शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

कालिदास महोत्सव : अनुराधा पाल, देवयानी, बेगम परवीन सुलताना यंदाचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 20:52 IST

कालिदास महोत्सव म्हणजे नागपूरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानीच. दरवर्षीप्रमाणे यंदाही कला रसिकांना शास्त्रीय संगीताची मेजवानी अनुभवास मिळणार असून देशाच्या सांस्कृतिक पटलावर नागपूरचे नाव कोरणारा कालिदास महोत्सव यंदा २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देविभागीय आयुक्त संजीव कुमार यांची पत्रपरिषद: २७ पासून आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कालिदास महोत्सव म्हणजे नागपूरकरांसाठीसांस्कृतिक मेजवानीच. दरवर्षीप्रमाणे यंदाही कला रसिकांना शास्त्रीय संगीताची मेजवानी अनुभवास मिळणार असून देशाच्या सांस्कृतिक पटलावर नागपूरचे नाव कोरणारा कालिदास महोत्सव यंदा २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.१९९६ पासून सातत्याने कालिदास महोत्सव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जातो. या महोत्सवाला राष्ट्रीय पातळीवर नेण्याच्या उद्देशाने तत्कालीन विभागीय आयुक्तांनी सन २०१५ मध्ये कालिदास समारोह समिती स्थापन करून कालिदास समारोह आयोजन समिती आणि विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा महोत्सव केला. तेव्हापासून तो सलग सुरु आहे. गेल्यावर्षी ‘ऋतुसंहार’ या रचनेवर आधारित सहा ऋतूंच्या सौंदर्यावर महोत्सव पार पडला. यावर्षीचा समारोह हा ‘शकुंतला: भारतीय स्त्रीचे सूर’ या विषयावर आधारित राहणार असून तबला क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनुराधा पाल, विदुषी आरती अंकलीकर (गायिका) पद्मश्री देवयानी (भरतनाट्यम), कौशिकी चक्रवर्ती (गायिका), संगीता शंकर (व्हायोलीन) आणि बेगम परवीन सुलताना (गायन) या यंदाचे विशेष आकर्षण असतील, असे डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.२७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होईल. या महोत्सवात स्थानिक कलावंतांनाही संधी देण्यात आली असून माडखोलकर आणि त्यांचा ग्रुपद्वारे सादर करण्यात येणाऱ्या मंगलचरणाने या महोत्सवला सुरुवात होईल. यावेळी मनपा आयुक्त रवींद्र ठाकरे, महसूल उपायुक्त, सुधाकर तेलंग, अतिरिक्त उपायुक्त राम जोशी आदी उपस्थित होते.दुसरा टप्पा जानेवारीमध्येगेल्यावर्षी नागपूर व रामटेक येथे दोन टप्प्यात कालिदास महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यंदाही तो दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान नागपूर येथे होईल तर दुसरा टप्पा रामटेक येथे जानेवारीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. कुवारा भिवसेन महोत्सव आणि कालिदास महोत्सव हा संयुक्तपणे घेतला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर