शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

वीज निर्मिती केंद्राच्या फ्लाय ॲशमुळे कन्हान नदीचे पाणी दूषित

By मंगेश व्यवहारे | Updated: July 3, 2024 13:26 IST

शहरातील पाणी पुरवठ्यावर मर्यादा : औष्णिक वीज केंद्राला उपाययोजना करण्याची विनंती

नागपूर : दरवर्षी पावसाळ्यात शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या कन्हान नदीत औष्णिक वीज केंद्रातील राख मिसळत असल्यामुळे कन्हान नदीचे पाणी दूषित होते. यंदाही १ जुलै रोजी कन्हान नदीच्या पाण्यात फ्लाय ॲश आढळून आल्याने कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून पंम्पिंग बंद करावी लागली. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा मर्यादित करण्यात आला. सद्या पावसाळा सुरू झाला आहे. पुढे पूर परिस्थिती निर्माण झाल्यास वारेगावच्या राखेचा तलाव फुटल्यास शहरात पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानिर्मितीच्या कोराडी आणि खापरडखेडा या दोन्ही वीज निर्मिती केंद्रांना कोळश्यातून तयार होणाऱ्या राखेची योग्य विल्हेवाट लावण्याचे वारंवार आदेश दिले आहे. खापरखेडा वीज केंद्रातील फ्लाय ॲश कन्हान नदीत मिसळल्याने पाणी दूषित झाले आहे. १ जुलै रोजी दुपारी कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या जल वसाहतीच्या विहीरीजवळ नदीत ओसीडब्ल्यू कंपनीच्या अधिकाऱ्यांना औष्णिक विद्युत प्रकल्पातील राख आढळली. दरम्यान अधिकाऱ्यांनी राखेचा स्त्रोत शोधले. यात महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या वारेगाव येथील राखेचा तलाव आणि वारेगाव येथील राख साठवणूक केंद्रातून ही राख नदीत येत असल्याचे दिसून आले. या राखेमुळे नदीतील पाणी दूषित होऊन नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही राख नदीच्या पाण्यात जाण्यापासून थांबविण्यासाठी आवश्यक उपाय करण्याची विनंती केली गेली आहे. राखेमुळे कन्हान नदीतील पाणी दूषित होत आहे. नागरीकांना शुद्धा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी

ओसीडब्ल्यूकडूनही कन्हान जलशुद्धीकरण प्रकल्प परिसरात आवश्यक उपाय करण्याचे काम हाती घेतले आहे. खबरदारी म्हणून राख आढळलेल्या जलवसाहत परिसरातील विहीरींचे पंपही थांबविण्यात आले आहे. पाण्याची तपासणी केली जात असल्याचे ओसीडब्ल्यूने कळविले आहे. औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील राखेमुळे कन्हान नदीतील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे कन्हान शुद्धीकरण केंद्र सद्या त्याच्या मुळ क्षमतेच्या दोन तृतियांश क्षमतेनेच कार्यरत आहे.

- अशोक चौक येथे जलवाहिनीच्या इंटरकनेक्शनसाठी १८ तास शटडाऊनगुरुवार, ४ जुलै रोजी दुपारी ४ वाजतापासून अशोक चौकातील जलवाहिनीच्या इंटरकनेक्शनसाठी १८ तासाचे शटडाऊन घेण्यात आले आहे. शुक्रवारी ५ जुलैला सकाळी १० वाजेपर्यंत काम पूर्ण होणार असल्याने, त्या काळात रेशीमबाग व हनुमाननगरच्या कमांड एरीयातील वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. अशोक चौकात उड्डाणपूलाच्या बांधकामासाठी ४०० मिमी व्यासाची जलवाहिनीला इतर ठिकाणी हलवायचे आहे.

टॅग्स :nagpurनागपूरwater pollutionजल प्रदूषण