शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

यातनांचा प्रवास थांबला! हातापायावरचे ओरखडे माणुसकीच्या मलमाने भरून निघाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 09:48 IST

हमार देस मे हमे जल्दी भेजो ना साहेब! ही त्यांची प्राण डोळ्यात आणून केलेली विनवणी खुद्द पोलीस आयुक्तांच्या जीवाचीही घालमेल वाढवून गेली. खुद्द पोलीस आयुक्तांनी लोकमत जवळ परप्रांतीय मजुरांच्या भावना गुरुवारी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देमनातील खोच कायमनागपूर मरेपर्यंत विसरता येणार नाही, गावोगावच्या मजुरांची भावना

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कमैं अकेलेही चला था जानिबे ए मंजिल की और।लोग जुडते गये और कारवा बनता गया!!लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या ठिकाणी रक्त आटवले, हाडाची काड करून गगनचुंबी इमारती उभारल्या, तेथे वीतभर पोटाची खळगी भरणे शक्य झाले नाही. मात्र ज्या शहराचे फक्त नावच ऐकून होतो त्या नागपूरने शरीरावरील सर्व ओरखडे भरून काढले. पोटभर अन्नही दिले. आपल्यातील काही साथीदार त्यांच्या गावाकडे रवाना देखील झाले. हे त्यांच्यासाठी आश्वासक आहे. मात्र, आपल्याला अजून आपल्या गावाला जायला मिळाले नाही, याची अजूनही त्यांना हुरहूर आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याजवळ या गरीब बेसहारा मजुरांनी आपल्या भाषेत त्यांना आपल्या वेदना ऐकवल्या. हमार देस मे हमे जल्दी भेजो ना साहेब! ही त्यांची प्राण डोळ्यात आणून केलेली विनवणी खुद्द पोलीस आयुक्तांच्या जीवाचीही घालमेल वाढवून गेली. खुद्द पोलीस आयुक्तांनी लोकमत जवळ परप्रांतीय मजुरांच्या भावना गुरुवारी व्यक्त केल्या.कोरोनाने सगळ्यांचीच दाणादाण उडविली आहे. भल्याभल्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. तेथे पोट भरण्यासाठी शेकडो मैलांवरून मजुरांनी येणे फारच वाईट आहे.लॉकडाऊननंतर या बिचाऱ्यांचे जगणेच कैद झाले आहे. ज्या शहरात मोठमोठ्या इमारती उभारण्यासाठी त्यांनी आपल्या रक्ताचा घाम अन हाडाची काड केली तेथे लॉकडाऊननंतर त्यांना आसरा मिळेनासा झाला. उपाशीपोटी किती दिवस राहणार, असा प्रश्न स्वत:च स्वत:ला करून त्यांनी ‘गड्या आपला गाव बरा’ म्हणत चक्क पायीच गावाचा रस्ता धरला. कुणी हैदराबादहून निघाले, कुणी तामिळनाडू, कुणी चेन्नई तर कुणी मुंबई, नाशिकमधून रेल्वेच्या रुळावरून वाटा तुडवू लागले. जंगल, झुडपातील काट्याकुट्यानी त्यांच्या हातापायाला अक्षरश: ओरबडून काढले आहे. रस्त्यात अनेक गावे लागली. काही ठिकाणी त्यांना अन्न मिळाले मात्र काही ठिकाणी पाणीदेखील मिळाले नाही. मोठ्यांचे भागून जाते, चिल्यापिल्यांना काय सांगणार. मात्र उपाय नव्हता. त्यामुळे पुढचे गाव गाठण्यासाठी रात्रंदिवस ही मंडळी यातना सोबत घेऊन प्रवास करत होती. अखेर नागपूर आले. शहराला जोडणाऱ्या सर्व सीमांवर, नाक्यांवर पायपीट करणाºया मजुरांसाठी तात्पुरते पेंडॉल टाकण्यात आलेले आहेत. इथे या मजुरांची नोंदणी होत आहे. ते कुठून आले, त्यांना कुठे जायचे आहे, ते सर्व लिहून घेतले जात आहे. केवळ एवढ्यावरच नागपूरकर थांबले नाही. या बिचाऱ्यांच्या खाण्यापिण्याचीही सोय करण्यात आली आहे. त्यांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेकडो मजुरांसाठी शेल्टर होममध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.नागपूरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा या प्रांतातील मजुरांना त्यांच्या त्यांच्या प्रांतात नेऊन सोडण्यासाठी सेवाभावी संस्था संघटनांच्या माध्यमातून पोलिसांनी बसेसची सोय केली आहे. जी मंडळी बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, झारखंड अशा दूरवरच्या राज्यातील आहे, त्यांच्यासाठी ट्रेनची व्यवस्था आहे. अनेकांना त्यांच्या गावाला पाठविण्यात आले आहे तर अनेकांना प्रवासाची व्यवस्था होईपर्यंत थांबवून घेण्यात आले आहे. रोजच पायपीट करून नागपुरात येणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. पोटात तहानभूक घेऊन आलेल्या या बिचाऱ्यांना पोटभर जेवण दिले जात आहे. स्वच्छ पाणी आणि आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांची व्यवस्था नीट आहे की नाही, ते बघण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय दिवसभर वेगवेगळ्या मजुरांच्या कॅम्पला भेटी देऊन तेथील मजुरांची वास्तपुस्त करत आहेत. या आपलेपणाने ही मंडळी भारावून गेली आहे. ती पोलीस अधिकाऱ्यांजवळ आपल्या भावना व्यक्त करीत आहेत.ज्या शहरांसाठी आम्ही आमचे रक्त आटवले. तेथे आमची सोय झाली नाही. मात्र ज्या शहराचे फक्त नाव ऐकले होते, त्या नागपुरात आम्हाला पोटभर जेवायला मिळाले आहे. शरीरावर पडलेल्या जखमांवर उपचारही मिळाले असून मनावरही आपुलकीची फुंकर घातली गेली आहे. आमच्या सोबत वाटा तुडवत आलेले वेगवेगळ्या ठिकाणचे अनेक जण त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात निघून गेले आहे. याचा खूपच आनंद वाटत आहे.आता आम्हालाही लवकरात लवकर आमच्या गावाला सोडून देण्याची व्यवस्था करा, अशी विनवणी ते करत आहेत. या भावना व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यात कृतज्ञता दिसते. ज्यांना कालपरवा पर्यंत कधी बघितले नाही आणि भविष्यात ते समोर येतील, याचीही सुतराम शक्यता नाही, अशी ही गरीब मंडळी आम्ही नागपूरला कधीच विसरू शकणार नाही, असे म्हणत आहे. आपल्या आयुष्यातील ही घडी आपलेही संचित आहे. ठिकठिकाणी होत असलेली मजुरांची दैना मनाला अस्वस्थ करत असताना नागपूरकरांकडून मजुरांच्या व्यवस्थेसाठी मिळणारी साथ पोलिसांच्या प्रयत्नांना सुखद आणि भक्कम बळ देणारी आहे, मजुरांच्या वेदनांचा प्रवास थांबला ही आत्यंतिक सुखद बाब आहे, असे लोकमत जवळ व्यक्त होताना पोलीस आयुक्त म्हणतात.अनेकांनी अक्षरश: झोकून दिलेप्रारंभी परप्रांतीय मजुरांची व्यवस्था कशी होईल, हा प्रश्न धडकी भरवत होता. मात्र, चांगले काम करायला सुरुवात केली की आपसूकच ईश्वर मदतीला धावून येतो. येथे असेच झाले आहे.एकीकडे प्रचंड दहशत बघायला मिळत आहे. दुसरीकडे सेवायज्ञाच्या या धगधगत्या कुंडात हजारो नागपूरकर सेवेकऱ्यांनी स्वत:ला अक्षरश: झोकून दिले आहे. असा अनुभव कधीच आला नाही आणि भविष्यातही तो येईल, असे वाटत नाही, असेही पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय म्हणतात.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस