शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

न्याय मिळाला पण २२ वर्षांपासून अंमलबजावणीची प्रतिक्षा; नागपूर महानगरपालिकेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 11:18 IST

गेल्या २२ वर्षापासून अतिक्रमण हटावे यासाठी संघर्ष करीत आहे. सुरुवातीला मुले लहान होती. आता मोठी झाली आहे. न्यायासाठी भटकंती करून थकलो आहे. परंतु न्याय मिळेल अशी आशा आहे. महापालिकेत गरिबाला न्याय मिळत नाही. अशी व्यथा मन्सूर इब्राहीम यांनी मांडली.

ठळक मुद्देमनपा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हन्यायालयाच्या निर्णयानंतरही अतिक्रमण कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या गांधीबाग झोनमधील नवाबपुरा येथील निवासी मन्सूर शरीफ शेख इब्राहीम १९९५साली काही महिन्यासाठी बाहेरगावी गेले होते. या दरम्यान त्यांच्या मालकीच्या ४५० चौरस फूट जागेवर शेजाऱ्याने अतिक्रमण केले. त्यावेळी मन्सूर इब्राहीम ४४ वर्षांचे होते. आज त्यांचे वय ६६ वर्षे झाले तरीही महापालिक ा मुख्यालय व गांधीबाग झोनमध्ये चकरा मारत आहे. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला.मुख्यमंत्री, नगर विकास विभागाला निवेदने दिली. परंतु त्यांना न्याय मिळालेला नाही. आजही अतिक्रमण कायम आहे. न्याय मिळेल अशा आशेने गुरुवारी त्यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांची भेट घेऊ न अतिक्रमण हटविण्याची मागणी केली.लोकमतशी चर्चा करताना मन्सूर इब्राहीम म्हणाले, अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका आयुक्त, झोनचे सहायक आयुक्त, महापौर यांना वेळोवेळी निवेदने दिली. पोलीस स्टेशनलाही तक्रार दिली. परंतु शेजारी घनश्याम नाकाडे यांनी केलेले अतिक्रमण हटविले नाही.२७ नोव्हेंबर १९९५ रोजी महापालिकेच्या प्रवर्तन विभागाचे पथक अतिक्रमण काढण्यासाठी आले होते. परंतु पथक कारवाई न करताच परतले. त्यानंतर पुन्हा तक्रार केली. ३ जानेवारी १९९६ रोजी दुसऱ्यांदा पथक आले. परंतु अतिक्रमण हटविले नाही. प्रवर्तन विभागाने २००४ मध्ये शिडी तोडण्याचे आदेश काढले.पण ही फाईल वेगवेगळ्या विभागात २०१० पर्यत फिरत होती. १९जानेवारी २०११ रोजी पुन्हा पथक आले. पण कारवाई न करताच पथक परतले. कारवाई करण्यासाठी अनेकदा पथक आले. परंतु अतिकमण न हटविता पथक प्रत्येकवेळी माघारी परतल्याची माहिती इब्राहीम यांनी दिली.

न्यायालयाच्या निर्देशानंतरही कारवाई नाहीमहापालिकेकडून न्याय मिळत नसल्याने इब्राहीम यांनी न्यायालयात धाव घेतली. ३० जुलै २०१५ रोजी न्यायालयाने महापालिका प्रशासनाला या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. परंतु अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही.

भटकंती करून थकलोगेल्या २२ वर्षापासून अतिक्रमण हटावे यासाठी संघर्ष करीत आहे. सुरुवातीला मुले लहान होती. आता मोठी झाली आहे. न्यायासाठी भटकंती करून थकलो आहे. परंतु न्याय मिळेल अशी आशा आहे. महापालिकेत गरिबाला न्याय मिळत नाही. अशी व्यथा मन्सूर इब्राहीम यांनी मांडली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका