शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जरा हटके! तब्बल ७३६९ शब्दांनी रचली निसर्गपूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 10:17 IST

नागपुरातील अ‍ॅड. श्रीपाद वैद्य यांनी निसर्गाची पूजा लिखित स्वरूपात रचली आहे. त्यांच्या या पूजेची नोंद ‘मिरॅकल्स वर्ल्ड रेकॉर्ड’ ने ‘लॉँगेस्ट हॅण्डरिटन मॅन्युस्क्रीप्ट आॅफ गॉड निसर्गदत्त इकोवर्शिप’ म्हणून केली आहे.

ठळक मुद्देनिसर्ग संवर्धनाचा उद्देशमिरॅकल वर्ल्ड रेकॉर्डने घेतली नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निसर्गसंवर्धन ही काळाची गरज आहे. पर्यावरण संरक्षणाच्या सत्कार्याला भगवंताच्या अधिष्ठानाची जोड मिळाल्यास ते कार्य नक्कीच सफल होऊ शकते, या भावनेतून नागपुरातील अ‍ॅड. श्रीपाद वैद्य यांनी आजवर निर्गुण स्वरूपात असलेल्या निसर्गाची पूजा लिखित स्वरूपात रचली आहे. त्यांच्या या पूजेची नोंद ‘मिरॅकल्स वर्ल्ड रेकॉर्ड’ ने ‘लॉँगेस्ट हॅण्डरिटन मॅन्युस्क्रीप्ट आॅफ गॉड निसर्गदत्त इकोवर्शिप’ म्हणून केली आहे.हिंदू संस्कृतीतील पूजनामध्ये निसर्गाचे अस्तित्व समाविष्ट आहे. पण ते एका मर्यादित स्वरूपात आणि त्याकडेही आपण डोळेझाक करतो आहे. एवढेच नाही तर पूजेच्या स्वरूपात म्हणा की धार्मिक परंपरेच्या रूपात निसर्गाचे दोहनसुद्धा करतो. जसे चौरंगावर पूजा मांडताना आंब्याच्या डाहाळी तोडणे, केळीचे खांब चौरंगाला बांधणे, दसऱ्याच्या सणाला आपट्याच्या झाडाची कत्तल करणे, पोळ्याला मेढ्या म्हणून झाड तोडणे, होळीला वृक्षांचे दहन करणे. वेगवेगळ्या सणांच्या माध्यमातून निसर्गाचे दोहन आपण करतो. श्रीपाद यांनी रचलेली पूजा निसर्गाच्या दोहनाची नाही तर निसर्गाच्या रक्षणाच्या हेतूने लिहिली आहे. त्यांनी ७३६९ शब्दांची निसर्गपूजा ही स्वहस्ताक्षरात लिहिली आहे. यात घेतलेले संदर्भ हे श्रीमद्भगवत गीता, दत्तगुरूचरित्र, पंचांग व विविध धार्मिक ग्रंथातून घेतले आहे. श्रीपाद यांच्यामते निसर्ग हा देव आहे आणि तो दृष्य स्वरूपात आहे. श्रीदत्तांनी सुद्धा निसर्गातील २४ घटकांना गुरू मानले होते. श्रीपाद यांनी श्रीदत्त चरित्रातून काही संदर्भ घेतले आहेत. निसर्गाच्या या २४ घटकावर त्यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या कथा रचल्या आहेत. निसर्गाच्या प्रत्येक घटकाचे महत्त्व विषद केले आहे. पूजेच्या माध्यमातून काही संकल्प मांडले आहेत. ते संकल्प निसर्ग संवर्धनासाठी मानवाला प्रेरित करणारे आहे. विशेष म्हणजे शास्त्रानुसार जी पूजा पद्धती आहे, त्याला जराही धक्का न लावता, कर्मकांडाचा समावेश नसलेली निव्वळ निसर्गाचे अस्तित्व अनुभव करून देणारी ही निसर्गदत्त पूजा आहे. ही पूजा लिहिताना पूजेसाठी वापरण्यात येणारे साहित्य, मंत्र आणि कथांचाही समावेश केला आहे.

निसर्गदत्त पूजा म्हणजे काय?श्रीपाद यांच्या मते निसर्ग हा या सृष्टीचा खरा ईश्वर आहे. निसर्गातील वेगवेगळ्या घटकांच्या महत्त्वाला धार्मिकतेशी जोडून आणि वैज्ञानिक संदर्भ देऊन मानवी कल्याणाचा संदेश त्यातून दिला आहे. निसर्गदत्त पूजा ही साधी पूजापद्धती आहे. फक्त निसर्ग हा घटक श्रद्धेय ठेवून तयार केलेली पूजा आहे.

परस्पर स्नेह, वृक्ष व प्राण्यांप्रति आपुलकीची भावना असलेली निसर्गभक्ती वाढीस लागल्याने पर्यावरण समतोल राखला जाऊ शकेल. याच जाणिवेतून निसर्गदत्त ईश्वराप्रति म्हणजेच निसर्गाप्रति आदर व्यक्त व्हावा म्हणून ही निसर्गपूजा महत्त्वाची ठरते. निसर्गपूजेच्या अनुकरणातून व प्रसारातून निसर्गसंवर्धनाला हातभार लागेल हाच उद्देश आहे.-अ‍ॅड. श्रीपाद वैद्य,निसर्गपूजेचे लेखक

टॅग्स :Natureनिसर्ग