शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
3
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
4
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
5
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
6
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
7
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
8
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
9
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
10
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
11
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
12
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
13
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
14
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
15
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
16
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
17
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
18
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
19
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
20
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
Daily Top 2Weekly Top 5

‘जयचंद’चा भिवापूर परिसरातील जनावरांवर वारंवार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 10:59 IST

‘जयचंद’ नामक वाघाने शेतात असलेल्या गोठ्यातील जनावरांवर हल्ला चढविला. त्यात तीन जनावरे जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. २८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. त्यामुळे शेतकऱ्यांसह वन विभागाचीही झोप उडाली आहे.

ठळक मुद्देतीन जनावरांना केले जखमी महिनाभरातील तिसरी घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंधरवड्यापूर्वी गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात ‘जयचंद’ नामक वाघाचा बछडा पडला होता. त्यामुळे अभयारण्याबाहेर ‘जयचंद’चा मुक्त संचार वाढला असल्याचे स्पष्ट झाले. याच ‘जयचंद’ने शेतात असलेल्या गोठ्यातील जनावरांवर हल्ला चढविला. त्यात तीन जनावरे जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. २८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. त्यामुळे शेतकऱ्यांसह वन विभागाचीही झोप उडाली आहे.रुबाबदार शरीरयष्टी आणि आकर्षणाचे केंद्र असलेला ‘जय’ हा वाघ वर्षभरापासून बेपत्ता आहे. तर ‘चांदी’ वाघीणचे वास्तव्य अजूनही उमरेड अभयारण्यात आहे. ‘जयचंद’ हा ‘जय’ आणि ‘चांदी’चा बछडा आहे. ‘जय’सारखाच तोसुद्धा रुबाबदार आहे. सुमारे १५ दिवसांपूर्वी हाच ‘जयचंद’ अभयारण्याबाहेर निघाला. त्यातच तो गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात पडला. त्यानंतर त्याला कालव्यातून काढण्यासाठी वनविभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. त्याला काढताच त्याने धूम ठोकली. तेव्हापासून त्याने जंगलाबाहेर ठाण मांडले असल्याची शक्यता आहे. दरम्यान त्याने चिखली येथील पांडुरंग राजूरकर यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या बैलावर हल्ला चढवित ठार केले.‘जयचंद’ने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चिखली शिवारातील शरद दिघोरे यांच्या गोठ्यात प्रवेश केला. तेथे ११ जनावरे बांधून होती. त्यापैकी तीन जनावरांवर हल्ला केला. त्यात ते जखमी झाले असून दोन जनावरे मरणासन्न स्थितीत आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास शरद हे शेतात गेले असता त्यांना सदर प्रकार निदर्शनास आला. याबाबत वन विभागाला सूचना करताच घटनास्थळ गाठून पंचनामा करण्यात आला. ‘जयचंद’ने या घटनांपूर्वी चिखली शिवारातच एका जनावरावर हल्ला चढवित ठार केले होते, हे विशेष!

वाढते हल्ले थांबणार कधी?सध्या ‘जयचंद’चे जनावरांवरील वाढते हल्ले डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. जनावरांच्या नरडीचा घोट घेणाऱ्या वाघाचे नंतर मनुष्यावरही हल्ले होत गेले, याची आतापर्यंत अनेक उदाहरणे आहेत. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात अशाप्रकारे नरभरक्षक वाघाला गोळ्या घालण्यात आल्या. तर ब्रह्मपुरीच्या जंगलात वास्तव्यास असणाऱ्या वाघिणीनेही मनुष्यावर हल्ले चढवित जीवितहानी केली. त्यामुळे त्या वाघिणीला कैद करण्यात आले होते. तिला सोडताच पुन्हा तिचे वाढते हल्ले पाहता तिला मारण्याचे आदेश दिले होते. त्यातच त्या वाघिणीचा विद्युत तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाला. अशाप्रकारचे आता ‘जयचंद’लासुद्धा चटक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन विभागाने बंदोबस्त लावण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Tigerवाघ