शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

फटाकेबंदीवर पर्यावरणमंत्र्यांचा ‘सावध’ पवित्रा; ठोस उत्तर देण्याचे टाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 20:47 IST

फटाकेबंदीच्या मुद्यावरून आॅक्टोबर महिन्यात शिवसेनेमध्येच दोन गट पडल्याचे दिसून आले होते. विधान परिषदेत हा मुद्दा आल्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी सावध पवित्रा घेतला.

ठळक मुद्देकायद्यावर मौन, जनजागृतीवर भरयंदा ७० टक्के घट झाल्याचा दावा

योगेश पांडेआॅनलाईन लोकमतनागपूर : फटाकेबंदीच्या मुद्यावरून आॅक्टोबर महिन्यात शिवसेनेमध्येच दोन गट पडल्याचे दिसून आले होते. विधान परिषदेत हा मुद्दा आल्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी सावध पवित्रा घेतला. फटाकेबंदीच्या विरोधकांच्या मागणीवर कुठलेही ठोस उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. सण साजरे होताना फटाके फुटलेच पाहिजे असे म्हणत कायद्याऐवजी जनजागृतीवरच भर देण्याची भूमिका मांडली.शहरातील प्रदूषणाच्या पातळीतील वाढीचा मुद्दा अनंत गाडगीळ यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मांडला होता. यावरील चर्चेदरम्यान डॉ.सुधीर तांबे यांनी फटाकेबंदी करणार का असा प्रश्न उपस्थित केला. दिवाळीत फटाकेबंदीच्या मुद्यावरून दोन नेत्यांमध्ये फटाके फुटले. सण साजरे झालेच पाहिजे. सणांमध्ये फटाके फोडले जातात. मात्र फटाके फोडण्याचे प्रमाण जनजागृतीच्या माध्यमातून कमी होऊ शकते. यासाठी कुठलाही कायदा करण्याची गरज नाही. या वर्षी शालेय विद्यार्थ्यांमध्ये केलेल्या जनजागृतीमुळे ७० टक्के कमी फटाके फुटले. कुठलाही कायदा न करता प्रमाण कमी झाले आहे. फटाके फुटले पाहिजे व प्रदूषणही होता कामा नये, असे प्रतिपादन त्यांनी केले. मात्र फटाके फुटल्यानंतर प्रदूषण कसे कमी होणार किंवा याबाबत राज्य शासनाची नेमकी काय भूमिका राहील, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.जुन्या इमारतींना ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य करणारमुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये काँक्रिटीकरणात वाढ झाली असून यामुळे भूजलपातळी कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता राज्य शासनातर्फे नवीन नियम लागू करण्यात आले असून विकासकांना ३० टक्के जमिनीवर काँक्रिटचे काहीच काम करता येणार नाही, अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच नवीन इमारतींसोबतच जुन्या इमारतींनादेखील ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे आश्वासन रामदास कदम यांनी दिले.मोठ्या चौकांत लावणार धूर शोषणारी यंत्रेराज्यातील अनेक शहरांमध्ये वाहनांमुळे प्रचंड प्रदूषण होते. ही बाब लक्षात घेता ‘नीरी’ व ‘आयआयटी’च्या माध्यमातून विशेष यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. या यंत्रांच्या माध्यमातून वाहनांतून निघणारा धूर शोषून घेता येऊ शकतो. यासंदर्भात परीक्षण सुरू असून लवकरच पुढील पावले उचलण्यात येतील, अशी माहिती पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी दिली. तर डिझेल वाहनांची तपासणी करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यासंदर्भात परिवहन विभागाला पर्यावरण मंत्रालयामार्फत सूचना करण्यात येतील, असे आश्वासन यावेळी कदम यांनी दिले.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Ramdas Kadamरामदास कदम