शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

‘करजवा’ला अगदी अचूक लागली ‘कट्यार’: स्वरवेधची प्रस्तुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:22 IST

राग यमनमधील आरोह-अवरोह असेल किंवा भैरवीची सुरेल तान. अमुक एका घराण्याचा गायक यमन गातो, म्हणून यमन श्रेष्ठ आणि तमुक एका घराण्याचा गायक भैरवी गातो म्हणून ती कनिष्ठ ठरेल का? संगीत अजरामर आहे. कारण ते कुणा एकाच्याच मालकीचे नाही, कुणाचेही दास नाही. संगीत अखंड आहे, स्वयंभू आहे, शाश्वत आहे. भौतिकतेच्या पलीकडे असे जे आहे ते संगीत सर्व भेदांपासून मुक्त आहे. हा संदेश 'संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकाने नव्याने दिला.

ठळक मुद्दे संगीत नाटकांच्या रसिकमान्यतेवर नागपूरकरांची नव्याने मोहोर

आॅनलाईन लोकमतनागपूर : राग यमनमधील आरोह-अवरोह असेल किंवा भैरवीची सुरेल तान. अमुक एका घराण्याचा गायक यमन गातो, म्हणून यमन श्रेष्ठ आणि तमुक एका घराण्याचा गायक भैरवी गातो म्हणून ती कनिष्ठ ठरेल का? संगीत अजरामर आहे. कारण ते कुणा एकाच्याच मालकीचे नाही, कुणाचेही दास नाही. संगीत अखंड आहे, स्वयंभू आहे, शाश्वत आहे. भौतिकतेच्या पलीकडे असे जे आहे ते संगीत सर्व भेदांपासून मुक्त आहे. हा संदेश 'संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकाने नव्याने दिला. निमित्त होते स्वरवेध नागपूर या संस्थेच्या १४ वर्षांच्या प्रवासपूर्तीचे. पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या लेखणीने व पंडित जितेंद्र अभिषेकींच्या संगीताने नटलेले हे संगीतनाटक शनिवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात सादर झाले. या नाटकाला उसळलेल्या नागपूरकरांच्या गर्दीने आधुनिक मनोरंजनाच्या युगातही संगीत नाटकांच्या रसिकमान्यतेवर नव्याने मोहोर उमटवली. खाँसाहेब आफताब हुसेन यांच्या भूमिकेतील प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या अभिनयाने या नाटकाला नेहमीप्रमाणे कलास्वादाच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन संपवले. पडदा उघडला तेव्हा पंडित भानुशंकर यांची श्रीमंत हवेली बघताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला. हरवले मधूर मुरलीचे सूर...या नाट्यपदाने नाटकाचा प्रारंभ होतो. दोन संगीत घराण्यांतल्या संघर्षाची ही कथा नाट्यमय वळण घेत पुढे सरकत राहते. खाँसाहेबाच्या अट्टाहासापुढे त्यांना राजगायकाची पदवी मिळवून देत पंडितजींनी पत्करलेला विजनवास, त्यांची मुलगी रमाचे हवेली सोडणे, खाँसाहेबाचे हवेतील आगमन, सदाशिव गुरवचे मिरजेहून हवेलीत येणे, संगीत शिकण्यासाठीचे खेळलेले डावपेच, पंडितजींच्या गायकीपेक्षा आपली गायकी श्रेष्ठ आहे हे सिद्ध करताना स्वत:च्याच नजरेत पडत चाललेले आणि सदाशिवचे वास्तव उघड झाल्यावर एक खून माफ असतानाही हातातील कट्यार म्यान करणारे खाँसाहेब...असे सारेच प्रेक्षकांना स्तब्ध करणारे. सृष्टीच्या रचनाकाराने गाता गळा हा बरोब्बर मेंदू आणि हृदयाच्या मधोमध का ठेवलाय याचे उत्तर या नाटकाने अप्रतिम पद्धतीने दिले. आपल्या नागपूरचेच पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीने आणि सुबोध भावेच्या प्रयोगशील दिग्दर्शनाने या नाटकाचे सोने केले. राहुल देशपांडे यांच्यासह रमा व झरीनाच्या भूमिकेतील अस्मिता चिंचाळकर, दीप्ती माटे यांनी कमाल केली. ऋषिकेश बडवे आणि चिन्मय पाटसकर यांनीही आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला.घेई छंद मकरंद..., सूर निरागस हो..., तेजोनिधी लोहगोल...लागी करजवा कट्यार...या नाट्यपदांनी या नाटकाला संगीताचे एक अभिजात सौंदर्य बहाल केले. नाटकातील गायकांना संवादिनीवर राजेश परांजपे व तबल्यावर अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी, सचिन बक्षी यांनी सहसंगत केली.शेवटचा प्रयोग ठरला ऐतिहासिकवसंतराव देशपांडे संगीत सभा या संस्थेने या नाटकाचे अनेक यशस्वी प्रयोग केले. देश-विदेशतील मराठी प्रेक्षकांनीही या नाटकाला अक्षरश: डोक्यावर घेतले. परंतु आता या संस्थेने हे नाटक थांबविले आहे. नागपुरात शनिवारी झालेला या संस्थेचा हा शेवटचा प्रयोग होता. नागपूरकरांच्या तुफान गर्दीने हा प्रयोग या नाटकाइतकाच ऐतिहासिक ठरला.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर