शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

वीज निर्मिती केंद्राच्या फ्लाय ॲशमुळे कन्हान नदीचे पाणी दूषित

By मंगेश व्यवहारे | Updated: July 3, 2024 13:26 IST

शहरातील पाणी पुरवठ्यावर मर्यादा : औष्णिक वीज केंद्राला उपाययोजना करण्याची विनंती

नागपूर : दरवर्षी पावसाळ्यात शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या कन्हान नदीत औष्णिक वीज केंद्रातील राख मिसळत असल्यामुळे कन्हान नदीचे पाणी दूषित होते. यंदाही १ जुलै रोजी कन्हान नदीच्या पाण्यात फ्लाय ॲश आढळून आल्याने कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून पंम्पिंग बंद करावी लागली. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा मर्यादित करण्यात आला. सद्या पावसाळा सुरू झाला आहे. पुढे पूर परिस्थिती निर्माण झाल्यास वारेगावच्या राखेचा तलाव फुटल्यास शहरात पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानिर्मितीच्या कोराडी आणि खापरडखेडा या दोन्ही वीज निर्मिती केंद्रांना कोळश्यातून तयार होणाऱ्या राखेची योग्य विल्हेवाट लावण्याचे वारंवार आदेश दिले आहे. खापरखेडा वीज केंद्रातील फ्लाय ॲश कन्हान नदीत मिसळल्याने पाणी दूषित झाले आहे. १ जुलै रोजी दुपारी कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या जल वसाहतीच्या विहीरीजवळ नदीत ओसीडब्ल्यू कंपनीच्या अधिकाऱ्यांना औष्णिक विद्युत प्रकल्पातील राख आढळली. दरम्यान अधिकाऱ्यांनी राखेचा स्त्रोत शोधले. यात महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या वारेगाव येथील राखेचा तलाव आणि वारेगाव येथील राख साठवणूक केंद्रातून ही राख नदीत येत असल्याचे दिसून आले. या राखेमुळे नदीतील पाणी दूषित होऊन नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही राख नदीच्या पाण्यात जाण्यापासून थांबविण्यासाठी आवश्यक उपाय करण्याची विनंती केली गेली आहे. राखेमुळे कन्हान नदीतील पाणी दूषित होत आहे. नागरीकांना शुद्धा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी

ओसीडब्ल्यूकडूनही कन्हान जलशुद्धीकरण प्रकल्प परिसरात आवश्यक उपाय करण्याचे काम हाती घेतले आहे. खबरदारी म्हणून राख आढळलेल्या जलवसाहत परिसरातील विहीरींचे पंपही थांबविण्यात आले आहे. पाण्याची तपासणी केली जात असल्याचे ओसीडब्ल्यूने कळविले आहे. औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील राखेमुळे कन्हान नदीतील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे कन्हान शुद्धीकरण केंद्र सद्या त्याच्या मुळ क्षमतेच्या दोन तृतियांश क्षमतेनेच कार्यरत आहे.

- अशोक चौक येथे जलवाहिनीच्या इंटरकनेक्शनसाठी १८ तास शटडाऊनगुरुवार, ४ जुलै रोजी दुपारी ४ वाजतापासून अशोक चौकातील जलवाहिनीच्या इंटरकनेक्शनसाठी १८ तासाचे शटडाऊन घेण्यात आले आहे. शुक्रवारी ५ जुलैला सकाळी १० वाजेपर्यंत काम पूर्ण होणार असल्याने, त्या काळात रेशीमबाग व हनुमाननगरच्या कमांड एरीयातील वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. अशोक चौकात उड्डाणपूलाच्या बांधकामासाठी ४०० मिमी व्यासाची जलवाहिनीला इतर ठिकाणी हलवायचे आहे.

टॅग्स :nagpurनागपूरwater pollutionजल प्रदूषण