शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कालिदास महोत्सव : अनुराधा पाल, देवयानी, बेगम परवीन सुलताना यंदाचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 20:52 IST

कालिदास महोत्सव म्हणजे नागपूरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानीच. दरवर्षीप्रमाणे यंदाही कला रसिकांना शास्त्रीय संगीताची मेजवानी अनुभवास मिळणार असून देशाच्या सांस्कृतिक पटलावर नागपूरचे नाव कोरणारा कालिदास महोत्सव यंदा २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देविभागीय आयुक्त संजीव कुमार यांची पत्रपरिषद: २७ पासून आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कालिदास महोत्सव म्हणजे नागपूरकरांसाठीसांस्कृतिक मेजवानीच. दरवर्षीप्रमाणे यंदाही कला रसिकांना शास्त्रीय संगीताची मेजवानी अनुभवास मिळणार असून देशाच्या सांस्कृतिक पटलावर नागपूरचे नाव कोरणारा कालिदास महोत्सव यंदा २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.१९९६ पासून सातत्याने कालिदास महोत्सव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जातो. या महोत्सवाला राष्ट्रीय पातळीवर नेण्याच्या उद्देशाने तत्कालीन विभागीय आयुक्तांनी सन २०१५ मध्ये कालिदास समारोह समिती स्थापन करून कालिदास समारोह आयोजन समिती आणि विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा महोत्सव केला. तेव्हापासून तो सलग सुरु आहे. गेल्यावर्षी ‘ऋतुसंहार’ या रचनेवर आधारित सहा ऋतूंच्या सौंदर्यावर महोत्सव पार पडला. यावर्षीचा समारोह हा ‘शकुंतला: भारतीय स्त्रीचे सूर’ या विषयावर आधारित राहणार असून तबला क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनुराधा पाल, विदुषी आरती अंकलीकर (गायिका) पद्मश्री देवयानी (भरतनाट्यम), कौशिकी चक्रवर्ती (गायिका), संगीता शंकर (व्हायोलीन) आणि बेगम परवीन सुलताना (गायन) या यंदाचे विशेष आकर्षण असतील, असे डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.२७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होईल. या महोत्सवात स्थानिक कलावंतांनाही संधी देण्यात आली असून माडखोलकर आणि त्यांचा ग्रुपद्वारे सादर करण्यात येणाऱ्या मंगलचरणाने या महोत्सवला सुरुवात होईल. यावेळी मनपा आयुक्त रवींद्र ठाकरे, महसूल उपायुक्त, सुधाकर तेलंग, अतिरिक्त उपायुक्त राम जोशी आदी उपस्थित होते.दुसरा टप्पा जानेवारीमध्येगेल्यावर्षी नागपूर व रामटेक येथे दोन टप्प्यात कालिदास महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यंदाही तो दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान नागपूर येथे होईल तर दुसरा टप्पा रामटेक येथे जानेवारीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. कुवारा भिवसेन महोत्सव आणि कालिदास महोत्सव हा संयुक्तपणे घेतला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर