शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जावई-मेव्हण्याने लावला १०० काेटीला चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:08 IST

जगदीश जोशी नागपूर : अगरबत्ती उद्याेगात गुंतवणूक करून दाेन महिन्यांत दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवून लखनऊ येथील रहिवासी जावई ...

जगदीश जोशी

नागपूर : अगरबत्ती उद्याेगात गुंतवणूक करून दाेन महिन्यांत दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवून लखनऊ येथील रहिवासी जावई व मेव्हण्याच्या जाेडीने देशभरात लाेकांची १०० काेटींची फसवणूक केल्याचे प्रकरण समाेर आले आहे. पाॅश हाॅटेल्समध्ये सेमीनार आयाेजित करून या जाेडीने लाेकांना चुना लावला.

या फसवणुकीचा सूत्रधार गिरीशचंद्र गुप्ता व त्याचा मेव्हणा राजेशकुमार गुप्ता हाेय. दाेघांनी जीबीएस कंपनी सुरू करून अनिल सिबे संचालक, अजगर अलीला कंपनीचा प्रमाेटर व नागपूरचे राज शर्मा व प्रेम पुरके यांना एजंट म्हणून नियुक्त केले. ठगांनी शिताफीने अली, शर्मा व पुरके यांना समाेर केले. त्यांनी २०१९ मध्ये नागपूरच्या गुंतवणूकदारांशी संपर्क केला. त्यांना चर्चेसाठी मुंबईच्या पाॅश हाॅटेलमध्ये बाेलावले. विमानाची तिकिटेही काढून दिली. त्यानुसार वर्धेच्या सुनील जायसवाल यांच्यासह चार लाेक २६ मार्च राेजी मुंबईला गेले. अलीने जीजा व मेव्हण्याच्या कंपनीला १० वर्षांपासून ओळखत असल्याचे सांगितले. त्यांचा अगरबत्ती निर्मितीचा माेठा कारभार असून १०,५०० रुपये गुंतवणूक केल्यास २०,००० चा माल देण्यात येणार असल्याचे सांगितले. विक्री करण्याची इच्छा नसल्यास स्वत: कंपनी ते विकून १५,००० रुपये परत करेल, असे आमिष दाखविले.

मुंबईमध्ये अलीने जायसवाल व साेबत्यांना नागपूरच्या एका महिलेशी ओळख करून दिली. त्या महिलेस ७० हजार रुपयांचा चेक देण्यात आला. कंपनीने दाेन महिन्यांत दीडपट दिल्याचे त्या महिलेने सांगितले. जायसवालसह इतर १०-१२ लाेकांनी कंपनीमध्ये प्रत्येकी एक ते दाेन लाखांची गुंतवणूक केली. त्यांना दाेन महिन्यांतच दीडपट रक्कम परत करण्यात आली. पुन्हा पैसा देण्याऐवजी गुंतवणूक करण्याचे आवाहन जावई-मेव्हण्याने केले. चार महिने नफा दिल्यानंतर खरा खेळ सुरू झाला. मग पैसा परत करण्यास टाळाटाळ सुरू झाली. दरम्यान, २२ मार्च २०२० राेजी जनता कर्फ्यू व २४ मार्चला लाॅकडाऊन लावण्यात आला. लाॅकडाऊन लागताच गुप्ता जाेडीने कंपनीची वेबसाईट बंद करून टाकली आणि दाेघेही पसार झाले. गिरीश गुप्ताने स्वत:च्या मृत्यूचा खाेटा व्हिडीओ बनविला. जाेडीला शाेधण्यासाठी पीडित लखनऊपर्यंत गेले. तेथे त्यांचे चार बंगले असल्याची बाब समजली. गुंतवणूकदार तेथे पाेहोचताच दाेघांनी पळ काढला. या जाेडीने अलाहाबादमधल्या वकिलांचे ६.५० काेटी लंपास केले. याशिवाय लखनऊ, कानपूर, मंबईसह अनेक शहरांत फसवणुकीचे सत्र चालवून अनेकांना लुटले.

नागपुरातून लुटले २० काेटी

आर्थिक गुन्हे शाखेने ६ जुलै राेजी ३.३३ काेटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला; मात्र नागपूर व आसपासच्या शहरातून २० काेटींहून अधिकची फसवणूक केल्याचे लक्षात येत आहे. त्यातील २५० लाेकांची नावे समाेर आली असून फसवणूक झालेल्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पीडितांची स्थिती अतिशय वाईट

ठग जाेडीच्या आमिषाला बळी पडून अनेकांनी त्यात गुंतवणूक केली. काहींनी तर त्यांचे नातेवाईक व मित्रांनाही गुंतवणूक करायला भाग पाडले. आता ते मित्र व नातेवाईक पैशासाठी दबाव टाकत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्यासारखी स्थिती आल्याचे सांगितले आहे. पीडितांनी पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतल्यावर पाेलीस कारवाईसाठी तत्पर झाले.