शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जडीबुटीवाल्यांचे ‘टार्गेट’ तरुणाई : नागपुरात सर्रास लुबाडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 21:25 IST

रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या तरुणांना थांबवून त्यांच्यात शारीरिक दोष असल्याचे सांगून नसलेला आजार गळी पाडतात, जडीबुटीची भुकटी दाखवित ‘ये है इसका इलाज’ असे सांगून ५० ते १०० रुपये आकारतात. १०० टक्के रोग दूर होण्याची हमी देतात. दिवसाकाठी रोज शेकडो तरुण अशा रस्त्याच्या कडेला बसलेल्या जडीबुटीवाल्यांच्या जाळ्यात अडकत असून, पैशासोबतच आपला जीवही टांगणीला लावत आहेत.

ठळक मुद्देशारीरीक दोष सांगून अडकवताहेत जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या तरुणांना थांबवून त्यांच्यात शारीरिक दोष असल्याचे सांगून नसलेला आजार गळी पाडतात, जडीबुटीची भुकटी दाखवित ‘ये है इसका इलाज’ असे सांगून ५० ते १०० रुपये आकारतात. १०० टक्के रोग दूर होण्याची हमी देतात. दिवसाकाठी रोज शेकडो तरुण अशा रस्त्याच्या कडेला बसलेल्या जडीबुटीवाल्यांच्या जाळ्यात अडकत असून, पैशासोबतच आपला जीवही टांगणीला लावत आहेत.अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतींमध्ये दररोज नवनवे संशोधन पुढे येत आहे. नव्या संशोधनाद्वारे वेगवेगळ्या आजारांवरील औषधांचा शोध लागत आहेत. असे असतानाही रस्त्यावरील जडीबुटीवाल्यांचा धंदा जोमात सुरू आहे. शहरात असे दोनशेच्यावर जडीबुटीवाले आहेत. यातील बहुसंख्य निरक्षर आहेत. पारंपरिक व्यवसाय म्हणून त्यांनी हा व्यवसाय आत्मसात केला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, परंतु यातील अनेकांकडे जडीबुटीचे विशेष ज्ञान नसल्याचे सहज लक्षात येते.रस्त्याच्या कडेला बसून जडीबुटी व्यवसाय करणारे अनेक जण ‘सेक्स’च्या नावाने आपली औषधी खपवितात. स्वप्नदोष, शीघ्रपतन आदी दोष सांगून यावर शिलाजीत, मदनमस्त, कामराज मोदक, अमर फळ, बरफ फळ, इश्क अम्बर, काली मुसली, सफेद मुसली आदी जडीबुटीच्या नावाने विकतात. विशेष म्हणजे ‘मदनमस्त’ आणि ‘कामराज मोदक’ याच्या १० ग्रामची किमत ३०० रुपये तर अमर फळ, बरफ फळ याची किमत ६०० रुपये तोळा आहे. ग्राहकाशी भावठाव करीत ५० ते १०० रुपयापर्यंत हे जडीबुटी विकतात. यामुळे ग्राहकाच्या हातात पडणाऱ्या जडीबुटीत नेमके काय असते, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. धक्कादायक म्हणजे, पोलीस, अन्न व औषध प्रशासन यांच्या डोळ्यादेखत हा व्यवसाय सुरू आहे. मात्र कुणी कधीच कारवाई करताना किंवा त्यांच्याकडील औषधी तपासताना दिसून येत नाही.‘कोणत्याही रोगावर हमखास इलाज’चर्मरोगापासून ते मधुमेहापर्यंतच्या आणि कॅन्सरसारख्या दुर्धर व्याधीवर रामबाण इलाज असल्याचा दावा हे जडीबुटीवाले करतात. परंतु ही औषधे खरेच उपयुक्त आहेत का याचे उत्तर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ ठामपणे देत नाही. जडीबुटीवाल्यांची ही जमात वंशपरंपरेने राजवैद्य असल्याचा दावा करते.

 

टॅग्स :medicinesऔषधंfraudधोकेबाजी