शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

अबब ! तीन किलोमीटर लांबीची रेल्वेगाडी; नाव ठेवले ‘शेषनाग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 09:22 IST

भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी चार मालगाड्यांना जोडून एक रेल्वेगाडी यशस्वीरीत्या तयार केली. जवळपास ३ किलोमीटर लांबीच्या या मालगाडीला ‘शेषनाग’ नाव देण्यात आले.

ठळक मुद्देभारतीय रेल्वेत पहिल्यांदाच धावली एवढी मोठी गाडीचार रेल्वेगाड्यांना जोडले‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नाव दाखल करण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी चार मालगाड्यांना जोडून एक रेल्वेगाडी यशस्वीरीत्या तयार केली. जवळपास ३ किलोमीटर लांबीच्या या मालगाडीला ‘शेषनाग’ नाव देण्यात आले. या गाडीत २३६ वॅगन, चार ब्रेक व्हॅन आणि ९ विद्युत लोको शेडचा समावेश आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग या घटनेला ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये दाखल करण्याचा प्रयत्न करीत आहे.नागपूर विभागाच्या परमालकसा रेल्वेस्थानकावर गुरुवारी दुपारी १२.३० वाजता ही रिकामी रेल्वेगाडी कोरबासाठी रवाना झाली. या गाडीने परमालकसा ते दुर्गपर्यंत २२ किमीचे ४५ मिनिटांचे अंतर पार केले. त्यानंतर ही गाडी बिलासपूर आणि कोरबासाठी रवाना झाली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांनी याबाबत विभागातील अधिकारी अधिक उत्साही असल्याचे सांगितले. यामुळे अधिक माल वाहतुकीसोबत वेळेवर धान्य किंवा इतर साहित्य पोहोचविण्यासाठी हे मोठे पाऊल असून आतापर्यंत देशात असा प्रयत्न करण्यात आला नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याबाबत ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नाव दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.मालगाड्यांचा वेग वाढलारेल्वेगाड्यांच्या गतीबाबत रेल्वेत स्पीडगनच्या माध्यमातून आकस्मिक तपासणी करण्यात येत आहे. विभागीय परिचालन शाखेच्या तंत्रानुसार मालगाड्यांच्या वेगात वाढ झाली आहे. आधी मालगाड्या ५० किलोमीटर प्रतितास धावत होत्या. आता मालगाड्यांचा वेग ८० किलोमीटर प्रतितास वाढला आहे.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे