गजनी हा काश्मीरमधून तीन वेळा पराजित होऊन परतला होता, मात्र तेही सांगितले गेले नाही. ज्ञानाचे केंद्र राहिलेल्या काश्मीरमध्ये नाट्यशास्त्रावर ध्वनिलोक, संगीत रत्नाकर यासारखे महान ग्रंथ लिहिले गेल्याची माहिती त्यांनी यावेळी सांगितली.

काश्मिरी पंडितांवरील अत्याचार दुर्लक्षित केलायावेळी सुशील पंडित यांनी काश्मिरी पंडितावर झालेल्या अत्याचाराबाबत कधी दखल घेतली गेली नाही, अशी खंत व्यक्त केली. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराच्यावेळी ब्रिटिश शासन नव्हते तर आपले सरकार आणि आपलेच शासन-प्रशासन होते. अत्याचाराच्या घटना मोठ्या होत्या. मात्र याबाबत बातमी झाली नाही, कधी चौकशी झाली नाही आणि कधी कुणावर खटला चालविला गेला नसल्याचा असंतोष त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :SocialसामाजिकJammu Kashmirजम्मू-काश्मीर