शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जडीबुटीवाल्यांचे ‘टार्गेट’ तरुणाई : नागपुरात सर्रास लुबाडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 21:25 IST

रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या तरुणांना थांबवून त्यांच्यात शारीरिक दोष असल्याचे सांगून नसलेला आजार गळी पाडतात, जडीबुटीची भुकटी दाखवित ‘ये है इसका इलाज’ असे सांगून ५० ते १०० रुपये आकारतात. १०० टक्के रोग दूर होण्याची हमी देतात. दिवसाकाठी रोज शेकडो तरुण अशा रस्त्याच्या कडेला बसलेल्या जडीबुटीवाल्यांच्या जाळ्यात अडकत असून, पैशासोबतच आपला जीवही टांगणीला लावत आहेत.

ठळक मुद्देशारीरीक दोष सांगून अडकवताहेत जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या तरुणांना थांबवून त्यांच्यात शारीरिक दोष असल्याचे सांगून नसलेला आजार गळी पाडतात, जडीबुटीची भुकटी दाखवित ‘ये है इसका इलाज’ असे सांगून ५० ते १०० रुपये आकारतात. १०० टक्के रोग दूर होण्याची हमी देतात. दिवसाकाठी रोज शेकडो तरुण अशा रस्त्याच्या कडेला बसलेल्या जडीबुटीवाल्यांच्या जाळ्यात अडकत असून, पैशासोबतच आपला जीवही टांगणीला लावत आहेत.अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतींमध्ये दररोज नवनवे संशोधन पुढे येत आहे. नव्या संशोधनाद्वारे वेगवेगळ्या आजारांवरील औषधांचा शोध लागत आहेत. असे असतानाही रस्त्यावरील जडीबुटीवाल्यांचा धंदा जोमात सुरू आहे. शहरात असे दोनशेच्यावर जडीबुटीवाले आहेत. यातील बहुसंख्य निरक्षर आहेत. पारंपरिक व्यवसाय म्हणून त्यांनी हा व्यवसाय आत्मसात केला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, परंतु यातील अनेकांकडे जडीबुटीचे विशेष ज्ञान नसल्याचे सहज लक्षात येते.रस्त्याच्या कडेला बसून जडीबुटी व्यवसाय करणारे अनेक जण ‘सेक्स’च्या नावाने आपली औषधी खपवितात. स्वप्नदोष, शीघ्रपतन आदी दोष सांगून यावर शिलाजीत, मदनमस्त, कामराज मोदक, अमर फळ, बरफ फळ, इश्क अम्बर, काली मुसली, सफेद मुसली आदी जडीबुटीच्या नावाने विकतात. विशेष म्हणजे ‘मदनमस्त’ आणि ‘कामराज मोदक’ याच्या १० ग्रामची किमत ३०० रुपये तर अमर फळ, बरफ फळ याची किमत ६०० रुपये तोळा आहे. ग्राहकाशी भावठाव करीत ५० ते १०० रुपयापर्यंत हे जडीबुटी विकतात. यामुळे ग्राहकाच्या हातात पडणाऱ्या जडीबुटीत नेमके काय असते, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. धक्कादायक म्हणजे, पोलीस, अन्न व औषध प्रशासन यांच्या डोळ्यादेखत हा व्यवसाय सुरू आहे. मात्र कुणी कधीच कारवाई करताना किंवा त्यांच्याकडील औषधी तपासताना दिसून येत नाही.‘कोणत्याही रोगावर हमखास इलाज’चर्मरोगापासून ते मधुमेहापर्यंतच्या आणि कॅन्सरसारख्या दुर्धर व्याधीवर रामबाण इलाज असल्याचा दावा हे जडीबुटीवाले करतात. परंतु ही औषधे खरेच उपयुक्त आहेत का याचे उत्तर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ ठामपणे देत नाही. जडीबुटीवाल्यांची ही जमात वंशपरंपरेने राजवैद्य असल्याचा दावा करते.

 

टॅग्स :medicinesऔषधंfraudधोकेबाजी