शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

वंचित घटकांना न्याय मिळवून देणार ‘न्यायदूत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:28 IST

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही समाजातील एक मोठा वर्ग मुख्य प्रवाहापासून फार लांब आहे. त्यांना स्वत:च्या घटनात्मक अधिकारांची पूर्णपणे माहिती नाही. त्यामुळे त्यांची जागोजागी फसवणूक होत आहे. त्यांना छोट्याछोट्या गोष्टी मिळविण्यासाठी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करावा लागत आहे. आर्थिक अडचणीमुळे न्यायालयात जाणे त्यांच्याकरिता अशक्य आहे. शिवाय अनेकांना न्यायालय व वकिलांपर्यंत कसे पोहचावे हेदेखील माहीत नाही. हे विदारक चित्र बदलविण्यासाठी हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूर यांनी पुढाकार घेतला आहे. असोसिएशनने वंचित घटकांकरिता ‘न्यायदूत’ योजना आखली आहे.

ठळक मुद्दे‘एचसीबीए’ची योजना : पहिल्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यात शिबिरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही समाजातील एक मोठा वर्ग मुख्य प्रवाहापासून फार लांब आहे. त्यांना स्वत:च्या घटनात्मक अधिकारांची पूर्णपणे माहिती नाही. त्यामुळे त्यांची जागोजागी फसवणूक होत आहे. त्यांना छोट्याछोट्या गोष्टी मिळविण्यासाठी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करावा लागत आहे. आर्थिक अडचणीमुळे न्यायालयात जाणे त्यांच्याकरिता अशक्य आहे. शिवाय अनेकांना न्यायालय व वकिलांपर्यंत कसे पोहचावे हेदेखील माहीत नाही. हे विदारक चित्र बदलविण्यासाठी हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूर यांनी पुढाकार घेतला आहे. असोसिएशनने वंचित घटकांकरिता ‘न्यायदूत’ योजना आखली आहे. या योजनेंतर्गत वंचित घटकांना न्याय्य हक्कांविषयी मार्गदर्शन करणे व त्यांना न्याय मिळवून देणे याकरिता पहिल्या टप्प्यामध्ये २१ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्यातील १० दुर्गम गावांमध्ये शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.ही संघटना आतापर्यंत एका विशिष्ट चौकटीतच कार्य करीत होती. ती वकिलांच्या समस्यांबाहेर क्वचितच गेली असेल. या चौकटीला पहिल्यांदा तोडण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांच्या व्यापक नेतृत्वाने वकिलांना समाजातील दुर्लक्षित घटकाच्या मदतीस धावून जाण्यासाठी प्रेरित केले आहे. हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबविला जाणार आहे. दुर्लक्षित लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी चमू तयार करण्यात येणार असून प्रत्येक चमूत १० वकिलांचा समावेश राहणार आहे. या चमू एकाच वेळी १० गावांमध्ये शिबिरे आयोजित करतील. एका ठिकाणच्या शिबिरामध्ये आजूबाजूची सर्व गावे सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. परिणामी एकाचवेळी १५० ते २०० गावांतील नागरिकांच्या समस्या सोडविता येतील. शिबिर २ ते ३ तास चालेल. या शिबिरामुळे नागरिकांच्या कुटुंब, जमीन, भरपाई इत्यादीशी संबंधित छोट्याछोट्या समस्या जागेवरच सुटतील. मोठ्या समस्या सोडविण्यासाठी कुठे जायचे, काय करायचे, कुणाला भेटायचे याचे योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमामुळे न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांचे प्रमाण कमी होईल व पक्षकारांची आर्थिक बचत होईल असा संघटनेला विश्वास आहे. या उपक्रमात स्थानिक वकील व विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. उपक्रमावर देणग्यांतून मिळणारी रक्कम खर्च केली जाणार आहे.योजनेत या बाबींचा समावेश१ - सामाजिक व आर्थिक मागास, अपंग, अशिक्षित, वृद्ध, निराधार आदी व्यक्तींना न्याय मिळवून देणे.२ - शेतकरी, शेतमजूर, महिला, पुरुष यांना न्याय्य हक्कांची जाणीव करून देणे. अत्याचार दूर करण्यासाठी त्यांना मदत करणे. त्यांना मुख्य प्रवाहात आणणे.३ - महिला अत्याचार व बाल मजुरी या समस्यांवर मार्गदर्शन करून ही समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करणे.४ - समाजाला शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे. पात्र व्यक्तींना योजनेचा लाभ मिळवून देणे.५ - समस्या सोडविण्यासाठी आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणे.शनिवारी या गावात शिबिरेयेत्या शनिवारी गडचिरोली जिल्ह्यातील अडपल्ली, साखरा, जेप्रा, गिलगाव, ब्राह्मणी, खुर्सा, मेंढा (बोधली), चुरचुरा, अमिर्झा व टेंभा या गावांतील प्राथमिक शाळांमध्ये सकाळी ११.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत शिबिरे आयोजित करण्यात येतील. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण उपाध्ये यांच्या हस्ते अडपल्ली येथे सकाळी १०.३० वाजता उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येईल.कार्यशाळेत मोठ्या संख्येत उपस्थितीमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील बार रुममध्ये गुरुवारी न्यायदूत उपक्रमावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेत वकील मोठ्या संख्येत उपस्थित होते. त्यांना उपक्रमाचा उद्देश, संवाद कौशल्य, कार्यपद्धती, शिबिरे आयोजन इत्यादीबाबत सखोल माहिती देण्यात आली. या उपक्रमाविषयी प्रत्येकजण उत्साही असल्याचे चित्र दिसून आले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल