शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

जैन मायनॉरिटी फेडरेशनने शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा प्रसार करावा- विजय दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 03:10 IST

महाराष्ट्रातील जनजागरण योजनेचा शुभारंभ

नागपूर : अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाने केंद्र व राज्य सरकारांच्या अल्पसंख्याक योजनांच्या प्रसारासाठी सुरू केलेले जनजागरण अभियान उपयुक्त असून, या प्रचार अभियानाची व्याप्ती छोट्या-छोट्या गावांपर्यंत तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत वाढवावी, अशी अपेक्षा सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या अल्पसंख्याक योजना व आर्थिक आधारावरील आरक्षणाच्या योजनांच्या माहितीसाठी सुरू केलेल्या राष्ट्रीय जनजागरण अभियानाच्या महाराष्ट्रातील शुभारंभानिमित्त लोगोचे दर्डा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.  अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या मार्गदर्शक मंडळाचे प्रमुख विजय दर्डा यांना गेल्या वर्षभरातील कामकाजाचा अहवाल सादर करण्यासाठी, तसेच येत्या वर्षातील नवीन उपक्रमांची माहिती देण्यासाठी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी यवतमाळ हाऊस, नागपूर येथे विशेष बैठक आयोजित केली. यावेळी  दर्डा यांच्याकडे कामकाजाचा अहवाल सादर करण्यात आला.  फेडरेशनतर्फे शालेय स्तरापासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शिष्यवृत्ती योजनांमध्ये जैन समाजाच्या लाखो विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला असल्याची माहिती देण्यात आली. तसेच केंद्र व राज्य सरकारतर्फे युवक व महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण योजना प्रभावीपणे सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर युवकांना नवीन व्यापारासाठी उपलब्ध असलेल्या कर्जाच्या योजना, विदेशातील शिक्षणासाठी असलेले कर्ज, अनुदानाच्या योजना या क्षेत्रातील केलेल्या कामाचा विस्तृत अहवालही सादर करण्यात आला. केंद्र सरकारतर्फे ‘हमारी धरोहर’ या नावाने प्राचीन जैन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी तसेच प्राचीन जैन ग्रंथांचे पुनर्लेखन यासाठी सुरू असलेल्या योजनेमध्ये समाजाचा सहभाग वाढवण्यासाठी अधिक कार्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याचबरोबर सामाजिक उपक्रमांसाठी समाजभवन निर्माण करणे, शिक्षणाच्या सुविधा वाढविण्यासाठी नवीन शिक्षण संस्थांच्या उभारणीसाठी असलेल्या योजना समाजापर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले. दर्डा यांनी जनगणना-२०२१ योग्य पद्धतीने समाजापर्यंत पोहोचेल, यासाठी बारकाईने लक्ष देण्याची सूचना केली. तसेच केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या आर्थिक आधारावरील आरक्षणाची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचे सांगून, या आरक्षणामुळे जैन समाजातील पात्र घटक शिक्षणामध्ये व नोकऱ्यांमध्ये आपला अधिकार मिळवू शकतील, असे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत फेडरेशनचे राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी, उज्ज्वल पगारिया, अनिल पारख, संतोष पेंढारी, अतुल कोटेचा, निखिल कुसुमगर, नरेश पाटणी. डॉ. रिचा जैन, सुनील जैन, विनय आकुलवार यांनी सहभाग घेतला.जनगणनेत ‘जैन’ एवढाच उल्लेख करा‘जनगणना-२०२१’मध्ये कुटुंबाची माहिती भरताना धर्म व जात या दोन्ही रकान्यांमध्ये जैन धर्मातील लोकांनी आपले गोत्र, उपजाती, पंथ, संप्रदायांचा उल्लेख न करता फक्त ‘जैन’ एवढाच उल्लेख करावा, ज्यामुळे जैन समाजाची खरी संख्या अधिकृतपणे सरकार दप्तरी नोंद होईल. सध्या भारतात जैन समाजाची एकूण संख्या दोन कोटींपेक्षा अधिक असली तरीही सरकारच्या जनगणनेच्या रेकॉर्डमध्ये फक्त ४५ लाख इतकीच नोंद आहे. ही नोंद दुरुस्त होणे आवश्यक असल्याने याबाबतीत समाजातल्या सर्वच घटकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन ललित गांधी यांनी यावेळी केले.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डा