शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

कळमना मार्केट बनतेय ‘हॉटस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 20:24 IST

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता कोरोनाचा शिरकाव कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीतील मार्केट परिसरात झाला असून १०० पेक्षा जास्त लोक संक्रमित झाल्याची माहिती आहे. संक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे.

ठळक मुद्देपरिसरात १०० पेक्षा जास्त लोक ‘कोरोना’ संक्रमित : बाजारात गर्दीचा उच्चांक कायम, प्रशासन झोपेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता कोरोनाचा शिरकाव कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीतील मार्केट परिसरात झाला असून १०० पेक्षा जास्त लोक संक्रमित झाल्याची माहिती आहे. संक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये व्यापारी, अडतिये, हमाल आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी कांदे-बटाटे बाजारात पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती आहे. कोरोना वेगाने पसरत असतानाही समितीचे प्रशासन काहीही उपाययोजना करीत नसून संक्रमणावर प्रतिबंध आणण्यास अपयशी ठरल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला. प्रशासनाने कठोर उपाययोजना न केल्यास कळमन्यातील बाजारपेठा बंद कराव्या लागतील, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सहा बाजारपेठा आहेत. या बाजारात दररोज १४ ते १५ हजार लोक खरेदीसाठी येतात. एवढ्या लोकांमधून ‘कोरोना’ संसर्ग कुणाला झाला आहे वा नाही, याची शहानिशा करणे कठीण आहे. बाजार एकत्रित असल्याने खरेदी करणाऱ्यांची नेहमीच गर्दी असते. प्रशासनाने अनेकदा गर्दीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वी प्रत्येक बाजार आठवड्यातून तीन दिवस सुरू ठेवला होता. माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कळमना भाजीबाजार बंद ठेवून शहरात १६ ठिकाणी बाजार सुरू केला होता. त्यालाही व्यापाऱ्यांनाही विरोध केला होता. व्यापाऱ्यांच्या मागणीनंतर पुन्हा बाजार आठवडाभर सुरू झाला. भाजीबाजारात अजूनही २५० पैकी दरदिवशी १०० अडतियांना व्यवसायाची परवानगी देण्यात आली आहे.भाजीबाजारात दरदिवशी लहानमोठे २०० पेक्षा जास्त ट्रक येतात. यातील अर्ध्यापेक्षा जास्त गाड्या अन्य राज्ये आणि जिल्ह्यातील असतात. पहाटे ४ ते सकाळी ९ पर्यंत हजारो किरकोळ विक्रेत्यांची खरेदीसाठी गर्दी असते. वारंवार सूचना देऊनही व्यापारी व अडतिये ऐकत नसल्याची तक्रार प्रशासनाची आहे. बाजार काही दिवस बंद करणे वा शहरात इतरत्र: सुरू करणे, हाच यावर उपाय असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.याशिवाय फळबाजारात आठवड्यातून तीन दिवस लिलाव असतो. लिलावादरम्यान व्यापारी आणि ग्राहकांची एकच गर्दी असते. शेतकरीही गर्दीत उभे राहतात. त्यामुळे संक्रमणाची भीती असते. कुणीही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नाहीत. फू्रट मार्केट अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, अन्य राज्ये व जिल्हे आणि स्थानिकांच्या गर्दीमुळे बाजारात कोरोना संक्रमण वाढत आहे. सध्या कोरोना संसर्गाची भीती कुणामध्येही दिसून येत नाही. कांदे-बटाटे बाजारातील पाच व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण आहे. फळबाजार काही दिवस बंद ठेवण्यासाठी असोसिएशनतर्फे प्रशासक राजेश भुसारी यांना गुरुवारी निवेदन दिले आहे. त्यावर ते काय निर्णय घेतात, याची प्रतीक्षा आहे.संसर्गाची स्पष्ट माहिती मिळाल्यास परिसर सील करूकळमन्यात कोरोना संक्रमण वाढले आहे, ही बाब खरी आहे. पण या संदर्भात स्पष्ट माहिती नसल्याने कारवाई करता येत नाही. समितीच्या आवारात नागपूरचा बाजार एकवटला आहे. संसर्गानंतरही शेतकरी माल विक्रीसाठी बाजारात गर्दी करतात. गर्दीला आवर कसा घालणार, हा गंभीर प्रश्न आहे. संसर्गाची स्पष्ट माहिती मिळाल्यास परिसर सील करू. यापूर्वी लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. परिसर वारंवार सॅनिटाईझ्ड करण्यात येत आहे.राजेश भुसारी, प्रशासक, कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार