शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
4
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
5
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
6
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
7
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
8
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
9
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
10
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
11
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
12
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
13
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
14
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
15
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
16
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
17
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
18
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
19
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
20
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ

करकरेंची हत्या हिंदुत्ववादी पोलिसांनी केली : बी.जी.कोळसे पाटलांच्या वक्तव्याने नवे वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 21:49 IST

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन ‘एटीएस’ प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाबने नव्हे तर काही हिंदुत्ववादी पोलिसांनी केली होती, असा खळबळजनक आरोप सेवानिवृत्त न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील यांनी केला आहे.

ठळक मुद्देकर्नल पुरोहितने रचला सरसंघचालकांच्या हत्येचा कट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन ‘एटीएस’ प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाबने नव्हे तर काही हिंदुत्ववादी पोलिसांनी केली होती, असा खळबळजनक आरोप सेवानिवृत्त न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवे वादंग निर्माण झाले असून, भारतीय जनता पक्षाने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.नागपुरातील जाफरनगर भागात रविवारी रात्री ‘अलायन्स अगेन्स्ट सीएए-एनआरसी-एनपीआर’च्या वतीने संविधान जनजागरण सभा आयोजित करण्यात आली होती. ‘सीएए’, ‘एनआरसी’च्या विरोधात बोलत असताना बी.जी.कोळसे पाटील यांनी अध्यक्षीय भाषणादरम्यान अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली. हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाब किंवा इतर कोणत्याही पाकिस्तानी दहशतवाद्याच्या गोळ्यांनी झाला नाही. तर करकरे यांना महाराष्ट्र पोलिसांच्या ‘पॉईंट नाईन’ या पिस्तुलाने पाठीमागून गोळ्या घालून ठार करण्यात आले. हे कृत्य मुंबई पोलीस दलातील कुणी हिंदुत्ववाद्याने केले असावे, असा दावा कोळसे पाटील यांनी केला.मालेगाव बॉम्बहल्ला प्रकरणात अनेक वर्षे अटकेत असलेल्या कर्नल पुरोहितने सुरुवातीला विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या इशाऱ्यावर काम केले होते. परंतु त्यानंतर त्याच कर्नल पुरोहितने त्यांच्या हत्येचा कट रचला होता व तशी सुपारीदेखील काही ‘शार्पशूटर्स’ला दिली होती, असा आरोपदेखील बी.जी.कोळसे पाटील यांनी केला.अटलबिहारी वाजपेयींविरोधात वादग्रस्त विधानया कार्यक्रमादरम्यान बी.जी.कोळसे पाटील यांनी देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासंदर्भातदेखील वादग्रस्त विधान केले. अटलबिहारी वाजपेयी हे प्रत्येक विदेशी दौऱ्यावर महिलांना सोबत न्यायचे. हे त्यांचे हिंदुत्व होते. ५ डिसेंबर १९९० रोजी दिलेल्या भाषणात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासला होता, असेदेखील बी.जी.कोळसे पाटील म्हणाले.भाजपची आक्रमक भूमिका, पोलिसांत तक्रारबी.जी.कोळसे पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्याविरोधात भाजयुमोच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे तक्रारदेखील केली आहे. कोळसे पाटील यांनी जाणूनबुजून समाजात तेढ निर्माण होईल अशी वादग्रस्त वक्तव्ये केली. तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरोधात अवमानजनक व आक्षेपार्ह विधाने केली. त्यांच्या भाषणाची चौकशी व्हावी व त्यांच्याविरोधात तसेच आयोजनकर्त्यांविरोधात कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भाजयुमोतर्फे शहराध्यक्ष शिवानी दाणी-वखरे, जितेंद्र ठाकूर, राहुल खंगार, बाल्या रारोकर यांनी तक्रार दाखल केली. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनीदेखील बी.जी.कोळसे पाटील यांच्या वक्तव्याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाMumbaiमुंबई