शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

पत्रकारांनी विवेकबुद्धी राखून काम करावे : सिद्धार्थविनायक काणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 23:08 IST

पत्रकारांकडे बुद्धिमत्ता, शहाणपणा व चातुर्य तर असलेच पाहिजे. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी विवेकबुद्धी राखून काम करावे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजनसंवाद विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुलगुरूपद स्वीकारले तेव्हा पत्रकारांची काहिशी भीती वाटायची. मात्र आता त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक वाटते. पत्रकारांकडे बुद्धिमत्ता, शहाणपणा व चातुर्य तर असलेच पाहिजे. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी विवेकबुद्धी राखून काम करावे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले. नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे गुरुवारी उद्घाटन झाले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.विभागाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, माजी विभागप्रमुख प्रा.शरद पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, विभागप्रमुख डॉ. मोईज हक प्रामुख्याने उपस्थित होते. जर पत्रकारांनी विवेकशून्य विचारातून काही मांडले तर त्यात सखोलता राहत नाही. पत्रकारांसमोर तंत्रज्ञानाचेदेखील आव्हान आहे, असे डॉ.काणे म्हणाले. सामाजिक विकासात प्रसारमाध्यमांची मौलिक भूमिका असते. लिखाण हे पत्रकारांचे सर्वात मोठे शस्त्र आहे. पत्रकारिता करत असताना नीतीमत्ता ढासळू न देण्यावर भर दिला पाहिजे. नीतीमूल्यांवर आधारित पत्रकारिता व माध्यम स्वातंत्र्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जनसंवाद विभागाच्या पुढील विकासासाठी विद्यापीठाकडून सर्व सहकार्य केले जाईल, असे डॉ.देशपांडे यांनी सांगितले. पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. तंत्रज्ञानासोबत आपली गती कायम राखण्याचे आव्हान या क्षेत्रासमोर आहे. या क्षेत्रात येण्यास इच्छुक असलेल्यांनी सजगतेचा गुण अंगी बाळगणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा.शरद पाटील यांनी केले.प्रास्ताविकादरम्यान डॉ.मोईज हक यांनी विभागाच्या प्रवासाबाबत भाष्य केले. तसेच फेब्रुवारी महिन्यात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या प्रसंगी माजी विभागप्रमुख प्रा. के.जी. मिसार, प्रा. चंद्रशेखर गुप्ता, डॉ. विनोद इंदूरकर आणि प्रा. शरद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांद्वारे संपादित वार्षिकांक ‘कॅम्पस’चे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अमर अणे यांनी संचालन केले तर प्रा.स्निग्धा खटावकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Journalistपत्रकार