शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

५० हजार घरकुलांचे वचन ठरले ‘जुमला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 17:44 IST

नागपूर शहरात ५० हजार घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. आश्वासन मोठे असल्याने नंतर १० हजार घरकुलांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. मात्र अद्याप मनपाने ही योजनाच राबविलेली नाही.

ठळक मुद्देमनपाने प्रधानमंत्री आवास योजनाच राबविली नाही : ७२ हजार अर्ज कचऱ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सन २०१७ च्या निवडणुकीत महापालिकेतील सत्ताधारी भाजपने ‘आमचा संकल्प हाच आमचा वचननामा’मध्ये ५० हजार घरकुलांचे दिलेले आश्वासन ‘जुमला’च ठरले आहे. गेल्या पाच वर्षांत या योजनेत मनपाने एकही घरकुल उभारलेले नाही. बेघर लोकांना हक्काचे घर देण्याचे आश्वासन स्वप्नरंजन ठरले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबाचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू केली. याअंतर्गत नागपूर शहरात ५० हजार घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. आश्वासन मोठे असल्याने नंतर १० हजार घरकुलांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. मात्र अद्याप मनपाने ही योजनाच राबविलेली नाही. लाभार्थींचे स्वप्न अपूर्णच राहिले. वास्तविक जाहीरनाम्यात शहरातील प्रत्येक कुटुंबाला स्वत:चे मालकीचे घर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यासाठी मनपाच्या झोनस्तरावर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून ही योजना प्रभावीपणे राबविण्याची ग्वाही दिली होती.

नासुप्रतर्फे शहरातील वाठोडा, तरोडी, वांजरी येथे ४५४० घरकुलांची योजना राबविली जात आहे. यातील दोन हजारांहून अधिक घरांचे वाटप झाले आहे. यामुळे झोपडपट्टीधारकांना थोडा दिलासा मिळाला आहे, अन्यथा नागपुरात प्रधानमंत्री आवास योजना कागदावरच राहिली असती.

७२ हजार अर्ज कचऱ्यात

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी मनपाने गरजू लोकांकडून अर्ज मागविले होते. त्यानुसार ७२ हजार लोकांनी अर्ज सादर केले. अर्ज सादर करण्यासाठी नागरिकांना खर्च करावा लागला. मात्र सर्व अर्ज कचऱ्यात गेले आहेत. मे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या कंपनीची अर्ज छाननीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. कंपनीला प्रतिनागरिक १४८ रुपये शुल्कानुसार २६ लाख ६४ हजार रुपये खर्च करण्यात आले. परंतु हा खर्चही पाण्यात गेला.

टॅग्स :HomeघरGovernmentसरकार