शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

‘करजवा’ला अगदी अचूक लागली ‘कट्यार’: स्वरवेधची प्रस्तुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:22 IST

राग यमनमधील आरोह-अवरोह असेल किंवा भैरवीची सुरेल तान. अमुक एका घराण्याचा गायक यमन गातो, म्हणून यमन श्रेष्ठ आणि तमुक एका घराण्याचा गायक भैरवी गातो म्हणून ती कनिष्ठ ठरेल का? संगीत अजरामर आहे. कारण ते कुणा एकाच्याच मालकीचे नाही, कुणाचेही दास नाही. संगीत अखंड आहे, स्वयंभू आहे, शाश्वत आहे. भौतिकतेच्या पलीकडे असे जे आहे ते संगीत सर्व भेदांपासून मुक्त आहे. हा संदेश 'संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकाने नव्याने दिला.

ठळक मुद्दे संगीत नाटकांच्या रसिकमान्यतेवर नागपूरकरांची नव्याने मोहोर

आॅनलाईन लोकमतनागपूर : राग यमनमधील आरोह-अवरोह असेल किंवा भैरवीची सुरेल तान. अमुक एका घराण्याचा गायक यमन गातो, म्हणून यमन श्रेष्ठ आणि तमुक एका घराण्याचा गायक भैरवी गातो म्हणून ती कनिष्ठ ठरेल का? संगीत अजरामर आहे. कारण ते कुणा एकाच्याच मालकीचे नाही, कुणाचेही दास नाही. संगीत अखंड आहे, स्वयंभू आहे, शाश्वत आहे. भौतिकतेच्या पलीकडे असे जे आहे ते संगीत सर्व भेदांपासून मुक्त आहे. हा संदेश 'संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकाने नव्याने दिला. निमित्त होते स्वरवेध नागपूर या संस्थेच्या १४ वर्षांच्या प्रवासपूर्तीचे. पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या लेखणीने व पंडित जितेंद्र अभिषेकींच्या संगीताने नटलेले हे संगीतनाटक शनिवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात सादर झाले. या नाटकाला उसळलेल्या नागपूरकरांच्या गर्दीने आधुनिक मनोरंजनाच्या युगातही संगीत नाटकांच्या रसिकमान्यतेवर नव्याने मोहोर उमटवली. खाँसाहेब आफताब हुसेन यांच्या भूमिकेतील प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या अभिनयाने या नाटकाला नेहमीप्रमाणे कलास्वादाच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन संपवले. पडदा उघडला तेव्हा पंडित भानुशंकर यांची श्रीमंत हवेली बघताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला. हरवले मधूर मुरलीचे सूर...या नाट्यपदाने नाटकाचा प्रारंभ होतो. दोन संगीत घराण्यांतल्या संघर्षाची ही कथा नाट्यमय वळण घेत पुढे सरकत राहते. खाँसाहेबाच्या अट्टाहासापुढे त्यांना राजगायकाची पदवी मिळवून देत पंडितजींनी पत्करलेला विजनवास, त्यांची मुलगी रमाचे हवेली सोडणे, खाँसाहेबाचे हवेतील आगमन, सदाशिव गुरवचे मिरजेहून हवेलीत येणे, संगीत शिकण्यासाठीचे खेळलेले डावपेच, पंडितजींच्या गायकीपेक्षा आपली गायकी श्रेष्ठ आहे हे सिद्ध करताना स्वत:च्याच नजरेत पडत चाललेले आणि सदाशिवचे वास्तव उघड झाल्यावर एक खून माफ असतानाही हातातील कट्यार म्यान करणारे खाँसाहेब...असे सारेच प्रेक्षकांना स्तब्ध करणारे. सृष्टीच्या रचनाकाराने गाता गळा हा बरोब्बर मेंदू आणि हृदयाच्या मधोमध का ठेवलाय याचे उत्तर या नाटकाने अप्रतिम पद्धतीने दिले. आपल्या नागपूरचेच पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीने आणि सुबोध भावेच्या प्रयोगशील दिग्दर्शनाने या नाटकाचे सोने केले. राहुल देशपांडे यांच्यासह रमा व झरीनाच्या भूमिकेतील अस्मिता चिंचाळकर, दीप्ती माटे यांनी कमाल केली. ऋषिकेश बडवे आणि चिन्मय पाटसकर यांनीही आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला.घेई छंद मकरंद..., सूर निरागस हो..., तेजोनिधी लोहगोल...लागी करजवा कट्यार...या नाट्यपदांनी या नाटकाला संगीताचे एक अभिजात सौंदर्य बहाल केले. नाटकातील गायकांना संवादिनीवर राजेश परांजपे व तबल्यावर अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी, सचिन बक्षी यांनी सहसंगत केली.शेवटचा प्रयोग ठरला ऐतिहासिकवसंतराव देशपांडे संगीत सभा या संस्थेने या नाटकाचे अनेक यशस्वी प्रयोग केले. देश-विदेशतील मराठी प्रेक्षकांनीही या नाटकाला अक्षरश: डोक्यावर घेतले. परंतु आता या संस्थेने हे नाटक थांबविले आहे. नागपुरात शनिवारी झालेला या संस्थेचा हा शेवटचा प्रयोग होता. नागपूरकरांच्या तुफान गर्दीने हा प्रयोग या नाटकाइतकाच ऐतिहासिक ठरला.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर