शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जूनमध्ये पाऊस न आल्यास नागपुरात पाणीसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 20:45 IST

नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच आणि कन्हान नदी प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. १० जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी आहे. जून महिन्यात वेळेवर पाऊस न आल्यास शहरातील नागरिकांना पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे महापालिका प्रशासनाची व पदाधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्दे१० जूनपर्यंत पुरेल इतकाच जलसाठाअनावश्यक पाण्याचा वापर टाळण्याचे आवाहनमहापौरांनी पेंच आणि कन्हान प्रकल्पाचा केला दौरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच आणि कन्हान नदी प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. १० जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी आहे. जून महिन्यात वेळेवर पाऊस न आल्यास शहरातील नागरिकांना पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे महापालिका प्रशासनाची व पदाधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.सध्या शहराला दररोज पाणी पुरवठा होत आहे. परंतु शिल्लक जलसाठा विचारात घेता पाण्याचा थेंबही वाया जाऊ नये, याची नागरिकांनी काळजी घ्यावी, पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा,असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. यात नागपूर जिल्ह्याच्या काही भागाचा समावेश आहे. शहराला दररोज पाणीपुरवठा होत असला तरी नवेगाव खैरी व तोतलाडोह प्रकल्पात जेमतेम ४४.४३९ दलघमी पाणी साठा शिल्लक आहे. त्यापैकी प्रति दिन १.३० दलघमी पाण्याचा वापर सुरू आहे. अर्थात उपलब्ध साठा हा १० जूनपर्यंतच पुरेल इतका आहे.निर्माण झालेली परिस्थिती आणि भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने काय करता येईल, याची माहिती जाणून घेण्यासाठी महापौरांनी सोमवारी नवेगाव खैरी येथील पेंच प्रकल्प आणि कामठी नजीकच्या कन्हान नदी प्रकल्पाला भेट दिली. या दोन्ही प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती घेतली. उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, मनोज गणवीर, उपअभियंता राजेश दुफारे, ओसीडब्ल्यूचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय रॉय, निदेशक के.एम.पी.सिंग, उपनिदेशक संजय कालरा आदी उपस्थित होेते.कामठीनजीक कन्हान नदीवर असलेल्या कन्हान पाणी पुरवठा केंद्राला भेट दिली असता येथील पाण्याची पातळी अत्यंत खालावल्याचे निदर्शनास आले. १५जूनपर्यंतत पाऊस नाही आला तर परिस्थिती अत्यंत गंभीर होणार असल्याची बाबही अधिकाऱ्यांनी महापौरांच्या लक्षात आणली. संभाव्य संकट विचारात घेता यावर उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलावीत, असे निर्देश पिंटू झलके यांनी दिले.पाणी चोरीला आळा घाला, जपून वापर कराप्रकल्पात पुरेसा जलसाठा नसल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी दौऱ्यानंतर महापौर नंदा जिचकार यांनी महापौर कक्षात तातडीची बैठक घेतली. उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजित बांगर, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, यांच्यासह ओसीडब्ल्यूचे अधिकारी उपस्थित होते. १० जूनपर्यंत पुरेल इतका साठा असला तरी तो ३० जूनपर्यंत पुरेल असे नियोजन करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. आवश्यक उपाययोजना करून पाण्याच्या चोरीवर निर्बंध घालण्यात यावा. पाण्याचा जपून वापर करण्यासाठी नगरसेवकांच्या माध्यमातून पाणी बचतीसंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन महापौरांनी केले. नियोजनासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाwater scarcityपाणी टंचाई