शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पत्रकारांनी विवेकबुद्धी राखून काम करावे : सिद्धार्थविनायक काणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 23:08 IST

पत्रकारांकडे बुद्धिमत्ता, शहाणपणा व चातुर्य तर असलेच पाहिजे. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी विवेकबुद्धी राखून काम करावे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजनसंवाद विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुलगुरूपद स्वीकारले तेव्हा पत्रकारांची काहिशी भीती वाटायची. मात्र आता त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक वाटते. पत्रकारांकडे बुद्धिमत्ता, शहाणपणा व चातुर्य तर असलेच पाहिजे. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी विवेकबुद्धी राखून काम करावे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले. नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे गुरुवारी उद्घाटन झाले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.विभागाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, माजी विभागप्रमुख प्रा.शरद पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, विभागप्रमुख डॉ. मोईज हक प्रामुख्याने उपस्थित होते. जर पत्रकारांनी विवेकशून्य विचारातून काही मांडले तर त्यात सखोलता राहत नाही. पत्रकारांसमोर तंत्रज्ञानाचेदेखील आव्हान आहे, असे डॉ.काणे म्हणाले. सामाजिक विकासात प्रसारमाध्यमांची मौलिक भूमिका असते. लिखाण हे पत्रकारांचे सर्वात मोठे शस्त्र आहे. पत्रकारिता करत असताना नीतीमत्ता ढासळू न देण्यावर भर दिला पाहिजे. नीतीमूल्यांवर आधारित पत्रकारिता व माध्यम स्वातंत्र्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जनसंवाद विभागाच्या पुढील विकासासाठी विद्यापीठाकडून सर्व सहकार्य केले जाईल, असे डॉ.देशपांडे यांनी सांगितले. पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. तंत्रज्ञानासोबत आपली गती कायम राखण्याचे आव्हान या क्षेत्रासमोर आहे. या क्षेत्रात येण्यास इच्छुक असलेल्यांनी सजगतेचा गुण अंगी बाळगणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा.शरद पाटील यांनी केले.प्रास्ताविकादरम्यान डॉ.मोईज हक यांनी विभागाच्या प्रवासाबाबत भाष्य केले. तसेच फेब्रुवारी महिन्यात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या प्रसंगी माजी विभागप्रमुख प्रा. के.जी. मिसार, प्रा. चंद्रशेखर गुप्ता, डॉ. विनोद इंदूरकर आणि प्रा. शरद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांद्वारे संपादित वार्षिकांक ‘कॅम्पस’चे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अमर अणे यांनी संचालन केले तर प्रा.स्निग्धा खटावकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Journalistपत्रकार