शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

काश्मीर हे ज्ञानाचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 11:52 IST

वास्तवात काश्मीर हे ज्ञानाचे केंद्र राहिले आहे. काश्मीरने भारतात ज्ञानाचे सृजन केले आहे पण ही सत्यता आपण विसरलो आहे, अशी खंत काश्मीर व्यवहाराचे जाणकार आणि प्रसिद्ध वक्ते सुशील पंडित यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमंथनच्या चर्चासत्रात मांडले विचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काश्मीरला आपण सर्व एका राज्याच्या रूपात ओळखतो. त्याच्या सुंदरतेबाबत वर्णन केले जाते. मात्र आपण काश्मीरची विशेषता जाणलीच नाही किंवा आपल्याला याबाबत सांगितले गेले नाही. वास्तवात काश्मीर हे ज्ञानाचे केंद्र राहिले आहे. काश्मीरने भारतात ज्ञानाचे सृजन केले आहे पण ही सत्यता आपण विसरलो आहे, अशी खंत काश्मीर व्यवहाराचे जाणकार आणि प्रसिद्ध वक्ते सुशील पंडित यांनी व्यक्त केली.मंथनच्यावतीने ‘जम्मू और कश्मीर का सत्य’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात प्रमुख वक्ता म्हणून त्यांनी हे विचार मांडले. त्रिमूर्तीनगर येथील आयटी पार्कच्या पर्सिस्टंट सिस्टीम सभागृहात या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. ते पुढे म्हणाले, काश्मीर भारताचे अंग नाही, असे म्हणने पूर्णपणे चुकीचे आहे. काश्मीर हे महाभारत काळापासूनच भारताचे अभिन्न अंग राहिले आहे. इतिहासातील सर्वात पुरातन मानला जाणारा ‘राजतरंगिनी’ हा ग्रंथ काश्मिरातच लिहिला गेला होता. महाऋषी पतंजली यांचा जन्मही काश्मिरातच झाला होता. संगीतावरील सर्वात पहिला ग्रंथ शरणदेव यांनी काश्मीरमध्येच लिहिला होता. एवढेच नाही तर ध्वनीवर आनंदवर्धन यांचे सर्वश्रेष्ठ पुस्तकही काश्मीरमध्येच लिहिले होते. त्यामुळे काश्मीर हे केवळ एक राज्य नसून भारताचे डोके आणि मेंदू आहे. मात्र आपल्याला हे कधीच शिकविले जात नाही.ललितादित्य हे काश्मीरचे सर्वात शक्तिशाली शासक होते व त्यांचे कार्यक्षेत्र दूरवर विस्तारले होते. त्यांच्याबाबत आपल्याला कधी सांगितलेच गेले नाही. महमूद गजनी हा काश्मीरमधून तीन वेळा पराजित होऊन परतला होता, मात्र तेही सांगितले गेले नाही. ज्ञानाचे केंद्र राहिलेल्या काश्मीरमध्ये नाट्यशास्त्रावर ध्वनिलोक, संगीत रत्नाकर यासारखे महान ग्रंथ लिहिले गेल्याची माहिती त्यांनी यावेळी सांगितली.

काश्मिरी पंडितांवरील अत्याचार दुर्लक्षित केलायावेळी सुशील पंडित यांनी काश्मिरी पंडितावर झालेल्या अत्याचाराबाबत कधी दखल घेतली गेली नाही, अशी खंत व्यक्त केली. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराच्यावेळी ब्रिटिश शासन नव्हते तर आपले सरकार आणि आपलेच शासन-प्रशासन होते. अत्याचाराच्या घटना मोठ्या होत्या. मात्र याबाबत बातमी झाली नाही, कधी चौकशी झाली नाही आणि कधी कुणावर खटला चालविला गेला नसल्याचा असंतोष त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :SocialसामाजिकJammu Kashmirजम्मू-काश्मीर