शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांनी विवेकबुद्धी राखून काम करावे : सिद्धार्थविनायक काणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 23:08 IST

पत्रकारांकडे बुद्धिमत्ता, शहाणपणा व चातुर्य तर असलेच पाहिजे. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी विवेकबुद्धी राखून काम करावे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजनसंवाद विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुलगुरूपद स्वीकारले तेव्हा पत्रकारांची काहिशी भीती वाटायची. मात्र आता त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक वाटते. पत्रकारांकडे बुद्धिमत्ता, शहाणपणा व चातुर्य तर असलेच पाहिजे. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी विवेकबुद्धी राखून काम करावे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले. नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे गुरुवारी उद्घाटन झाले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.विभागाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, माजी विभागप्रमुख प्रा.शरद पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, विभागप्रमुख डॉ. मोईज हक प्रामुख्याने उपस्थित होते. जर पत्रकारांनी विवेकशून्य विचारातून काही मांडले तर त्यात सखोलता राहत नाही. पत्रकारांसमोर तंत्रज्ञानाचेदेखील आव्हान आहे, असे डॉ.काणे म्हणाले. सामाजिक विकासात प्रसारमाध्यमांची मौलिक भूमिका असते. लिखाण हे पत्रकारांचे सर्वात मोठे शस्त्र आहे. पत्रकारिता करत असताना नीतीमत्ता ढासळू न देण्यावर भर दिला पाहिजे. नीतीमूल्यांवर आधारित पत्रकारिता व माध्यम स्वातंत्र्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जनसंवाद विभागाच्या पुढील विकासासाठी विद्यापीठाकडून सर्व सहकार्य केले जाईल, असे डॉ.देशपांडे यांनी सांगितले. पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. तंत्रज्ञानासोबत आपली गती कायम राखण्याचे आव्हान या क्षेत्रासमोर आहे. या क्षेत्रात येण्यास इच्छुक असलेल्यांनी सजगतेचा गुण अंगी बाळगणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा.शरद पाटील यांनी केले.प्रास्ताविकादरम्यान डॉ.मोईज हक यांनी विभागाच्या प्रवासाबाबत भाष्य केले. तसेच फेब्रुवारी महिन्यात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या प्रसंगी माजी विभागप्रमुख प्रा. के.जी. मिसार, प्रा. चंद्रशेखर गुप्ता, डॉ. विनोद इंदूरकर आणि प्रा. शरद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांद्वारे संपादित वार्षिकांक ‘कॅम्पस’चे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अमर अणे यांनी संचालन केले तर प्रा.स्निग्धा खटावकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Journalistपत्रकार