शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

५० हजार घरकुलांचे वचन ठरले ‘जुमला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 17:44 IST

नागपूर शहरात ५० हजार घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. आश्वासन मोठे असल्याने नंतर १० हजार घरकुलांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. मात्र अद्याप मनपाने ही योजनाच राबविलेली नाही.

ठळक मुद्देमनपाने प्रधानमंत्री आवास योजनाच राबविली नाही : ७२ हजार अर्ज कचऱ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सन २०१७ च्या निवडणुकीत महापालिकेतील सत्ताधारी भाजपने ‘आमचा संकल्प हाच आमचा वचननामा’मध्ये ५० हजार घरकुलांचे दिलेले आश्वासन ‘जुमला’च ठरले आहे. गेल्या पाच वर्षांत या योजनेत मनपाने एकही घरकुल उभारलेले नाही. बेघर लोकांना हक्काचे घर देण्याचे आश्वासन स्वप्नरंजन ठरले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबाचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू केली. याअंतर्गत नागपूर शहरात ५० हजार घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. आश्वासन मोठे असल्याने नंतर १० हजार घरकुलांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. मात्र अद्याप मनपाने ही योजनाच राबविलेली नाही. लाभार्थींचे स्वप्न अपूर्णच राहिले. वास्तविक जाहीरनाम्यात शहरातील प्रत्येक कुटुंबाला स्वत:चे मालकीचे घर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यासाठी मनपाच्या झोनस्तरावर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून ही योजना प्रभावीपणे राबविण्याची ग्वाही दिली होती.

नासुप्रतर्फे शहरातील वाठोडा, तरोडी, वांजरी येथे ४५४० घरकुलांची योजना राबविली जात आहे. यातील दोन हजारांहून अधिक घरांचे वाटप झाले आहे. यामुळे झोपडपट्टीधारकांना थोडा दिलासा मिळाला आहे, अन्यथा नागपुरात प्रधानमंत्री आवास योजना कागदावरच राहिली असती.

७२ हजार अर्ज कचऱ्यात

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी मनपाने गरजू लोकांकडून अर्ज मागविले होते. त्यानुसार ७२ हजार लोकांनी अर्ज सादर केले. अर्ज सादर करण्यासाठी नागरिकांना खर्च करावा लागला. मात्र सर्व अर्ज कचऱ्यात गेले आहेत. मे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या कंपनीची अर्ज छाननीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. कंपनीला प्रतिनागरिक १४८ रुपये शुल्कानुसार २६ लाख ६४ हजार रुपये खर्च करण्यात आले. परंतु हा खर्चही पाण्यात गेला.

टॅग्स :HomeघरGovernmentसरकार