शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

कन्हान, कोलार नद्या धोक्यात , रेतीचा वारेमाप उपसा सुरूच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:01 IST

Kanhan, Kalar rivers in danger नागपूर जिल्ह्यात रेतीचा उपसा करण्यासाठी कन्हान तर रसायनयुक्त व सांडपाणी साेडण्यासाठी काेलार नदीचा वापर केला जात आहे. या दाेन्ही नद्यांचा उगम मध्य प्रदेशातून झाला आहे. रेतीच्या वारेमाप उपशामुळे कन्हान मृतवत तर रसायनयुक्त पाण्यामुळे काेलार नदी प्रदूषित झाल्याने या दाेन्ही महत्त्वाच्या नद्यांचे अस्तित्व धाेक्यात आले आहे.

ठळक मुद्देरसायनयुक्त पाण्यामुळे प्रदूषण वाढले

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यात रेतीचा उपसा करण्यासाठी कन्हान तर रसायनयुक्त व सांडपाणी साेडण्यासाठी काेलार नदीचा वापर केला जात आहे. या दाेन्ही नद्यांचा उगम मध्य प्रदेशातून झाला आहे. रेतीच्या वारेमाप उपशामुळे कन्हान मृतवत तर रसायनयुक्त पाण्यामुळे काेलार नदी प्रदूषित झाल्याने या दाेन्ही महत्त्वाच्या नद्यांचे अस्तित्व धाेक्यात आले आहे.

बाजारात तांबड्या रेतीला भरीव मागणी असल्याने रेती तस्करांनी कन्हान नदीला लक्ष्य केले आहे. जिल्ह्यात या नदीवर सावनेर तालुक्यात २१, पारशिवनी तालुक्यात सहा, कामठी तालुक्यात चार तर माैदा तालुक्यात चार असे एकूण ३५ रेतीघाट आहेत. यातील १९ घाटांमधून काेणत्याही घाटाचा लिलाव झाला नसताना रेतीचा माेठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे. त्यामुळे पात्रात खड्डे तयार झाले आहेत. या नदीवरील बिना संगम (ता. कामठी) घाटात नदीचा काठ खाेदला जात असून, तेथील मातीची नागपूर शहरात विक्री केली आहे. या नदीने अद्याप प्रवाह बदलविला नसला तरी माती खाेदकामामुळे प्रवाह बदलण्याची तसेच काठच्या गावांना पुराचा धाेका उद्भवण्याची शक्यता बळावली आहे.

काेलार नदीच्या पात्रात रसायनयुक्त व काठावरील शहरे व गावांमधील सांडपाणी साेडले जात असल्याने ही नदी प्रदूषित झाली आहे. परिणामी, पात्रात माेठ्या प्रमाणात जलपर्णीचे साम्राज्य तयार झाले आहेे. या नदीच्या पाण्याचा रंग काळसर झाला असून, या प्रदूषित पाण्यामुळे काठच्या गावांमधील पाणीपुरवठा याेजनाही प्रभावित झाल्या आहेत. या गंभीर प्रकाराकडे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानेही डाेळेझाक केली आहे.

वनसंपदा धाेक्यात

अलीकडच्या काळात नदीकाठची वनसंपदा व हिरवळ नष्ट झाली आहे. त्यामुळे पशुपक्ष्यांचा नदीकाठचा अधिवास नाहीसा झाला आहे. पक्ष्यांच्या विष्ठेत फळांच्या बिया राहत असल्याने त्या बियांपासून झाडे उवगतात. पक्षी नदीकाठी फिरकत नसल्याने नवीन झाडे उगवण्याची प्रक्रिया थांबली आहे. झाडे नष्ट हाेत असल्याने पुरात काठची माती वाहून जाते. जमिनीची धूप टाळण्यासाठी काठावर बांबूची माेठ्या प्रमाणात लागवड करणे आवश्यक आहे, अशी माहिती जल व पर्यावरण तज्ज्ञ मिलिंद बागल यांनी दिली.

पाण्याचे दुर्भिक्ष्य

काही वर्षांपासून नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. पात्रातील रेतीचा वारेमाप उपसा हाेत असल्याने जमिनीत पाणी झिरपण्याची प्रक्रिया मंदावली आहे. जमिनीतील पाण्याचा वाढलेला उपसा लक्षात घेता भूगर्भातील जलस्तर खालावत चालल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. जिल्ह्यात पेंच, वर्धा, जाम, सूर, सांड, आम, नाग, वेणा, कृष्णा, मरू, चंद्रभागा या प्रमुख नद्यांची अवस्था काहीशी अशीच आहे.

टॅग्स :Kanhan Riverकन्हान नदीpollutionप्रदूषण