शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

वीज बील थकबाकीमुळे जल जीवन मिशन अडचणीत

By गणेश हुड | Updated: May 25, 2024 18:03 IST

जिल्ह्यात १३०२ पैकी ४३० योजना पूर्ण : वीज पुरवठा नसल्याने पाणीपुरवठा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या  जिल्हा परिषदेच्या १३०२ पैकी ४३० योजना पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित योजनांची कामांची सुरु आहेत. तर काही गावांतील कामांना अद्याप सुरूवात झालेली नाही. पाणीपुरवठा योजनांची जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींवर वीज बिलाची थकबाकी असल्याने जल जीवन मिशनच्या ३०० हून अधिक योजना अडचणीत सापडल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी वाढली असताना योजना पूर्ण होवूनही वीज पुरवठा नसल्याने गावकऱ्यांना पाणीटंचार्इचा सामना करावा लागत आहे. 

स्थायी समितीच्या बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उमल चांदेकर यांनी जलजीवन मिशनच्या योजनांची माहिती  दिली होती. पूर्वीची महावितरणची लाखो रुपयांची देयके ग्रामपंचायतींवर थकीत आहेत. यामध्ये पथदिव्यांपेक्षा पाणीपुरवठा योजनेची रक्कम अधिक आहे. काही ग्रामपंचायतींनी ही देयके विहित मुदतीत टप्पानिहाय भरली होती. तर काही ग्रामपंचायतींनी याकडे दुर्लक्ष केले. त्याचा फटका 'जलजीवन' मधील नवीन ३०० च्या जवळपास योजनांना बसला आहे.  योजनांचा वीजपुरवठ्याची प्रक्रिया पूर्वीच्या थकीत देयकांमुळे अधिक गुंतागुंतीची झाली आहे. या योजनांच्या वीजपुरवठ्यावर तत्काळ मार्ग न निघाल्यास पाणीपुरवठा अडचणीत येण्याची शक्यता आहे. गतकाळातील थकबाकीमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

जिल्ह्यात १३०२ योजनांचे नियोजन 

'जलजीवन मिशन' या महत्त्वाकांक्षी योजनेतून १३०२ कामांचे नियोजन करण्यात आले. डिसेंबर २०२४ पर्यंत या योजनेतील संपूर्ण कामे पूर्ण करायची आहेत. ४३० कामे पूर्ण झाली आहेत. ८६० पैकी काही योजना प्रगतिपथावर तर काही योजनांची कामे रखडली आहेत. जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात ५७१ कोटी रुपयांची कामांना मंजुरी आहे.

टॅग्स :electricityवीज