शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जोशी म्हणाले, काही बोलणार नाही

By admin | Updated: November 29, 2015 03:27 IST

बिहार निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर पक्षनेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे भाजपचे जेष्ठ नेते खा. डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी आता मात्र मौन साधले आहे.

संघ स्वयंसेवकांना केले मार्गदर्शन : स्मृतिमंदिरात घालविला दिवसनागपूर : बिहार निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर पक्षनेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे भाजपचे जेष्ठ नेते खा. डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी आता मात्र मौन साधले आहे. ‘लोकमत’ने त्यांची भेट घेतली असता, कोणत्याही राजकीय विषयावर मला भाष्य करायचे नाही असे म्हणत त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. डॉ.जोशी यांनी शनिवारी रेशीमबाग स्मृतिमंदिराला भेट दिली व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. ते दिवसभर स्मृतिमंदिरातच होते. रेशीमबागेत संघाच्या वरिष्ठ स्वयंसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात डॉ.जोशी यांनी देशभरातून आलेल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. एकात्म मानवतावाद आणि भारतीय दर्शन या विषयावर त्यांनी स्वयंसेवकांचे उद्बोधन केले. डॉ.जोशी सकाळी ११.३० च्या सुमारास स्मृतिमंदिरात पोहोचले व त्यानंतर ते सायंकाळी ५.१५ वाजेपर्यंत तेथेच होते. तेथून ते एका खासगी हॉटेलकडे रवाना झाले. दरम्यान, सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी दोघेही नागपुरात नसल्यामुळे डॉ.जोशी हे संघ मुख्यालयात गेले नाही. परंतु रेशीमबागेत त्यांनी संघाचे काही पदाधिकारी व प्रचारकांशी संवाद साधला. बिहार निवडणुकीच्या पराभवानंतर ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह तीन नेत्यांनी काढलेल्या संयुक्त निवेदनात डॉ. जोशी यांनीही स्वाक्षरी करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर टीका केली होती. डॉ.जोशी यांची संघाशी जवळीक आहे व या पार्श्वभूमीवर त्यांची रेशीमबागला उपस्थिती महत्त्वाची मानली जात होती. सध्याच्या राजकीय घडामोडींवर त्यांचे मत जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांना रेशीमबागेतच गाठले. मी येथे कोणत्याही राजकीय कार्यक्रमासाठी आलेलो नाही. त्यामुळे त्या विषयांवर भाष्य करणार नाही. हा माझा खासगी दौरा आहे व स्वयंसेवकांना मार्गदर्शन करायला आलो आहे. या दौऱ्याचा कोणीही आपल्या हिशेबाने अर्थ काढू नये, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी) स्वयंसेवकांना दिले आचार-विचारांचे मार्गदर्शनसंघाच्या शिबिरात डॉ.मुरली मनोहर जोशी यांनी स्वयंसेवकांना ‘एकात्म मानववाद व भारतीय दर्शन’ तसेच ‘वेद उपनिषद आणि षड्दर्शन’ यावर मार्गदर्शन केले. यावेळी इतिहासाचे विविध दाखले देत त्यांनी आजच्या काळात समाजात नीतिमत्ता व संस्कार यांचा प्रसार कसा व्हायला हवा यावर प्रकाश टाकला. शिवाय विविध क्षेत्रांत राजकारणाचा प्रभाव वाढत असताना आचार-विचारांची शुद्धतादेखील वाढणे आवश्यक असल्याच्या मुद्यावरदेखील त्यांनी भर दिला.