शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

‘जयचंद’चा भिवापूर परिसरातील जनावरांवर वारंवार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 10:59 IST

‘जयचंद’ नामक वाघाने शेतात असलेल्या गोठ्यातील जनावरांवर हल्ला चढविला. त्यात तीन जनावरे जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. २८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. त्यामुळे शेतकऱ्यांसह वन विभागाचीही झोप उडाली आहे.

ठळक मुद्देतीन जनावरांना केले जखमी महिनाभरातील तिसरी घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंधरवड्यापूर्वी गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात ‘जयचंद’ नामक वाघाचा बछडा पडला होता. त्यामुळे अभयारण्याबाहेर ‘जयचंद’चा मुक्त संचार वाढला असल्याचे स्पष्ट झाले. याच ‘जयचंद’ने शेतात असलेल्या गोठ्यातील जनावरांवर हल्ला चढविला. त्यात तीन जनावरे जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. २८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. त्यामुळे शेतकऱ्यांसह वन विभागाचीही झोप उडाली आहे.रुबाबदार शरीरयष्टी आणि आकर्षणाचे केंद्र असलेला ‘जय’ हा वाघ वर्षभरापासून बेपत्ता आहे. तर ‘चांदी’ वाघीणचे वास्तव्य अजूनही उमरेड अभयारण्यात आहे. ‘जयचंद’ हा ‘जय’ आणि ‘चांदी’चा बछडा आहे. ‘जय’सारखाच तोसुद्धा रुबाबदार आहे. सुमारे १५ दिवसांपूर्वी हाच ‘जयचंद’ अभयारण्याबाहेर निघाला. त्यातच तो गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात पडला. त्यानंतर त्याला कालव्यातून काढण्यासाठी वनविभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. त्याला काढताच त्याने धूम ठोकली. तेव्हापासून त्याने जंगलाबाहेर ठाण मांडले असल्याची शक्यता आहे. दरम्यान त्याने चिखली येथील पांडुरंग राजूरकर यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या बैलावर हल्ला चढवित ठार केले.‘जयचंद’ने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चिखली शिवारातील शरद दिघोरे यांच्या गोठ्यात प्रवेश केला. तेथे ११ जनावरे बांधून होती. त्यापैकी तीन जनावरांवर हल्ला केला. त्यात ते जखमी झाले असून दोन जनावरे मरणासन्न स्थितीत आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास शरद हे शेतात गेले असता त्यांना सदर प्रकार निदर्शनास आला. याबाबत वन विभागाला सूचना करताच घटनास्थळ गाठून पंचनामा करण्यात आला. ‘जयचंद’ने या घटनांपूर्वी चिखली शिवारातच एका जनावरावर हल्ला चढवित ठार केले होते, हे विशेष!

वाढते हल्ले थांबणार कधी?सध्या ‘जयचंद’चे जनावरांवरील वाढते हल्ले डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. जनावरांच्या नरडीचा घोट घेणाऱ्या वाघाचे नंतर मनुष्यावरही हल्ले होत गेले, याची आतापर्यंत अनेक उदाहरणे आहेत. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात अशाप्रकारे नरभरक्षक वाघाला गोळ्या घालण्यात आल्या. तर ब्रह्मपुरीच्या जंगलात वास्तव्यास असणाऱ्या वाघिणीनेही मनुष्यावर हल्ले चढवित जीवितहानी केली. त्यामुळे त्या वाघिणीला कैद करण्यात आले होते. तिला सोडताच पुन्हा तिचे वाढते हल्ले पाहता तिला मारण्याचे आदेश दिले होते. त्यातच त्या वाघिणीचा विद्युत तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाला. अशाप्रकारचे आता ‘जयचंद’लासुद्धा चटक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन विभागाने बंदोबस्त लावण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Tigerवाघ