शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

कन्हान, कोलार नद्या धोक्यात , रेतीचा वारेमाप उपसा सुरूच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:01 IST

Kanhan, Kalar rivers in danger नागपूर जिल्ह्यात रेतीचा उपसा करण्यासाठी कन्हान तर रसायनयुक्त व सांडपाणी साेडण्यासाठी काेलार नदीचा वापर केला जात आहे. या दाेन्ही नद्यांचा उगम मध्य प्रदेशातून झाला आहे. रेतीच्या वारेमाप उपशामुळे कन्हान मृतवत तर रसायनयुक्त पाण्यामुळे काेलार नदी प्रदूषित झाल्याने या दाेन्ही महत्त्वाच्या नद्यांचे अस्तित्व धाेक्यात आले आहे.

ठळक मुद्देरसायनयुक्त पाण्यामुळे प्रदूषण वाढले

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यात रेतीचा उपसा करण्यासाठी कन्हान तर रसायनयुक्त व सांडपाणी साेडण्यासाठी काेलार नदीचा वापर केला जात आहे. या दाेन्ही नद्यांचा उगम मध्य प्रदेशातून झाला आहे. रेतीच्या वारेमाप उपशामुळे कन्हान मृतवत तर रसायनयुक्त पाण्यामुळे काेलार नदी प्रदूषित झाल्याने या दाेन्ही महत्त्वाच्या नद्यांचे अस्तित्व धाेक्यात आले आहे.

बाजारात तांबड्या रेतीला भरीव मागणी असल्याने रेती तस्करांनी कन्हान नदीला लक्ष्य केले आहे. जिल्ह्यात या नदीवर सावनेर तालुक्यात २१, पारशिवनी तालुक्यात सहा, कामठी तालुक्यात चार तर माैदा तालुक्यात चार असे एकूण ३५ रेतीघाट आहेत. यातील १९ घाटांमधून काेणत्याही घाटाचा लिलाव झाला नसताना रेतीचा माेठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे. त्यामुळे पात्रात खड्डे तयार झाले आहेत. या नदीवरील बिना संगम (ता. कामठी) घाटात नदीचा काठ खाेदला जात असून, तेथील मातीची नागपूर शहरात विक्री केली आहे. या नदीने अद्याप प्रवाह बदलविला नसला तरी माती खाेदकामामुळे प्रवाह बदलण्याची तसेच काठच्या गावांना पुराचा धाेका उद्भवण्याची शक्यता बळावली आहे.

काेलार नदीच्या पात्रात रसायनयुक्त व काठावरील शहरे व गावांमधील सांडपाणी साेडले जात असल्याने ही नदी प्रदूषित झाली आहे. परिणामी, पात्रात माेठ्या प्रमाणात जलपर्णीचे साम्राज्य तयार झाले आहेे. या नदीच्या पाण्याचा रंग काळसर झाला असून, या प्रदूषित पाण्यामुळे काठच्या गावांमधील पाणीपुरवठा याेजनाही प्रभावित झाल्या आहेत. या गंभीर प्रकाराकडे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानेही डाेळेझाक केली आहे.

वनसंपदा धाेक्यात

अलीकडच्या काळात नदीकाठची वनसंपदा व हिरवळ नष्ट झाली आहे. त्यामुळे पशुपक्ष्यांचा नदीकाठचा अधिवास नाहीसा झाला आहे. पक्ष्यांच्या विष्ठेत फळांच्या बिया राहत असल्याने त्या बियांपासून झाडे उवगतात. पक्षी नदीकाठी फिरकत नसल्याने नवीन झाडे उगवण्याची प्रक्रिया थांबली आहे. झाडे नष्ट हाेत असल्याने पुरात काठची माती वाहून जाते. जमिनीची धूप टाळण्यासाठी काठावर बांबूची माेठ्या प्रमाणात लागवड करणे आवश्यक आहे, अशी माहिती जल व पर्यावरण तज्ज्ञ मिलिंद बागल यांनी दिली.

पाण्याचे दुर्भिक्ष्य

काही वर्षांपासून नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. पात्रातील रेतीचा वारेमाप उपसा हाेत असल्याने जमिनीत पाणी झिरपण्याची प्रक्रिया मंदावली आहे. जमिनीतील पाण्याचा वाढलेला उपसा लक्षात घेता भूगर्भातील जलस्तर खालावत चालल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. जिल्ह्यात पेंच, वर्धा, जाम, सूर, सांड, आम, नाग, वेणा, कृष्णा, मरू, चंद्रभागा या प्रमुख नद्यांची अवस्था काहीशी अशीच आहे.

टॅग्स :Kanhan Riverकन्हान नदीpollutionप्रदूषण