शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

न्याय मिळाला पण २२ वर्षांपासून अंमलबजावणीची प्रतिक्षा; नागपूर महानगरपालिकेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 11:18 IST

गेल्या २२ वर्षापासून अतिक्रमण हटावे यासाठी संघर्ष करीत आहे. सुरुवातीला मुले लहान होती. आता मोठी झाली आहे. न्यायासाठी भटकंती करून थकलो आहे. परंतु न्याय मिळेल अशी आशा आहे. महापालिकेत गरिबाला न्याय मिळत नाही. अशी व्यथा मन्सूर इब्राहीम यांनी मांडली.

ठळक मुद्देमनपा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हन्यायालयाच्या निर्णयानंतरही अतिक्रमण कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या गांधीबाग झोनमधील नवाबपुरा येथील निवासी मन्सूर शरीफ शेख इब्राहीम १९९५साली काही महिन्यासाठी बाहेरगावी गेले होते. या दरम्यान त्यांच्या मालकीच्या ४५० चौरस फूट जागेवर शेजाऱ्याने अतिक्रमण केले. त्यावेळी मन्सूर इब्राहीम ४४ वर्षांचे होते. आज त्यांचे वय ६६ वर्षे झाले तरीही महापालिक ा मुख्यालय व गांधीबाग झोनमध्ये चकरा मारत आहे. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला.मुख्यमंत्री, नगर विकास विभागाला निवेदने दिली. परंतु त्यांना न्याय मिळालेला नाही. आजही अतिक्रमण कायम आहे. न्याय मिळेल अशा आशेने गुरुवारी त्यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांची भेट घेऊ न अतिक्रमण हटविण्याची मागणी केली.लोकमतशी चर्चा करताना मन्सूर इब्राहीम म्हणाले, अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका आयुक्त, झोनचे सहायक आयुक्त, महापौर यांना वेळोवेळी निवेदने दिली. पोलीस स्टेशनलाही तक्रार दिली. परंतु शेजारी घनश्याम नाकाडे यांनी केलेले अतिक्रमण हटविले नाही.२७ नोव्हेंबर १९९५ रोजी महापालिकेच्या प्रवर्तन विभागाचे पथक अतिक्रमण काढण्यासाठी आले होते. परंतु पथक कारवाई न करताच परतले. त्यानंतर पुन्हा तक्रार केली. ३ जानेवारी १९९६ रोजी दुसऱ्यांदा पथक आले. परंतु अतिक्रमण हटविले नाही. प्रवर्तन विभागाने २००४ मध्ये शिडी तोडण्याचे आदेश काढले.पण ही फाईल वेगवेगळ्या विभागात २०१० पर्यत फिरत होती. १९जानेवारी २०११ रोजी पुन्हा पथक आले. पण कारवाई न करताच पथक परतले. कारवाई करण्यासाठी अनेकदा पथक आले. परंतु अतिकमण न हटविता पथक प्रत्येकवेळी माघारी परतल्याची माहिती इब्राहीम यांनी दिली.

न्यायालयाच्या निर्देशानंतरही कारवाई नाहीमहापालिकेकडून न्याय मिळत नसल्याने इब्राहीम यांनी न्यायालयात धाव घेतली. ३० जुलै २०१५ रोजी न्यायालयाने महापालिका प्रशासनाला या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. परंतु अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही.

भटकंती करून थकलोगेल्या २२ वर्षापासून अतिक्रमण हटावे यासाठी संघर्ष करीत आहे. सुरुवातीला मुले लहान होती. आता मोठी झाली आहे. न्यायासाठी भटकंती करून थकलो आहे. परंतु न्याय मिळेल अशी आशा आहे. महापालिकेत गरिबाला न्याय मिळत नाही. अशी व्यथा मन्सूर इब्राहीम यांनी मांडली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका