शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पवनी रेंजचे जंगल महिला गार्ड्सच्या हवाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:12 IST

नागपूर : उमरेड-कऱ्हाडला-पवनी अभयारण्याच्या सुरक्षेवरून वनविभागाला एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागताे आहे. अभयारण्याच्या पवनी रेंजच्या जंगलासाठी ५ महिला ...

नागपूर : उमरेड-कऱ्हाडला-पवनी अभयारण्याच्या सुरक्षेवरून वनविभागाला एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागताे आहे. अभयारण्याच्या पवनी रेंजच्या जंगलासाठी ५ महिला वनरक्षक आणि केवळ २ पुरुष वनरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हीच बाब जंगलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अडचणीची ठरत आहे. विशेषत: रात्रीच्या गस्तीची समस्या वन्यजीव विभागाला येत आहे. मात्र, महिला सबलीकरणाचा मुद्दा आल्याने वनविभागच काेंडीत सापडला आहे.

उमरेड-कऱ्हाडला अभयारण्यांतर्गत पवनी रेंजमध्ये व्याघ्र मृत्यूच्या दाेन माेठ्या घटना गेल्या काही महिन्यांत घडल्या आहेत. त्यामुळे मात्र हा मुद्दा अधिकच ऐरणीवर आला आहे. पवनी रेंजचे जंगल ७ बिटमध्ये विभागले आहे. त्यासाठी वनरक्षक नियुक्त करताना ५ महिला गार्ड्सची नियुक्ती करण्याचा निर्णय प्रादेशिक विभागाच्या बदली समितीने घेतला. भरीस भर म्हणजे विभागात असलेल्या ३ विशेष पदावरही महिलांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे सूत्राच्या माहितीनुसार नियुक्त करण्यात आलेल्या महिला वनरक्षकांना रात्रीच्या ड्युटीवर तैनात करू नये, अशा सूचनाही पीसीसीएफ (वन्यजीव) यांच्याकडून प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे वनविभागाच्या वन्यजीव विभागाची आणखीनच काेंडी हाेत आहे.

वनविभागाच्या नियुक्त्या प्रादेशिक विभागाच्या समितीकडून हाेत असतात. मात्र, यामध्ये वन्यजीव विभागाचे अधिकारीही असतात. वनरक्षकांच्या नियुक्तीमध्ये किमान समताेल असणे गरजेचे आहे, असे वन्यजीव अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहे. गेल्या काही महिन्यांत उमरेड-कऱ्हाडला अभयारण्यात सातत्याने व्याघ्र मृत्यू हाेत असल्याने, हे क्षेत्र अतिसंवेदनशील म्हणून गृहीत धरले जात आहे. अशा वेळी सामंजस्याने निर्णय घेऊन असलेली पदे कायम ठेवून आणखी मनुष्यबळ तैनात करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दाेन वर्षांपासून सतावते समस्या

विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर, दाेन वर्षांपासून हा मुद्दा सतावत असल्याचे सांगितले. दाेन वर्षांपूर्वी व्याघ्रमृत्यूची घटना घडल्यानंतर हा मुद्दा उपस्थित झाला हाेता. ही बाब आम्हाला अडचणीची हाेत असली, तरी नियुक्ती किंवा बदलीचा विषय आमच्या अधिकार क्षेत्रात नसल्याने काही सांगता येत नसल्याचे ते म्हणाले. मात्र, बदली समितीने विचारपूर्वक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.